शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भारत उपांत्यफेरी गाठेल : द्रविड

By admin | Updated: March 13, 2016 04:17 IST

अष्टपैलू कामगिरीच्या बळावर यंदा भारतीय संघ टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी नक्की गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केला आहे.

मुंबई : अष्टपैलू कामगिरीच्या बळावर यंदा भारतीय संघ टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी नक्की गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केला आहे. हार्दिक पंड्या आणि पवन नेगी यांच्यासारखे फलंदाज आठव्या व नवव्या स्थानावर चांगली फलंदाजी करू शकतात. याशिवाय सहा किंवा सात गोलंदाजदेखील आहेत. आशिष नेहरा चांगली गोलंदाजी करीत असून, बुमराह देखील डेथ ओव्हरमध्ये प्रभावी ठरतो. एकूणच संघ बलाढ्य असून, संघाची अष्टपैलू कामगिरी विश्वचषकात चॅम्पियन बनण्यास कारणीभूत ठरेल, असे द्रविडचे मत आहे. वन डे आणि टी-२० सामन्यात देखणी कामगिरी केल्याचे बक्षीस भारतीय संघाला रँकिंगच्या रूपाने मिळाले आहे. कसोटीतही भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे. आता विदेश दौऱ्यात यश मिळविण्याचे आव्हान असेल. लंकेत विजय मिळाल्याने भारतीय संघात उत्साहाचा संचार झाला असून, आता भारतीय उपखंडाबाहेरदेखील असेच यश मिळेल, अशी आशा आहे.विश्वचषकाचे अन्य दावेदार कोण, असा सवाल करताच राहुल द्रविडने आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेचा उल्लेख केला. या दोन्ही संघांत चांगले मॅचविनर असल्याचे द्रविडचे मत होते. आॅस्ट्रेलिया संघात अखेरपर्यंत झुंजण्याची क्षमता आहे. त्यांचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये असल्याने भारतात खेळण्याचा या खेळाडूंना मोठा अनुभव आहे. येथील परिस्थितीशी हे खेळाडू एकरूप झाले आहेत. द. आफ्रिकेकडेही एबी डिव्हिलियर्स, क्वींटन डिकॉक आणि हशिम आमला यांचा समावेश असल्याने हा संघदेखील धोकादायक वाटतो; पण द. आफ्रिका मोक्याच्या क्षणी ढेपाळत असल्याने या संघाचे काही खरे नाही, असेही द्रविडने नमूद केले. (वृत्तसंस्था) भारत या स्पर्धेत सर्वांत बलाढ्य संघ असल्याने जेतेपदाचा प्रबळ दावेदारही आहे.’ भारतीय संघ आघाडीच्या चार संघांत स्थान नक्की पटकावेल; पण उपांत्य सामने आणि अंतिम सामन्यात कुठला संघ कशी कामगिरी करतो, यावर चॅम्पियन ठरणार आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू असून, पुढील २४ महिन्यांत रोमहर्षक क्रिकेट अनुभवायला मिळणार आहे. सध्याच्या भारतीय संघात तिन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरणारे खेळाडू आहेत, ही चांगली बाब म्हणावी लागेल. - राहुल द्रविड