शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय युवा संघ आशिया ‘चॅम्पियन’

By admin | Updated: December 24, 2016 01:19 IST

फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव

कोलोंबो : फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव करून १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली.आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २७३ धावांची समाधानकारक मजलम मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ यजमान श्रीलंकेचा संघ ३९.५ षटकात ४ बाद १९६ धावा अशा सुस्थितीत होता. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्यावेळी अचूक मारा करताना लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवत त्यांचा डाव ४८.४ षटकांत २३९ धावांमध्ये संपुष्टात आणला. लंकेने आपले अखेरचे ६ फलंदाज केवळ ४३ धावांत गमावले. कर्णधार अभिषेक शर्माने ३७ धावांमध्ये ४ महत्त्वपूर्ण बळी घेत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. राहुल चहरने त्याला उपयुक्त साथ देताना २२ धावांत ३ बळी घेतले. यश ठाकूरने एक बळी मिळविला. सलामीवीर रेवेन केली (६२) आणि कर्णधार कमिंदू मेंडिस (५३) यांचा अपवाद वगळता लंकेच्या एकाही फलंदाजाला चमक दाखविता आली नाही. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करून यजमानांच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, अभिषेकने केलीला बाद करून ही जमलेली जोडी फोडली.तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने समाधानकारक मजल मारली. सलामीवीर हिमांशू राणा (७१) आणि शुभम गिल (७०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. तर, याआधी मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉने (३९) राणासह भारताला ६७ धावांची दमदार सलामी दिली. याव्यतिरिक्त अभिषेक (२९), सलमान खान (२६) आणि कमलेश नागरकोटी (२३) यांनीही चांगली फलंदाजी केली. श्रीलंकेकडून निपुन रंसिका आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी ३ बळी घेत भारताला रोखण्याचा प्रयत्न केला. सामन्यात निर्णायक अष्टपैलू खेळी करणारा भारताचा कर्णधार अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर स्पर्धेत जबरदस्त फटकेबाजी केलेल्या हिमांशू राणाला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट एकदिवसीय युवा पदार्पण पुरस्कारासाठी राहुल चहर, कमलेश नागरकोटी आणि हेत पटेल या भारतीयांची निवड करण्यात आली.