शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत चांगली कामगिरी करेल, ‘गोल्डन बॉय’ने व्यक्त केला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 05:25 IST

‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली असून स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास ठळकपणे भारताचे यश दिसून येईल. पुढील वर्षी आॅस्टेÑलियामध्ये होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय संघ नक्कीच चमकदार कामगिरी करेल,’ असा विश्वास भारताचा दिग्गज नेमबाज आणि एकमेव आॅलिम्पिक सुवर्णपदकविजेता अभिनव बिंद्राने व्यक्त केला.

मुंबई : ‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली असून स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास ठळकपणे भारताचे यश दिसून येईल. पुढील वर्षी आॅस्टेÑलियामध्ये होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय संघ नक्कीच चमकदार कामगिरी करेल,’ असा विश्वास भारताचा दिग्गज नेमबाज आणि एकमेव आॅलिम्पिक सुवर्णपदकविजेता अभिनव बिंद्राने व्यक्त केला.मुंबईत सोमवारी टुरिझम आॅस्टेÑलियाच्या वतीने आगामी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी केलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. या वेळी, बिंद्राने भारताच्या कामगिरीबाबत विश्वास व्यक्तकेला. बिंद्रा म्हणाला, ‘राष्ट्रकुल स्पर्धा प्रत्येक अ‍ॅथलिटच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची स्पर्धा असते. राष्ट्रकुल, आशियाई अशा महत्त्वाच्या स्पर्धेत छाप पाडून प्रत्येक खेळाडू स्वत:ला प्रतिष्ठेच्या आॅलिम्पिकसाठी सज्ज करत असतो. प्रत्येक स्पर्धेत खेळाचा दर्जा वेगळा असतो आणि प्रत्येक दर्जा हा महत्त्वाचा ठरतो.’भारतीय नेमबाजीविषयी बिंद्राने म्हटले, ‘नेमबाजीबाबत सांगायचे झाल्यास भारतासाठी राष्ट्रकुलच्या तुलनेत आशियाई स्पर्धा अधिक खडतर असते, कारण तिथे बलाढ्य चीनचा सामना करायचा असतो. असे असले तरी राष्ट्रकुल स्पर्धेचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. प्रत्येक खेळासाठी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत वेगळा स्तर असतो.’ त्याचप्रमाणे, ‘नवीन नियमानुसार नेमबाजीची अंतिम फेरीशून्यापासून सुरू होते आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक खेळाडूलासंधी असते. त्यामुळे भारतीयांसाठी ही स्पर्धा खूप मोठे आव्हान ठरेल,’ असेही बिंद्राने म्हटले.विश्वचषकच्या तुलनेत आॅलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अपयशी ठरतात यावर बोलताना बिंद्रा म्हणाला, ‘विश्वचषक आणि आॅलिम्पिक पूर्णपणे वेगळ्या स्पर्धा आहेत. विश्वचषकाच्या चार-पाच स्पर्धा दरवर्षी खेळवल्या जातात, तर आॅलिम्पिक स्पर्धा चार वर्षांतून एकदा होेते, त्यामुळे आॅलिम्पिकसाठी मजबूत तयारी करावी लागते. विश्वचषकाच्या पहिल्या स्पर्धेत चांगली कामगिरी न झाल्यास तुम्हाला लगेच दोन आठवड्यांनी दुसरी संधी मिळते. पण आॅलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरीला पर्याय नसतो.’त्याचप्रमाणे, ‘मी जीएसटीचा अभ्यास केलेला नाही. परंतु, जीएसटीमुळे क्रीडासाहित्य किमती वाढल्या असल्याचे ऐकले आहे. जर हे खरं असेल, तर खेळाडूंसाठी खूप चिंतेची बाब असेल. इतर क्रीडाप्रकारापेक्षा नेमबाजी खर्चिक खेळ असून जर साहित्यांच्याकिमती खरंच वाढल्या असतील, तर खेळाडूंपुढे नवे आव्हान असेल. मला आशा आहे याबाबत नक्कीच काही तरी सकारात्मक बाब घडेल,’ असेही बिंद्राने म्हटले.मी कारकिर्दीमध्ये एकूण पाच आॅलिम्पिक स्पर्धा खेळलो आणि यामध्ये सिडनी आॅलिम्पिक माझी आवडती स्पर्धा आहे. आॅस्टेÑलियन्सकडून मला खूप प्रेम मिळाले. तसेच, सिडनी आॅलिम्पिकमध्ये मी १० किंवा ११ व्या स्थानी राहिलेलो, पण या स्पर्धेतूनच एक दिवस मी सुवर्णपदक पटकावू शकतो, असा विश्वास मिळाला.- अभिनव बिंद्रा