शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

भारतीय महिला संघाला रौप्यपदक

By admin | Updated: August 2, 2015 23:42 IST

दोन सेटची महत्त्वपूर्ण आघाडी असतानाही भारतीय महिला तिरंदाजी संघाला रिकर्व्ह गटात रशियाकडून शूटआॅफमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे

कोपेनहेगन : दोन सेटची महत्त्वपूर्ण आघाडी असतानाही भारतीय महिला तिरंदाजी संघाला रिकर्व्ह गटात रशियाकडून शूटआॅफमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी मांझी आणि रिमिल बुरुली या त्रिकुटाने रशियन संघावर दबाव निर्माण करीत ४-0ची आघाडी मिळविली होती, परंतु भारतीय संघाने पुढील दोन सेट गमावले आणि नंतर शूट आॅफमध्ये २७-२८ असा पराभव पत्करावा लागला.भारताने या स्पर्धेत दुसरे रौप्य जिंकले आहे. यापूर्वी काल कंपाउंड प्रकारात रजत चौहानने वैयक्तिक रौप्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. विश्व तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये ही भारताची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. महिला गटात आॅलिम्पिक कोटा मिळविल्यानंतर भारतीय संघाने खेळाडूंच्या स्थानांमध्ये बदल केला. अव्वल खेळाडू दीपिकाकुमारी पहिल्या आणि अंतिम प्रयत्नासाठी मैदानात उतरली. रशियन संघाने धिमी सुरुवात करुनही पदक जिंकण्यात यशस्वी ठरली.४-४ अशी बरोबरी झाल्यानंतर शूट आॅफमध्ये तुयाना दाशिदोरझीवा हिने परफेक्ट १0 गुणांसह सुरवात केली. भारताकडून लक्ष्मीरानीनी याची बरोबरी केली. दुसऱ्या फेरीत पेरोवाने ९ गुण मिळविले, तर भारताच्या रिमिलचा बाण ८ गुणांवर लागला. स्टेपानोवाने ९ गुण मिळवित भारतावर दबाब वाढविला, शेवटच्या प्रयत्नात दीपिकाला परफेक्ट १0 गुण मिळवून विजय मिळवण्याचा दबाव होता, परंतु तिला केवळ ९ गुणांवर समाधान मानावे लागल्यामुळे भारताला रौप्यपदक मिळाले.(वृत्तसंस्था)