शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भारताचा २५०वा सामना

By admin | Updated: September 28, 2016 07:09 IST

कानपूरच्या ग्रीन पार्कवर ऐतिहासिक ५०० वा कसोटी सामना खेळणारा भारतीय संघ आता शुक्रवारी कोलकाताच्या ईडनगार्डन्सवर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळण्यासाठी उतरेल.

ईडनवर दुसरी कसोटी : मायदेशातील सर्वाधिक कसोटी सामने या मैदानावर खेळले नवी दिल्ली : कानपूरच्या ग्रीन पार्कवर ऐतिहासिक ५०० वा कसोटी सामना खेळणारा भारतीय संघ आता शुक्रवारी कोलकाताच्या ईडनगार्डन्सवर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळण्यासाठी उतरेल. त्या वेळी टीम इंडियाचा मायदेशातील हा २५० वा कसोटी सामना असेल. भारताने मायदेशात जास्तीत जास्त सामने स्वातंत्र्यानंतर खेळले आहेत. १९४७ पूर्वी भारताने मायदेशात केवळ तीन सामने खेळले होते. त्यात दोन सामन्यांत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिला सामना १५ डिसेंबर १९३३ रोजी इंग्लंडविरुद्ध मुंबई जिमखाना मैदानावर खेळला गेला होता. त्या लढतीत भारताला ९ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लाला अमरनाथने पदार्पणाच्या लढतीत शतक झळकावले तो हाच सामना होता. मायदेशात भारताने ५० वा कसोटी सामना फेबु्रवारी १९६४ मध्ये इंग्लंडविरुद्ध दिल्लीमध्ये खेळला होता. या लढतीत हनुमंत सिंग यांनी पदार्पणात १०५ धावा फटकावल्या होत्या. मन्सूरअली खान पतौडी यांनी या लढतीत नाबाद द्विशतकी (२०३) खेळी केली होती. ही लढत अनिर्णीत संपली होती. भारताने मायदेशात १०० वा कसोटी सामना नोव्हेंबर १९७९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध बंगळुरूमध्ये खेळला होता. ही लढत अनिर्णीत राहिली होती. १५० वा सामना झिम्बाब्वेविरुद्ध मार्च १९९३ मध्ये दिल्लीमध्ये खेळला गेला होता. त्या लढतीत विनोद कांबळीने २२७ धावांची खेळी केली होती आणि भारताने एक डाव १३ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा मायदेशातील २०० वा कसोटी सामना योगायोगाने कोलकातामध्येच खेळला गेला होता. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान मार्च २००५ मध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत राहुल द्रविडने दोन्ही डावांत (११० व १३५) शतके झळकावली होती. भारताने या लढतीत १९५ धावांच्या फरकाने मोठा विजय साकारला होता. जर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला तर एकप्रकारे भारताची ही विजयाची हॅट््ट्रिक ठरणार आहे. भारताने मायदेशातील सर्वाधिक कसोटी सामने ईडनगार्डन्सवर खेळले आहेत, हे विशेष. कोलकाताच्या या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणारा सामना भारताचा या मैदानावरील एकूण ४० वा कसोटी सामना आहे. आतापर्यंत या मैदानावर खेळल्या गेलेल्या ३९ सामन्यांपैकी भारताने ११ जिंकले आहेत, तर ९ सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतासाठी दिल्लीचे फिरोजशाह कोटला आणि चेन्नईचे एम. ए. चिदंबरम स्टेडियम लकी ठरले आहेत. या दोन्ही मैदानांवर भारताने प्रत्येकी १३ सामने जिंकले आहेत. भारताने दिल्लीत ३३, तर चेन्नईत ३१ कसोटी सामने खेळले आहेत. भारताने मायदेशात एकूण २१ मैदानांवर कसोटी सामने खेळलेले आहेत. त्यातील ९ मैदाने अशी आहेत, की जेथे गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कसोटी सामना खेळला गेलेला नाही. भारताने मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने इंग्लंडविरुद्ध (५५) खेळले आहेत. त्यात १५ सामन्यांत विजय मिळवला, तर १३ सामने गमावले. त्यानंतर आॅस्ट्रेलिया (४६ कसोटी, १९ विजय, १२ पराभव), वेस्ट इंडिज (४५ सामने, ११ विजय, १४ पराभव), पाकिस्तान (३३ सामने, ७ विजय, ५ पराभव) आणि न्यूझीलंड (३२ सामने, १४ विजय, २ पराभव) या संघांचा क्रमांक आहे. भारताने आतापर्यंत कसोटी खेळणाऱ्या संघांपैकी बांगलादेशविरुद्ध अद्याप मायदेशात कसोटी सामना खेळलेला नाही. (वृत्तसंस्था)काही कर्णधारांची कामगिरी...- कर्णधारांबाबत विचार करता महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात सर्वाधिक ३० सामने खेळले. त्यात २१ सामन्यांत विजय मिळवला, तर केवळ तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. - अझहरच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात २० सामने खेळले. त्यात १३ सामन्यांत विजय मिळवला, तर चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. - गांगुलीने मायदेशात २१ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. त्यात १० सामन्यांत विजय मिळवला, तर ३ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. - सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या २९ कसोटी सामन्यांत जय-पराजयाची आकडेवारी ७-२ अशी आहे.- मन्सूरअली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात खेळलेल्या २७ कसोटी सामन्यांपैकी ६ सामन्यांत विजय मिळवला, तर ९ सामने गमावले. च्कपिलदेव यांनी मायदेशात २० कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले, पण संघाला केवळ दोन सामन्यांत विजय मिळवता आला, तर चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. ८८ सामन्यांत विजय; तर ५१ सामन्यांत पराभूतभारताने आतापर्यंत मायदेशात २४९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात ८८ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर ५१ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना टाय झाला तर १०९ सामने अनिर्णीत संपले. विदेशात भारताने २५१ सामने खेळताना ४२ जिंकले, तर १०६ सामने गमावले. १०३ सामने अनिर्णीत संपले. या लढतीसह भारत मायदेशात २५० कसोटी सामने खेळणारा तिसरा संघ ठरणार आहे. इंग्लंडने मायदेशात सर्वाधिक ५०१ सामने खेळले आहेत. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा (४०४) क्रमांक आहे. वेस्ट इंडिज (२३७) चौथ्या अणि दक्षिण आफ्रिका (२१७) पाचव्या क्रमांकावर आहे.