शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

भारत-वेस्टइंडिज मालिका जुलैत

By admin | Updated: December 24, 2015 23:55 IST

भारत-वेस्टइंडिज संघात क्रिकेट सामन्यांवरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी जुलै-आॅगस्टमध्ये वेस्टइंडिज दौरा करण्यात येणार आहे.

सेंट जोन्स : भारत-वेस्टइंडिज संघात क्रिकेट सामन्यांवरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी जुलै-आॅगस्टमध्ये वेस्टइंडिज दौरा करण्यात येणार आहे. या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर व वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव कॅमरन यांच्यातील चर्चेनंतर या दौऱ्याची घोषणा करण्यात आली. विंडीज क्रिकेट संघाने आपल्या बोर्डासोबत झालेल्या वादामुळे मागच्यावर्षी आॅक्टोबरमध्ये भारताचा दौरा अर्ध्यावर रद्द केला होता. त्यावर बीसीसीआयने आश्चर्य व्यक्त करीत विंडीजला तंबी दिली होती. विंडीजने काढता पाय घेताच बीसीसीआयने तातडीने श्रीलंकेला वन डे मालिका खेळण्यासाठी पाचारण केले होते. विंडीज बोर्डाने मात्र आपल्या खेळाडूंच्या गैरवर्तणुकीबद्दल बीसीसीआयची माफी मागितली होती. तो अर्धवट सोडलेला दौरा पूर्ण करण्याची विंडीज बोर्डाची इच्छा आहे. डब्ल्यूआयसीबी अध्यक्ष डेव्ह कॅमेरून यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. विंडीज २०१६ मध्ये भारतीय संघाला आपल्या देशात आमंत्रित करणार असल्याची माहिती कॅमेरून यांनी चर्चेनंतर दिली. आॅक्टोबर २०१४ मध्ये आयोजित हा दौरा वेळेआधी संपविण्यासाठी आमचे खेळाडू दोषी आहेत; पण ती उणीव भरून काढावी लागेल. (वृत्तसंस्था)