शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भारतीय महिलांचा विंडीजवर मालिका विजय

By admin | Updated: November 14, 2016 01:52 IST

कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना यांच्या उपयुक्त खेळीमुळे भारतीय महिला संघाने रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजवर पाच गड्यांनी विजय

मुलापाडू : कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना यांच्या उपयुक्त खेळीमुळे भारतीय महिला संघाने रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजवर पाच गड्यांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताचा हा दुसरा विजय आहे. यासोबतच भारताने मालिकाही खिशात घातली.वेस्ट इंडीजने नाणेफेक गमावल्यावर प्रथम फलंदाजी करताना सात बाद १५३ धावा केल्या. भारताने ३८ षटकांत पाच बाद १५४ धावा करत विजय मिळवला. या विजयाने भारताला आयसीसी क्रमवारीत दोन गुणांसह एका स्थानाचा फायदा झाला आहे. १७ गुणांसह भारत पाचव्या स्थानी आहे. भारताने वेस्ट इंडीजला सुरुवातीलाच मोठे झटके दिले. त्यातून विंडीजचा संघ सावरू शकला नाही. अष्टपैलू खेळाडू डिंड्रा डोटिन हिने १०१ चेंडंूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६३ धावा केल्या. मात्र, कोणत्याही फलंदाजाला वेगाने धावा जमवता आल्या नाहीत. तिच्यासोबतच मेरिसा एगुलिएरा हिने २५ धावांचे योगदान दिले. भारताच्या झुलन गोस्वामी आणि एकता बिष्ट यांनी प्रत्येकी दोन तर शिखा पांडे आणि अनिसा मोहम्मद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात भारताची सुरुवातही काहीशी निराशाजनक होती. तिरुष कामिनी ही चौथ्या षटकातच बाद झाली. मात्र, स्मृती मानधना (४४) आणि दीप्ती शर्मा (३२) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार मिताली राज हिने ५१ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. दोन्ही संघांतील तिसरा आणि अखेरचा अंतिम सामना याच मैदानावर १६ रोजी होईल. (वृत्तसंस्था)