शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

भारत उपांत्यफेरी गाठेल : द्रविड

By admin | Updated: March 13, 2016 04:17 IST

अष्टपैलू कामगिरीच्या बळावर यंदा भारतीय संघ टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी नक्की गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केला आहे.

मुंबई : अष्टपैलू कामगिरीच्या बळावर यंदा भारतीय संघ टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी नक्की गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केला आहे. हार्दिक पंड्या आणि पवन नेगी यांच्यासारखे फलंदाज आठव्या व नवव्या स्थानावर चांगली फलंदाजी करू शकतात. याशिवाय सहा किंवा सात गोलंदाजदेखील आहेत. आशिष नेहरा चांगली गोलंदाजी करीत असून, बुमराह देखील डेथ ओव्हरमध्ये प्रभावी ठरतो. एकूणच संघ बलाढ्य असून, संघाची अष्टपैलू कामगिरी विश्वचषकात चॅम्पियन बनण्यास कारणीभूत ठरेल, असे द्रविडचे मत आहे. वन डे आणि टी-२० सामन्यात देखणी कामगिरी केल्याचे बक्षीस भारतीय संघाला रँकिंगच्या रूपाने मिळाले आहे. कसोटीतही भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे. आता विदेश दौऱ्यात यश मिळविण्याचे आव्हान असेल. लंकेत विजय मिळाल्याने भारतीय संघात उत्साहाचा संचार झाला असून, आता भारतीय उपखंडाबाहेरदेखील असेच यश मिळेल, अशी आशा आहे.विश्वचषकाचे अन्य दावेदार कोण, असा सवाल करताच राहुल द्रविडने आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेचा उल्लेख केला. या दोन्ही संघांत चांगले मॅचविनर असल्याचे द्रविडचे मत होते. आॅस्ट्रेलिया संघात अखेरपर्यंत झुंजण्याची क्षमता आहे. त्यांचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये असल्याने भारतात खेळण्याचा या खेळाडूंना मोठा अनुभव आहे. येथील परिस्थितीशी हे खेळाडू एकरूप झाले आहेत. द. आफ्रिकेकडेही एबी डिव्हिलियर्स, क्वींटन डिकॉक आणि हशिम आमला यांचा समावेश असल्याने हा संघदेखील धोकादायक वाटतो; पण द. आफ्रिका मोक्याच्या क्षणी ढेपाळत असल्याने या संघाचे काही खरे नाही, असेही द्रविडने नमूद केले. (वृत्तसंस्था) भारत या स्पर्धेत सर्वांत बलाढ्य संघ असल्याने जेतेपदाचा प्रबळ दावेदारही आहे.’ भारतीय संघ आघाडीच्या चार संघांत स्थान नक्की पटकावेल; पण उपांत्य सामने आणि अंतिम सामन्यात कुठला संघ कशी कामगिरी करतो, यावर चॅम्पियन ठरणार आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू असून, पुढील २४ महिन्यांत रोमहर्षक क्रिकेट अनुभवायला मिळणार आहे. सध्याच्या भारतीय संघात तिन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरणारे खेळाडू आहेत, ही चांगली बाब म्हणावी लागेल. - राहुल द्रविड