शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारत प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार

By admin | Updated: June 24, 2015 05:31 IST

बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमाविल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघापुढे बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या वन-डे लढतीत प्रतिष्ठा राखण्यासह

मीरपूर : बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमाविल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघापुढे बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या वन-डे लढतीत प्रतिष्ठा राखण्यासह यजमान संघाला क्लीन स्वीप करण्यापासून रोखण्याचे आव्हान आहे. पहिल्या दोन लढतींत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ टीकेचे लक्ष्य ठरला आहे, पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघसहकाऱ्यांची पाठराखण करताना संघात उपलब्ध सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असल्याचे म्हटले आहे. पहिल्या लढतीत ७९ धावांनी पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या लढतीत ६ गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्ही लढतींत यजमान संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात भारतीय संघापेक्षा सरस कामगिरी केली. भारतीय संघ अखेरच्या लढतीत विजयासह आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. यंदा विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघासाठी मालिकेत ‘व्हाईटवॉश’लाजीरवाणी बाब ठरेल. आत्मविश्वास उंचावलेल्या बांगलादेश संघाला पराभूत करण्यासाठी भारतीय संघाला खेळाच्या प्रत्येक विभागात सरस कामगिरी करावी लागेल. आघाडीच्या फळीतील फलंदाज चांगल्या फॉर्मात नसून मधल्या फळीतील फलंदाजही उपयुक्त भागीदारी करण्यात अपयशी ठरले आहेत. उमेश यादव व मोहित शर्मा यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांना बांगलादेशातील खेळपट्ट्यांवर धावगतीवर अंकुश राखण्यात अपयश आले. फिरकीपटू अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांनाही छाप सोडता आली नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करताना बांगलादेशने खेळाच्या प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्वक्रिकेटमध्ये त्यांचा दर्जा उंचावत असल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानला अलीकडेच क्लीनस्वीप देणाऱ्या मशरफी मूर्तजाच्या नेतृत्वाखालील संघ भारताविरुद्धही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास प्रयत्नशील आहे. बांगलादेशच्या फलंदाजांनी दोन्ही लढतींत चमकदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात ३०७ धावा फटकाविणाऱ्या बांगलादेशला गोलंदाजीमध्ये नवा हीरो मुस्तफिजूर रहमान गवसला आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या दोन सामन्यांत ११ बळी घेत इतिहास नोंदवताना भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे.आकड्यांचा विचार करता, बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत भारताचे पारडे वरचढ भासत असले, तरी फॉर्मचा विचार करता बांगलादेश क्लीन स्वीपचा प्रबळ दावेदार आहे. आपण क्लीन स्वीप करण्याचे अतिरिक्त दडपण घेणार नसल्याचे बांगलादेशाचा कर्णधार मूर्तजाने स्पष्ट केले. मूर्तजा म्हणाला, ‘‘कसलेच दडपण नाही. मालिकेपूर्वी कुणीच भाष्य केले नव्हते, की आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरू.’’ भारतानेही आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसल्यामुळे आम्ही मैदानावर केवळ खेळाचा आनंद घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धोनी म्हणाला, ‘‘आमच्याकडे उपलब्ध सर्वोत्तम खेळाडू आहेत; पण त्यांना येथील परिस्थितीसोबत जुळवून घेता आलेले नाही.’’रविवारी पराभवानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, ‘‘उपखंडात खेळताना अतिरिक्त फिरकीपटूसह खेळायचे किंवा नाही, याचा विचार करावा लागेल. भुवनेश्वर कुमार वेगाने मारा करीत नाही; पण तरी तो धावगतीवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरतो. त्यामुळे सर्वोत्तम समतोल कसा राखता येईल, यावर लक्ष द्यावे लागेल.’’(वृत्तसंस्था)