शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपांत्य लढतीत भारतीय पूर्ण क्षमतेने लढतील : शास्त्री

By admin | Updated: March 31, 2016 03:11 IST

‘‘आतापर्यंत आम्ही स्पर्धेत आमच्या क्षमतेच्या तुलनेत केवळ ७०% खेळ केला असल्याचे माझे अजूनही ठाम मत आहे. अजूनही कामगिरीत सुधारणा करता येऊ शकते आणि गुरुवारी

‘‘आतापर्यंत आम्ही स्पर्धेत आमच्या क्षमतेच्या तुलनेत केवळ ७०% खेळ केला असल्याचे माझे अजूनही ठाम मत आहे. अजूनही कामगिरीत सुधारणा करता येऊ शकते आणि गुरुवारी होणाऱ्या सामन्यात आम्ही पूर्ण क्षमतेने खेळू अशी आशा आहे,’’ असे मत भारतीय संघाचे निर्देशक रवी शास्त्री यांनी मांडले. त्याचवेळी त्यांनी संघातील इतर खेळाडूंनीही पूर्ण क्षमतेने खेळ करण्याची गरज असल्याचे सांगितले.वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांतय सामन्याच्या पूर्वसंध्येला शास्त्री यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘अजूनपर्यंत संघाची क्षमतेनुसार पूर्ण कामगिरी झालेली नाही. सर्वच प्रमुख खेळाडू आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरले असले तरी, उपांत्य लढतीत रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना नक्कीच स्वत:ला सिद्ध करतील.’’ त्याचबरोबर, ‘‘उपांत्य फेरीच्या या निर्णायक लढतीत संघाचा सर्वोत्तम खेळ होणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही केवळ एखाद - दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी ६ - ७ खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची संघाला आवश्यकता आहे. स्पर्धेत आतापर्यंत असे झाले नसले, तरी उपांत्य लढतीत असा खेळ होण्याची शक्यता आहे,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.