शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

भारतीयांचा पुन्हा एकदा क्लीन स्वीप; प्रकाश, अमनप्रीत, जितू चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:16 IST

प्रकाश नांजप्पा, अमनप्रीतसिंग आणि जितू राय यांनी राष्ट्रकुल नेमबाजीच्या चौथ्या दिवशी ५० मीटर पिस्तूल प्रकारात क्लीन स्वीप करीत तिन्ही पदक जिंकली.

गोल्ड कोस्ट : प्रकाश नांजप्पा, अमनप्रीतसिंग आणि जितू राय यांनी राष्ट्रकुल नेमबाजीच्या चौथ्या दिवशी ५० मीटर पिस्तूल प्रकारात क्लीन स्वीप करीत तिन्ही पदक जिंकली.प्रकाशने २२२.४ गुणांसह सुवर्ण, अमनप्रीतने रौप्य आणि जितूने कांस्य जिंकले. पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात आॅलिम्पिक कांस्य विजेता गगन नारंग याला रौप्य आणि स्वप्निल कुसाले याला कांस्य पदक मिळाले. त्याआधी महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात अन्नूराजसिंग हिने कांस्य जिंकले. विशेष म्हणजे याआधी भारतीय पिस्तूल नेमबाजांनी दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारातही क्लीन स्वीप केले होते. शाहजार रिझवीने सुवर्ण, ओकांरसिंग याने रौप्य आणि जितू रायने कांस्य जिंकले होते.अनुभवी नेमबाज ४१वर्षीय प्रकाशने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. याआधी त्याला २०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा व २०१३ साली झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या १० मीटर प्रकारात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.दरम्यान, स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हिना सिध्दूने १० मीटर एअर पिस्तूल गटात सुवर्ण जिंकले होते. (वृत्तसंस्था)