शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

भारतीय संघाला झटका

By admin | Updated: July 4, 2017 01:41 IST

वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या चौथ्या सामन्यात मिळालेल्या पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरला. असे वाटतं होतं, की

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या चौथ्या सामन्यात मिळालेल्या पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरला. असे वाटतं होतं, की भारतीय संघ यजमानांना क्लीन स्विप देईल. पहिला सामना जरी पावसामुळे रद्द झाला असला, तरी चौथ्या सामन्याकडे पाहता भारत या मालिकेत निर्भेळ यश मिळवेल, अशीच शक्यता होती. पण या सामन्यातील पराभवाने सर्व गणित बदलले. चौथ्या सामन्यात मोठे लक्ष्य नव्हते. १९० धावा बनवायचे होते तरी ११ धावांनी भारतीय अपयशी ठरले. महत्त्वाचे म्हणजे, भारतीयांनी जी काही फलंदाजी केली, ते प्रश्न निर्माण करणारे होते. खेळपट्टी संथ होती, यामुळे फटके मारणे सहज शक्य नव्हते. तसेच अशा खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे कठीण होते, अशी सर्व कारणे मान्य आहेत. परंतु, ज्या प्रकारे विंडीजचा संघ दुबळा आणि भारताचा संघ सहजपणे जिंकत असताना हा पराभव अनपेक्षित होता. त्यातच विंडीज संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रताही मिळवली नव्हती आणि क्रमवारीत सध्या ते नवव्या स्थानी आहेत. त्यामुळेच या पराभवावर प्रश्न निर्माण होत आहेत.कर्णधार विराट कोहलीने म्हटले, की कधी कधी लहान लक्ष्याचा पाठलाग करताना समस्या येतात, हे खरेही आहे. परंतु, सामना ५० षटकांपर्यंत का खेचला जावा, हेच कळत नाही. एक तर आखलेल्या योजनांनुसार खेळ झाला नाही किंवा फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले, ही दोन मुख्य कारण यामागे असतील. धोनीनेही अनपेक्षित खेळी खेळली. त्याने अर्धशतक जरुर ठोकले, पण स्ट्राईक रेट अत्यंत खराब होता. त्याने अखेरच्या क्षणी सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही तो अपयशी ठरला. दरम्यान, आता या पराभवामुळे भारताला एक झटका बसला आहे, तो म्हणजे ही मालिका अजूनही जिवंत आहे. विंडीजने अखेरच्या सामन्यात बाजी मारली तर ही मालिका बरोबरीत सुटेल. जर असे झाले तर भारतासाठी हे एका पराभवासारखेच असेल. आता वळूया भारताच्या प्रमुख प्रशिक्षकपदाच्या निवडीकडे. याबाबत अनेक रहस्ये वाढत आहेत, कारण केवळ रवी शास्त्री व व्यंकटेश प्रसाद यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, तर फिल सिमन्स यासारख्या अनुभवी प्रशिक्षक व प्रसारमाध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडूही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक आहे. त्यामुळे याबाबत उत्सुकता ताणली आहे. पण मला वाटते, की जोपर्यंत ९ जुलैची मुदत आहे तोपर्यंत या शर्यतीत आणखी काही नावांचा समावेश होऊ शकतो.जेव्हापासून अनिल कुंबळे या पदापासून दूर झाले तेव्हापासून अनेकांना संधी निर्माण झाल्या आहेत. तरी माझ्या मते, रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. वेंकटेश प्रसाद यांच्यावरही विचार होऊ शकतो. पण, किती अर्ज आले त्यांची यादी होईल. त्यानंतर क्रिकेट सल्लागार समितीकडे ही यादी जाईल. त्यांच्यावरच हा निर्णय अवलंबून असेल.