शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

उपांत्य लढतीत भारतीय पूर्ण क्षमतेने लढतील : शास्त्री

By admin | Updated: March 31, 2016 03:11 IST

‘‘आतापर्यंत आम्ही स्पर्धेत आमच्या क्षमतेच्या तुलनेत केवळ ७०% खेळ केला असल्याचे माझे अजूनही ठाम मत आहे. अजूनही कामगिरीत सुधारणा करता येऊ शकते आणि गुरुवारी

‘‘आतापर्यंत आम्ही स्पर्धेत आमच्या क्षमतेच्या तुलनेत केवळ ७०% खेळ केला असल्याचे माझे अजूनही ठाम मत आहे. अजूनही कामगिरीत सुधारणा करता येऊ शकते आणि गुरुवारी होणाऱ्या सामन्यात आम्ही पूर्ण क्षमतेने खेळू अशी आशा आहे,’’ असे मत भारतीय संघाचे निर्देशक रवी शास्त्री यांनी मांडले. त्याचवेळी त्यांनी संघातील इतर खेळाडूंनीही पूर्ण क्षमतेने खेळ करण्याची गरज असल्याचे सांगितले.वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांतय सामन्याच्या पूर्वसंध्येला शास्त्री यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘अजूनपर्यंत संघाची क्षमतेनुसार पूर्ण कामगिरी झालेली नाही. सर्वच प्रमुख खेळाडू आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरले असले तरी, उपांत्य लढतीत रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना नक्कीच स्वत:ला सिद्ध करतील.’’ त्याचबरोबर, ‘‘उपांत्य फेरीच्या या निर्णायक लढतीत संघाचा सर्वोत्तम खेळ होणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही केवळ एखाद - दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी ६ - ७ खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची संघाला आवश्यकता आहे. स्पर्धेत आतापर्यंत असे झाले नसले, तरी उपांत्य लढतीत असा खेळ होण्याची शक्यता आहे,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.