शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

भारतीय सायकलपटू आशियाई स्पर्धेसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 04:09 IST

पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय सायकलपटू पदकांचा प्रदीर्घ दुष्काळ संपविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत.

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय सायकलपटू पदकांचा प्रदीर्घ दुष्काळ संपविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सायकलिंगची सुरुवात १९५१ मध्ये भारताच्या यजमानपदाखाली झाली होती. त्यात भारतीय खेळाडूंनी एक रौप्य व दोन कांस्य, अशा एकूण तीन पदकांची कमाई केली होती; परंतु त्यानंतर भारतीय संघ या स्पर्धेत कधीही पदक जिंकू शकला नाही.भारतीय सायकलपटू नयना राजेश आणि ई. चाओबा देवी यांची या वेळेस तयारी चांगली असून, संघ पदकाचा दावेदार असेल, असे सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच खेळण्यास सज्ज असणाºया नयनाने म्हटले, ‘आमची तयारी चांगली आहे. मी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत सहभागी होत आहे; परंतु आमचे जास्त लक्ष चार खेळाडूंच्या सांघिक स्पर्धेवर आहे. त्यात आम्ही चांगली कामगिरी करीत आहोत.’ गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारी चाओबा म्हणाली, ‘मी या स्पर्धेत दुसºयांदा जात आहे; परंतु मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा जास्त अनुभव नाही. याआधी मी २0१४ आशियाई आणि २0१६ मध्ये गुवाहाटीत झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला होता. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. यावेळी पदकांची प्रतीक्षा संपेल, अशी आशा आहे. कारण गेल्या काही कालावधीपासून महासंघाने आम्हाला चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत.’भारतीय सायकलिंग महासंघाचे महासचिव ओंकार सिंग म्हणाले, ‘आशियाई स्पर्धेत आमचे १५ खेळाडू सहभागी होत आहेत. स्प्रिटिंग संघ गेल्या तीन महिन्यांपासून जर्मनीत तयारी करीत आहे. वैयक्तिक स्पर्धेतील खेळाडू दिल्लीत तयारी करीत आहेत. पदकांच्या शक्यतेविषयी मी जास्त काही सांगू शकत नाही. आमचा प्रवास तीन वर्षांआधीपासून सुरू झाला आणि पदकापर्यंत पोहोचण्यासाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी हवा.’