शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

भारतीय महिला विजयी

By admin | Updated: February 23, 2016 03:17 IST

अनुजा पाटील (१४ धावांत ३ बळी) आणि दीप्ती शर्मा (२३ धावांत २ बळी) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० लढतीत

रांची : अनुजा पाटील (१४ धावांत ३ बळी) आणि दीप्ती शर्मा (२३ धावांत २ बळी) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० लढतीत श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद १३० धावांची मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्याचा संघाचा डाव ७ बाद ९६ धावांत रोखल्या गेला. श्रीलंकेच्या डावात यष्टिरक्षक दिलानी मंडोदराने संघर्षपूर्ण नाबाद ४१ धावांची खेळी केली. कर्णधार शशिकला श्रीवर्धनेने १८ व हंसिमा करुणारत्नेने १४ धावांचे योगदान दिले. या तीन महिला फलंदाजांचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या अन्य खेळाडूंना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही. भारतातर्फे आरतीने चार षटकांत १४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर दीप्तीने २३ धावांत २ खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखवला. एकता बिष्ट व पूनम यादव यांनी अनुक्रमे २१ व १७ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, भारताची सुरुवातीला २ बाद १५ अशी अवस्था होती. कर्णधार मिताली राज (३) व वेल्लास्वामी वनिता (१२) यांना मोठी खेळी करता आली नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या स्मृती मंधानाने डाव सावरला. तिने हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. मंधानाने २७ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकारांच्या मदतीने ३५ धावा फटकावल्या तर हरमनप्रीतने ४१ चेंडूंमध्ये २ चौकारासह ३६ धावा केल्या. अनुजाने नाबाद २२ धावांची खेळी केली. श्रीलंकेतर्फे सुगंंधिका कुमारीने २८ धावांत ३ बळी घेतले. एशानी लोकोसुरियागेने १९ धावांत २ तर इनोका राणावीराने १ बळी घेतला. (वृत्तसंस्था)