शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भारत अव्वल ५० देशांमध्ये नक्की येईल

By admin | Updated: July 29, 2016 01:14 IST

भारतात सध्या रग्बीचा जोर वाढत असून युवांमध्ये रग्बीचे क्रेझ वाढत आहे. गेल्या काही वर्षांत भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही छाप पाडली असून येणाऱ्या काही वर्षांत नक्कीच भारत

मुंबई : भारतात सध्या रग्बीचा जोर वाढत असून युवांमध्ये रग्बीचे क्रेझ वाढत आहे. गेल्या काही वर्षांत भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही छाप पाडली असून येणाऱ्या काही वर्षांत नक्कीच भारत अव्वल ५० संघांमध्ये असेल, असा विश्वास आशियाई रग्बी संघटनेचे उपाध्यक्ष आगा हुसैन यांनी केले. भारतात रग्बी खेळाचा अधिक प्रसार करण्यासाठी आणि राष्ट्रीय संघाला सहाकार्य करण्यासाठी नुकताच भारतीय रग्बी संघटनेने आंतरराष्ट्रीय रग्बी क्षेत्रातील नावाजलेल्या प्रायोजकासह करार केला. या अंतर्गत बुधवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आगा यांनी आपले मत व्यक्त केले.‘‘जागतिक क्रमवारीत सध्या भारतीय संघ ७७ व्या स्थानी आहे. तर ३२ संघांच्या आशियाई क्रमवारीत भारतीय संघ १२व्या स्थानी आहे. पुढील पाच वर्षांमध्ये भारतीय रग्बीला असेच आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळत राहिले, तर नक्कीच जगातील अव्वल ५० देशांमध्ये भारताचा समावेश झालेला पाहण्यास मिळेल,’’ असेही आगा यांनी यावेळी सांगितले.रग्बी इंडियाचे जनरल सेक्रेटरी महेश मथाई यांनी सांगितले की, ‘‘काही वर्षांपासून रग्बीला भारतात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुर्वी एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित असलेला हा खेळ आज देशातील प्रत्येक राज्यात खेळला जात आहे. विशेष म्हणजे शालेय खेळाडूंसह महिला खेळाडूंचाही मोठ्या प्रमाणात सहभाग झाला असल्याने खऱ्या अर्थाने हा खेळ आज भारतात रुजू लागला आहे. ’’ (क्रीडा प्रतिनिधी)