शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भारत आॅलिम्पिकची दावेदारी करणार?

By admin | Updated: April 4, 2015 04:10 IST

भारत २०२४मध्ये आॅलिम्पिकचे आयोजन करू शकतो का, ही शक्यता तपासण्यासाठी केंद्र शासन आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय

नवी दिल्ली : भारत २०२४मध्ये आॅलिम्पिकचे आयोजन करू शकतो का, ही शक्यता तपासण्यासाठी केंद्र शासन आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांना आमंत्रित केले आहे.देशात क्रीडा विकास तसेच आॅलिम्पिकची संभाव्य दावेदारी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बाक यांची चर्चा होणार आहे. २०१३मध्ये आयओसी प्रमुख बनलेले बाक हे येत्या २७ एप्रिल रोजी भारतात येतील. बाक यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. जर्मनीसाठी तलवारबाजी या खेळात आॅलिम्पिक खेळलेले बाक यांना स्वित्झर्लंडमधील लुसाने येथील आयओसीच्या मुख्यालयात क्रीडा सचिव अजित शरण आणि आयओए अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी भारत भेटीचे आमंत्रण दिले. बाक हे या संदर्भात आयओसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आजच चर्चा करणार आहेत. आम्ही २०२४च्या आॅलिम्पिक आयोजनाला इच्छुक आहोत; पण सध्या तरी कुठलीही औपचारिक माहिती उघड करणार नाही, असे आयओएच्या सूत्रांनी स्पष्ट केले. बाक हे भारतात आॅलिम्पिक विकासाबाबत उत्सुक आहेत. येत्या काही वर्षांत आॅलिम्पिक मोहीम राबविण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो, असे बाक यांचे मत असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी हे या महिन्यात बाक यांच्याशी दिल्लीत चर्चा करतील, या वृत्तास रामचंद्रन यांनी दुजोरा दिला; पण २०२४च्या आॅलिम्पिक दावेदारीसंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया मात्र दिली नाही. ते म्हणाले, ‘‘भारतीय क्रीडाविकासावर चर्चा करण्यासाठी मोदी यांनी डॉ. बाक यांना या महिन्यात आमंत्रित केले आहे. तारखेचा निर्णय मात्र आयओसी आणि पंतप्रधान कार्यालय घेणार आहेत. दोन्ही व्यक्ती अतिविशिष्ट असल्यामुळे दोघांच्या कार्यालयांमार्फत ही तारीख निश्चित केली जाईल.’’२०१६चे आॅलिम्पिक ब्राझीलच्या रियो दि जानिरो शहरात होत आहे. जपानची राजधानी टोकियो येथे २०२०चे आॅलिम्पिक होणार आहे. २०२४साठी इच्छुक शहरांनी सरकारचे अर्ज तसेच गॅरंटी पत्रे आयओसीकडे सप्टेंबरपर्यंत सोपवायची आहेत. कार्यसमिती अर्जांची छाननी केल्यानंतर आयओसीच्या कार्यकारी बोर्डापुढे ठेवेल तसेच पुढील मेमध्ये चढाओढीत असलेल्या शहरांची औपचारिक घोषणा केली जाईल. त्यानंतर १५ सप्टेंबर २०१७ ला पेरूतील लिमा शहरात आयओसीच्या १३०व्या अधिवेशनादरम्यान यजमान सत्रासाठी मतदान होणार आहे. (वृत्तसंस्था)