शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

आॅस्ट्रेलियाविरूद्ध भारत ३-०ने जिंकेल : भज्जी

By admin | Updated: February 21, 2017 22:02 IST

भारतीय दौऱ्यावर आलेला आॅस्ट्रेलियाचा संघ कमजोर आहे. त्यांनी चांगला खेळ केला तरी, भारतीय संघ ही मालिका ३-०ने जिंकेल, असे भाकीत भारताचा आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने मंगळवारी पुण्यात वर्तवले.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 : भारतीय दौऱ्यावर आलेला आॅस्ट्रेलियाचा संघ कमजोर आहे. त्यांनी चांगला खेळ केला तरी, भारतीय संघ ही मालिका ३-०ने जिंकेल, असे भाकीत भारताचा आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने मंगळवारी पुण्यात वर्तवले.

पुण्यात सुरू असलेल्या २ दिवसीय क्रीडाविषयक साहित्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तो बोलत होता. गेल्या आठवड्यात भज्जीने सध्या भारत दौयावर असलेला आॅस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक कमकुवत असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचा पुनरुच्चार करीत तो म्हणाला, ‘‘या संघात स्टीव्ह वॉ, मार्क वॉ, शेन वॉर्न, ग्लेन मॅग्रा, जस्टीन लँगर यांच्यासारखे दिग्गज नाहीत. तो संघ सगळीकडे जिंकला, केवळ भारताने त्यांची घोडदौड रोखली होती. त्या विजयाने भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी मिळाली होती. त्या संघाच्या तुलनेत आता केवळ स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हेच दोन चांगले खेळाडू आॅस्ट्रेलियाकडे आहेत. यामुळे आतापर्यंतच्या तुलनेतभारत दौऱ्यावर आलेला हा संघ सर्वाधिक कमकुवत आहे.’’

भारतीय कर्णधार विराट कोहलीची भज्जीने मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘‘त्याची भरारी कौतुकास्पद आहे. पहिल्या आयपीएल लिलावाच्या वेळी लालचंद राजपूतने विराटच्या गुणवत्तेची कल्पना दिली होती. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत शानदार कामगिरी केलीय. विराटसमोर परदेशात जिंकण्याचे आव्हान असेल. तो स्वत:देखील ही कामगिरी करून दाखविण्यासाठी उत्सुक असेल,’’ असे भज्जी म्हणाला.