शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय बॅडमिंटन : 2017मध्ये पुरुष खेळाडूंनी गाजवले वर्चस्व

By admin | Updated: July 2, 2017 19:57 IST

एस. एस. प्रणय आणि बी. साई प्रणित यांच्या कामगिरीचा सातत्याने उंचावत जाणारा आलेख यामुळे भारतीय बॅडमिंटन वर्तुळासाठी यंदाचे उन्हाळी सत्र समाधानकारक राहिले.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 2 - के. श्रीकांतचा शानदार फॉर्म, एस. एस. प्रणय आणि बी. साई प्रणित यांच्या कामगिरीचा सातत्याने उंचावत जाणारा आलेख यामुळे भारतीय बॅडमिंटन वर्तुळासाठी यंदाचे उन्हाळी सत्र समाधानकारक राहिले. भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंनी महिला खेळाडूंच्या तुलनेत प्रथमच वर्चस्व गाजवले, हे विशेष. सायना नेहवालच्या उदयानंतर महिला एकेरीमध्ये भारताने वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. पी. व्ही. सिंधूचे आघाडीचे स्थान गाठणे म्हणजे महिला बॅडमिंटनपटूंच्या वर्चस्वाचा एक भाग ठरले. २०१० मध्ये सायनाने सिंगापूर, इंडोनेशिया व हाँगकाँग येथे तीन सुपर सिरिज विजेतेपद पटकावले. या व्यतिरिक्त तिने दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदकावर नाव कोरले. या कामगिरीची अद्याप एकाही भारतीय खेळाडूला बरोबरी साधता आलेली नाही. यंदा २०१७ च्या जुलै महिन्यापर्यंत भारतीय बॅडमिंटनपटूंनी सहापैकी चार सुपर सिरिज स्पर्धांमध्ये जेतेपदाचा मान मिळवला. त्यात पी.व्ही. सिंधूने इंडिययन ओपनमध्ये पदकावलेले जेतेपद वगळले तर श्रीकांतच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष खेळाडूंनी यश मिळविल्याचे दिसून येते. श्रीकांतने इंडोनेशिया व आॅस्ट्रेलिया सुपर सिरिज स्पर्धांमध्ये सलग जेतेपद पटकावले तर साई प्रणितने श्रीकांतचा अंतिम फेरीत पराभव करीत सुपर सिरिजच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या दोन खेळाडूंनी जेतेपद पटकावले असताना प्रणयने जकार्तामध्ये आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ली चोंग वेई व रिओ आॅलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता चेन लोंग यांचा पराभव करीत चाहत्यांनी मने जिंकली. श्रीकांतने २०१४ च्या चायन ओपन व २०१५ च्या इंडिया ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवला आहे. श्रीकांत म्हणाला,ह्यगेले दोन आठवडे शानदार होते. केवळ माझ्यासाठीच नाही तर प्रणय व साई यांच्यासाठीही. पुरुष खेळाडूंची एकेरीतील वाटचाल शानदार आहे. आता आमच्याकडे विश्व चॅम्पियनशिपमध्येही पदक पटकावण्याची संधी आहे.प्रणय म्हणाला, बॅडमिंटनची लोकप्रियता वाढत असल्यामुळे आणि मी त्याचा एक भाग असल्यामुळे मला आनंद झाला. आगामी दोन वर्षांमध्ये अव्वल १० मध्ये भारताचे तीन-चार खेळाडू असतील, अशी आशा आहे. भारताच्या सहा बॅडमिंटनपटूंचा जागतिक मानांकनामध्ये अव्वल ३५ मध्ये समावेश आहे. त्यात श्रीकांत, प्रणित व अजय अव्वल २० मध्ये आहेत. आॅलिम्पिक पदक विजेत्या सायना (लंडन आॅलिम्पिक कांस्यपदक) आणि पी.व्ही. सिंधू (रिओ आॅलिम्पिक रौप्य पदक) यांच्यानंतर आता पुरुष खेळाडूंनी आपली छाप सोडणे आवश्यक असल्याचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी म्हटले आहे. गोपीचंद म्हणाले, या खेळाडूंच्या यशामुळे आता पुरुष एकेरीला चांगले व्यासपीठ मिळाले आहे. या खेळाडूंचा कामगिरी बघता आगामी काही महिन्यांमध्ये आम्हाला चांगल्या निकालाची आशा आहे. या खेळाडूंननी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे.आॅगस्ट महिन्यात विश्व चॅम्पियनशिप व्यतिरिक्त काही सुपर सिरिज व सुपर सिरिज प्रीमिअर स्पर्धा होणार आहेत.