शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल

By admin | Updated: June 17, 2017 02:41 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारताकडून पराभव स्वीकारणारा पाकिस्तान संघ अंतिम फेरी गाठेल, असे कुणालाही वाटले नसेल.

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारताकडून पराभव स्वीकारणारा पाकिस्तान संघ अंतिम फेरी गाठेल, असे कुणालाही वाटले नसेल. अनुभव व कौशल्य याचा विचार करता हा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतही नव्हता.पण, सट्टेबाज व क्रिकेट पंडितांचे अंदाज खोटे ठरवित आता या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे रविवारी अंतिम लढतीत पाकिस्तानची गाठ भारतासोबत पडणार आहे, हे विशेष. चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत स्वप्नवत होणार असल्याची प्रचिती आली आहे. दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर अंतिम लढतीबाबत वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली. या अंतिम लढतीच्या निमित्ताने रविवारी उपखंडातील क्रिकेट ज्वर शिगेला पोहोचलेला असेल, यात कुठलीच शंका नाही.अ‍ॅशेस मालिकेचे आकर्षण अधिक असले तरी भारत-पाकिस्तान सामन्याची कुठल्याही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये रंगत न्यारीच असते. जवळ-जवळ दोन अब्ज लोक सीमेच्या अल्याड-पल्याड क्रिकेटचे चाहते आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटला धर्माचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उभय संघांदरम्यान ज्या वेळी लढत होते ती ब्लॉकबस्टर असते. या लढतीची उंची मोजक्याच खेळांना गाठता येते. भावनांचा बांध फुटतो आणि पराभव कुठल्याही देशाला मान्य नसतो. एका अर्थाने विचार केला तर भारत-पाक केवळ सामना न राहता त्याचा वेगळ्याच पातळीवर विचार केला जातो. दरम्यान, माझ्या मते क्रिकेट हे मूळ आहे.क्रिकेट सुरू असेल तर शत्रुता विसरण्यास भाग पाडते आणि शांतता निर्माण करण्यासाठी विचार करण्याबाबत पुन्हा संधी प्रदान करते. मी भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या राजकीय बाबींवर चर्चा करणार नसून रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत उभय संघांच्या शक्यतेबाबत चर्चा करणार. सध्याच्या घडीला तेच महत्त्वाचे आहे. कागदावर व सध्याच्या फॉर्मचा विचार करता भारत स्पष्टपणे प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येते. श्रीलंकेविरुद्धच्या अपयशानंतरही भारताची अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल शानदार होती. माझ्या मते त्या पराभवानंतर भारतीय संघाला ताळमेळ साधता आला व लयही गवसली. आयसीसी क्रमवारीतील अव्वल संघ दक्षिण आफ्रिकेने भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे गुडघे टेकले. त्या लढतीत लक्ष्याचा पाठलाग करताना भारतापुढे सोपे आव्हान होते. उपांत्य फेरीत बांगलादेशचा तर सुपडा साफ केला. भारताची आघाडीची फळी शानदार आहे. त्यामुळे युवराज सिंग, एम.एस. धोनी व केदार जाधव यांना फलंदाजी करण्याची विशेष संधी मिळाली नाही. तुलना केली तर गोलंदाजीची बाजूही कमकुवत नाही. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली. कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या भूमिकेकडेही डोळेझाक करता येणार नाही. सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या शोधात विराटने प्रसंगी आक्रमकता व कठोरताही दाखविली आहे. कुठल्याही टप्प्यात प्रत्येक सामना जिंकण्याची महत्त्वाकांक्षा व भूक त्याच्यात दिसून आली. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास भारतीय संघ म्हणजे शिकार करण्यास निघालेल्या शिकाऱ्यांचा समूह आहे. भारताच्या उलट पाकिस्तानचे आहे. त्यांनी नशिबाच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारली. सलामी लढतीतील पराभवानंतर डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे ज्या वेळी लढत थांबली त्या वेळी पाकिस्तान विजयाच्या स्थितीत होता, असे म्हणता येईल. अखेरच्या साखळी लढतीत श्रीलंकेच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यास मदत मिळाली. उभय संघांना अनेक चुका करताना बघणे हास्यास्पद होते. शेवटी मनोधैर्य ढासळलेल्या श्रीलंका संघाने एकापाठोपाठ एक झेल सोडले आणि अखेर त्यांना त्याचे मोल द्यावे लागले. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत मैदानावर पाकिस्तान संघाचे एकदम वेगळे रूप अनुभवायला मिळाले. त्यांची गोलंदाजी शानदार होती. युवा हसन अलीने स्वत:ला स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. क्षेत्ररक्षणातही नाट्यमय सुधारणा दिसून आली. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पाकिस्तानला गवसलेला सूर भारतासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मानून सावध व्हायला हवे.या स्पर्धेत अनेक चढ-उतार अनुभवायला मिळाले. खेळात उलटफेर होणे नवी बाब नाही. त्यामुळे भारतीय संघाला गाफिल राहून चालणार नाही. खेळाच्या भाषेत सांगायचे झाल्यास भारताने चेंडूवरील नजर ढळू द्यायला नको.