शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

भारतीय महिलांचा विंडीजवर मालिका विजय

By admin | Updated: November 14, 2016 01:52 IST

कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना यांच्या उपयुक्त खेळीमुळे भारतीय महिला संघाने रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजवर पाच गड्यांनी विजय

मुलापाडू : कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना यांच्या उपयुक्त खेळीमुळे भारतीय महिला संघाने रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजवर पाच गड्यांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताचा हा दुसरा विजय आहे. यासोबतच भारताने मालिकाही खिशात घातली.वेस्ट इंडीजने नाणेफेक गमावल्यावर प्रथम फलंदाजी करताना सात बाद १५३ धावा केल्या. भारताने ३८ षटकांत पाच बाद १५४ धावा करत विजय मिळवला. या विजयाने भारताला आयसीसी क्रमवारीत दोन गुणांसह एका स्थानाचा फायदा झाला आहे. १७ गुणांसह भारत पाचव्या स्थानी आहे. भारताने वेस्ट इंडीजला सुरुवातीलाच मोठे झटके दिले. त्यातून विंडीजचा संघ सावरू शकला नाही. अष्टपैलू खेळाडू डिंड्रा डोटिन हिने १०१ चेंडंूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६३ धावा केल्या. मात्र, कोणत्याही फलंदाजाला वेगाने धावा जमवता आल्या नाहीत. तिच्यासोबतच मेरिसा एगुलिएरा हिने २५ धावांचे योगदान दिले. भारताच्या झुलन गोस्वामी आणि एकता बिष्ट यांनी प्रत्येकी दोन तर शिखा पांडे आणि अनिसा मोहम्मद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात भारताची सुरुवातही काहीशी निराशाजनक होती. तिरुष कामिनी ही चौथ्या षटकातच बाद झाली. मात्र, स्मृती मानधना (४४) आणि दीप्ती शर्मा (३२) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार मिताली राज हिने ५१ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. दोन्ही संघांतील तिसरा आणि अखेरचा अंतिम सामना याच मैदानावर १६ रोजी होईल. (वृत्तसंस्था)