शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघ बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध सज्ज

By admin | Updated: May 2, 2017 01:26 IST

गेल्या लढतीत शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला सुल्तान अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत

इपोह : गेल्या लढतीत शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला सुल्तान अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत तिसऱ्या राऊंड रॉबिन लढतीत मंगळवारी गत चॅम्पियन आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीच्या निमित्ताने चमकदार कामगिरी करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ उतरणार आहे. सलामी लढतीत ब्रिटेनविरुद्ध २-२ ने बरोबरीवर समाधान मानणाऱ्या भारतीय संघाने त्यानंतर कामगिरीत सुधारणा करताना न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला. न्यूझीलंड संघाने पहिल्या लढतीत विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाला १-१ ने बरोबरीत रोखले होते. आॅस्ट्रेलियाने रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत यजमान मलेशियाचा ६-१ ने धुव्वा उडवित आपले वर्चस्व सिद्ध केले. सहा देशांच्या या स्पर्धेत सर्वांत वरचे मानांकन असलेल्या दोन संघांदरम्यान (भारत व आॅस्ट्रेलिया) खेळली जाणारी लढत साखळी फेरीतील सर्वांत महत्त्वाची लढत मानल्या जात आहे. भारताचे प्रशिक्षक रोलेंट ओल्टमेन्स म्हणाले,‘आम्ही कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहोत. इपोहमध्ये दाखल होण्यापूर्वी आमचा तसा निर्धार होता. आम्ही अनुकूल निकाल मिळवण्यास उत्सुक आहोत.’पहिल्या लढतीत गोल करण्याची संधी निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंवर टीका करणाऱ्या ओल्टमेन्स यांनी दुसऱ्या लढतीतील कामगिरीनंतर त्यांची प्रशंसा केली. ओल्टमेन्स पुढे म्हणाले,‘माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे फॉरवर्ड व मिडफिल्ड यांच्यातील ताळमेळ आहे. आमच्या संघात हा ताळमेळ दिसून येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत आघाडीच्या फळीची कामगिरी उल्लेखनीय होती. यानंतरच्या लढतीत आम्ही यात आणखी सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहोत.’ओल्टमेन्स म्हणाले की, ‘डिफेंडर्सनी न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीतील पहिल्या क्वार्टरमधील कामगिरीचे समीक्षण करायला हवे. त्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना अनेकदा चढाई करण्याची संधी दिली. पहिल्या क्वार्टरमधील कामगिरीमुळे मी नाराज झालो. पहिल्या क्वार्टरमध्ये एवढ्या चुका कशा झाल्या, हे न समजण्यासारखे आहे. पहिल्या क्वार्टरमधील चुका सुधारत भारतीय संघाने त्यानंतर सामन्यावर नियंत्रण मिळवले.’ भारताने यापूर्वीच्या लढतीत सात पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्यातील दोन पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने गोल नोंदवले. हरमनप्रीतची आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक कोरिन बॅच यांनीही प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)1दरम्यान, आॅस्टे्रलियन संघानेही भारताविरुध्द कंबर कसली असून ते या सामन्यात भारताला गृहित धरण्याची चूक करणार नाही. भारतीय संघावर बारीक लक्ष ठेवून असलेले आॅस्टे्रलिय प्रशिक्षक यांनी म्हटले की, ‘पेनल्टी कॉर्नर भारताची मजबूत बाजू झाली आहे.’2जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला भारत आणि आॅस्ट्रेलिया या संघांना अंतिम फेरीचे प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. आॅस्ट्रेलियाने ९ वेळा अझलान शाह कप पटकावला आहे. हा संघ जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.