शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

‘भारतप्रेम’ आले आफ्रिदीच्या अंगाशी

By admin | Updated: March 15, 2016 09:15 IST

पाकपेक्षा भारतात अधिक प्रेम मिळते, असे वक्तव्य करणारा शाहिद आफ्रिदीवर लाहोर न्यायालयाने थेट देशद्रोहाचा आरोप ठेवून नोटीस बजावली आहे.

लाहोर : पाकपेक्षा भारतात अधिक पे्रम मिळते, अशा शब्दांत भारताबद्दलच्या भावना व्यक्त करणे पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या चांगलेच अंगाशी आले असून, त्याला लाहोर न्यायालयाने थेट देशद्रोहाचा आरोप ठेवून कायदेशीर नोटीस बजावली आहे. टी२० विश्वचषकासाठी भारतात आल्यानंतर आफ्रिदीने कोलकात्यात पत्रकार परिषद घेतली होती. ‘भारतीयांकडून जितके प्रेम मिळाले, तितके प्रेम पाकिस्तानमध्येही मिळाले नाही,’ अशा भावना व्यक्त करून त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र आता हेच ‘भारतप्रेम’ आफ्रिदीवर बूमरँगसारखे उलटले आहे. आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर अजहर सादिक या वरिष्ठ वकिलाने लाहोर न्यायालयात त्याच्याविरुद्ध याचिका केली. यानुसार लाहोर न्यायालयाने १५ दिवसांच्या आत याबाबत उत्तर देण्याचे आदेश दिल्याने आफ्रिदी अडचणीत आला आहे. याबाबतीत सादिक यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली की, ‘आफ्रिदीने पाकिस्तानच्या तुलनेत भारतात अधिक प्रेम मिळाल्याचे विधान करून पूर्ण पाकिस्तानला निराश केले आहे. आफ्रिदीने देशद्रोह केला आहे. त्यामुळे टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तान संघ विजयासाठी पूर्ण प्रयत्न करेल याबाबत कोण शाश्वती देईल.’मियाँदाद भडकला!अशी मुक्ताफळे उधळताना या खेळाडूंना लाज वाटली पाहिजे. तुम्ही तेथे यजमान देशाचे कौतुक करण्यासाठी गेले नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे. भारतीयांनी आतापर्यंत आम्हाला काय दिले? गेल्या पाच वर्षांत त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटसाठी काय केले? आमचे खेळाडू असे का बोलत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी चांगले क्रिकेट खेळावे, अनावश्यक गोष्टी टाळाव्यात.- जावेद मियाँदाद, माजी क्रिकेटपटू, पाक