शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

अटीतटीच्या लढतीत भारताचा इंग्लंडवर 5 धावांनी विजय

By admin | Updated: January 29, 2017 23:02 IST

इंग्लंड विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताला निसटता विजय मिळवण्यात यश आलं आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - इंग्लंड विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताला निसटता विजय मिळवण्यात यश आलं आहे. इंग्लंडची भारतानं दिलेलं 144 धावांचा पाठलाग करताना पुरती दमछाक उडाली आहे. आशिष नेहराच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आहेत. नेहरानं बिलिंग्स, रॉय आणि स्ट्रोक्सला माघारी धाडून भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. बुमराहनं इंग्लंडच्या रुट आणि बटलरला तंबूत पाठवून भारताचा विजय सुनिश्चित केला. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी आठ धावांची गरज असतानाच बुमराहच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. बुमराहने षटकात दोन विकेट्स घेतल्या असून, इंग्लंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना बुमराहने फलंदाजांना संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. टी-20 मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. जसप्रीत बुमराहला 'मॅन ऑफ द मॅच' या किताबानं गौरविण्यात आलं आहे.इंग्लंडच्या स्ट्रोक्सनं 27 चेंडूंत 2 षटकारांसह 2 चौकार लगावत 38 धावांची खेळी करून इंग्लंडच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. भारताकडून लोकेश राहुलने एकाकी झुंज देताना 71 धावा फटकावल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने यजमान संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण उत्तुंग फटकेबाजी करण्याच्या नादात विराट कोहली 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर रैना (7) आणि युवराज सिंग (4) हे झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला. त्यानंतर राहुल (71) आणि मनीष पांडे (30) यांनी चौथ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी करत संघाला 100 पार पोहोचवले.