शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाला झटका

By admin | Updated: July 4, 2017 01:41 IST

वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या चौथ्या सामन्यात मिळालेल्या पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरला. असे वाटतं होतं, की

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या चौथ्या सामन्यात मिळालेल्या पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरला. असे वाटतं होतं, की भारतीय संघ यजमानांना क्लीन स्विप देईल. पहिला सामना जरी पावसामुळे रद्द झाला असला, तरी चौथ्या सामन्याकडे पाहता भारत या मालिकेत निर्भेळ यश मिळवेल, अशीच शक्यता होती. पण या सामन्यातील पराभवाने सर्व गणित बदलले. चौथ्या सामन्यात मोठे लक्ष्य नव्हते. १९० धावा बनवायचे होते तरी ११ धावांनी भारतीय अपयशी ठरले. महत्त्वाचे म्हणजे, भारतीयांनी जी काही फलंदाजी केली, ते प्रश्न निर्माण करणारे होते. खेळपट्टी संथ होती, यामुळे फटके मारणे सहज शक्य नव्हते. तसेच अशा खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे कठीण होते, अशी सर्व कारणे मान्य आहेत. परंतु, ज्या प्रकारे विंडीजचा संघ दुबळा आणि भारताचा संघ सहजपणे जिंकत असताना हा पराभव अनपेक्षित होता. त्यातच विंडीज संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रताही मिळवली नव्हती आणि क्रमवारीत सध्या ते नवव्या स्थानी आहेत. त्यामुळेच या पराभवावर प्रश्न निर्माण होत आहेत.कर्णधार विराट कोहलीने म्हटले, की कधी कधी लहान लक्ष्याचा पाठलाग करताना समस्या येतात, हे खरेही आहे. परंतु, सामना ५० षटकांपर्यंत का खेचला जावा, हेच कळत नाही. एक तर आखलेल्या योजनांनुसार खेळ झाला नाही किंवा फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले, ही दोन मुख्य कारण यामागे असतील. धोनीनेही अनपेक्षित खेळी खेळली. त्याने अर्धशतक जरुर ठोकले, पण स्ट्राईक रेट अत्यंत खराब होता. त्याने अखेरच्या क्षणी सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही तो अपयशी ठरला. दरम्यान, आता या पराभवामुळे भारताला एक झटका बसला आहे, तो म्हणजे ही मालिका अजूनही जिवंत आहे. विंडीजने अखेरच्या सामन्यात बाजी मारली तर ही मालिका बरोबरीत सुटेल. जर असे झाले तर भारतासाठी हे एका पराभवासारखेच असेल. आता वळूया भारताच्या प्रमुख प्रशिक्षकपदाच्या निवडीकडे. याबाबत अनेक रहस्ये वाढत आहेत, कारण केवळ रवी शास्त्री व व्यंकटेश प्रसाद यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, तर फिल सिमन्स यासारख्या अनुभवी प्रशिक्षक व प्रसारमाध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडूही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक आहे. त्यामुळे याबाबत उत्सुकता ताणली आहे. पण मला वाटते, की जोपर्यंत ९ जुलैची मुदत आहे तोपर्यंत या शर्यतीत आणखी काही नावांचा समावेश होऊ शकतो.जेव्हापासून अनिल कुंबळे या पदापासून दूर झाले तेव्हापासून अनेकांना संधी निर्माण झाल्या आहेत. तरी माझ्या मते, रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. वेंकटेश प्रसाद यांच्यावरही विचार होऊ शकतो. पण, किती अर्ज आले त्यांची यादी होईल. त्यानंतर क्रिकेट सल्लागार समितीकडे ही यादी जाईल. त्यांच्यावरच हा निर्णय अवलंबून असेल.