शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या लढतीत भारताचा इंग्लंडवर 5 धावांनी विजय

By admin | Updated: January 29, 2017 23:02 IST

इंग्लंड विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताला निसटता विजय मिळवण्यात यश आलं आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - इंग्लंड विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताला निसटता विजय मिळवण्यात यश आलं आहे. इंग्लंडची भारतानं दिलेलं 144 धावांचा पाठलाग करताना पुरती दमछाक उडाली आहे. आशिष नेहराच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आहेत. नेहरानं बिलिंग्स, रॉय आणि स्ट्रोक्सला माघारी धाडून भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. बुमराहनं इंग्लंडच्या रुट आणि बटलरला तंबूत पाठवून भारताचा विजय सुनिश्चित केला. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी आठ धावांची गरज असतानाच बुमराहच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. बुमराहने षटकात दोन विकेट्स घेतल्या असून, इंग्लंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना बुमराहने फलंदाजांना संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. टी-20 मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. जसप्रीत बुमराहला 'मॅन ऑफ द मॅच' या किताबानं गौरविण्यात आलं आहे.इंग्लंडच्या स्ट्रोक्सनं 27 चेंडूंत 2 षटकारांसह 2 चौकार लगावत 38 धावांची खेळी करून इंग्लंडच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. भारताकडून लोकेश राहुलने एकाकी झुंज देताना 71 धावा फटकावल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने यजमान संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण उत्तुंग फटकेबाजी करण्याच्या नादात विराट कोहली 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर रैना (7) आणि युवराज सिंग (4) हे झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला. त्यानंतर राहुल (71) आणि मनीष पांडे (30) यांनी चौथ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी करत संघाला 100 पार पोहोचवले.