शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

By admin | Updated: February 13, 2017 00:12 IST

यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटस्नी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळविले.

बंगळुरू : यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटस्नी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळविले. सलामीवीर प्रकाश जयराम्मैया आणि कर्णधार अजय कुमार रेड्डी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने हा डबल धमाका केला.प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने बदर मुनीरच्या ५७ धावांच्या मदतीने ८ बाद १९७ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने १७.४ षटकांत २00 धावा करून विजय मिळविला. सामनावीर प्रकाशने ९९ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार रेड्डीने ४३ धावा केल्या. याच्यापूर्वी २0१२ मध्ये या दोन संघांत लढत झाली होती. त्यावेळीही भारताने विजय मिळविला होता. आजच्या विजयाने भारताने लीग सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. स्पर्धेत सर्वाधिक ५७0 धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या बदर मुनीर याला स्पर्धावीरचा पुरस्कार देण्यात आला.स्पर्धेत ९ पैकी ८ सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला प्रकाश आणि रेड्डीने पहिल्या विकेटसाठी १0.२ षटकांत ११२ धावांची उत्तुंग सलामी दिली होती. रेड्डी धावचित झाल्यानंतर केतन पटेलने प्रकाशला चांगली साथ दिली. केतनने २६ धावा केल्या. (वृत्तसंस्था)पंतप्रधानांकडून अभिनंदनटी-२० विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय अंध संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, भारताने अंधांचा टी-२० विश्वचषक जिंकल्यामुळे मी खूप खूश आहे. संघाचे अभिनंदन. त्यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. ऐतिहासिक कामगिरीक्रीडामंत्री विजयकुमार गोएल यांनी संघाला पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, अंधांच्या क्रिकेट संघाने क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सोनेरी अध्याय जोडला आहे. रिओ पॅरॉलिम्पिकमधील सफलतेनंतर ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.