शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

भारत वि. पाकिस्तान : क्रिकेट नव्हे मैदान ए जंग !

By admin | Updated: June 18, 2017 09:34 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ समोर असल्याने सामन्याला अधिकच महत्त्व आलंय. अगदी जे क्रिकेटचे नियमित प्रेक्षक नाहीत,अशांनीही वेळात वेळ काढलाय.

- बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत
अखेर आज तो दिवस उजाडला, ज्या दिवसाची सव्वाशे कोटी भारतीय क्रिकेटप्रेमी गेल्या पंधरवड्यापासून प्रतीक्षा होती. आज होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी ओव्हलच्या मैदानात उतरेल. त्यात अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ समोर असल्याने सामन्याला अधिकच महत्त्व आलंय. अगदी जे क्रिकेटचे नियमित प्रेक्षक नाहीत, अशांनीही वेळात वेळ काढलाय. देवांना नवससायास बोलणे सुरू आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर दोन्ही संघांचे समर्थक एकमेकांवर शेलक्या भाषेत शरसंधान करताहेत. एकंदरीत सामन्यासाठी जबरदस्त माहौल तयार झालाय. त्यामुळेच की काय दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीला महायुद्ध, मैदान ए जंगचं स्वरूप आलं आहे.            पाकिस्तानचा आपल्यासोबतचा राजकीय इतिहास, तणावाचे संबंध यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा कधीच खेळ राहत नाही. तर ते असते मैदानावरील युद्ध. हे आज नाही गेल्या 65 वर्षांपासून सुरू आहे. अगदी सुरुवातीच्या काळात कसोटी क्रिकेटच्या युगात तर दोन्ही संघ पराभवाची नामुष्की नको म्हणून सामना अनिर्णित कसा राहील, याची खबरदारी घेत. मध्यंतरीच्या काळात एकदिवसीय सामन्यांचे प्रमाण वाढल्यावर मात्र पाकिस्तानी संघ आपल्याला वरचढ ठरला होता. पण गेल्या 15 - 20 वर्षांत आपण त्या पराभवांचा बॅकलॉग बऱ्यापैकी भरून काढलाय. ताणलेल्या राजकीय संबंधांमुळे दोन्ही संघांमधील द्विपक्षीय मालिका पूर्णपणे बंद झाल्यात, भारतीय संघाने संधी मिळेल तिथे पाकिस्तानला झोडपण्याचा धडाका लावलाय. 
(भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरीजबद्दल काय म्हणाले अमित शहा)
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा आम्ही फार दबाव घेणार नाही.  इतर सामन्यांसारखाच खेळ करू, असे भारताचा  विराट कोहली म्हणालाय, पण वस्तुस्थिती काय आहे, विराटलाही माहित आहे. या सामन्यातील चांगल्या किंवा वाईट कामगिची आठवण क्रिकेटप्रेमींच्या मनात, हृदयात आणि इतिहासाच्या पानात कायमची कोरली जाऊ शकते, याचीही जाणीव दोन्ही बाजूच्या खेळाडूंना आहे. म्हणूनच शारजात  जावेद मियाँदादने शेवटच्या चेंडूवर चेतन शर्माला मारलेला षटकार आठवला की भारताती क्रिकेटप्रेमींच्या काळजात धस्स होते. तर मिसबाचा झेल टिपून भारतीय संघाने साजरे केलेल्या पहिल्यावहिल्या ट्वेंटी-20 विश्वचषकाला घातलेली गवसणी आठवली की अभिमानाने उर भरून येतो. त्यामुळेच की काय काळ बदलला तरी दोन्ही देश आणि त्यांच्या संघांमधील हे द्वंद्व आजही तेवढ्याच ईर्षेने खेळले जाते. 
(पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक! )(सेहवागने केला सर्फराज अहमदचा बचाव)
आज लंडनमधील ओव्हलचे मैदनही दोन्ही संघांमधील महायुद्धाची रणभूमी होणार आहे. या संग्रामासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. नशिबाची साथ आणि उत्तरोत्तर उंचावलेला खेळ याच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारणारा  पाकिस्तानी संघ आज भारताला धक्का देण्यासाठी इच्छुक असेल. त्यांच्याकडे अझहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, कर्णधार सर्फराझ अहमद तर गोलंदाजीत मोहम्मह आमीर असा तगडा फौजफाटा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. पण विराटसेनाही सध्या उत्साहाने भारलेली आहे. आघाडीच्या फळीत रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या त्रिदेवांचा जबरदस्त फॉर्म, त्यांना मधल्या फळीत युवराज, धोनी आणि केदार जाधव यांच्याकडून मिळणारी सुरेख साथ, इंग्लंडच्या वातावरणात बहरलेली गोलंदाजी यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानी संघाच्या आव्हानाची फारशी फिकिर नसेल. त्यातच 2007 साली ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीत पाकिस्तानविरुद्ध खेळलेले महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि रोहित शर्मा असे खेळाडू भारतीय संघात आहेत, त्यांच्या अनुभवही कामी येईल. मैदानात उतरल्यावर थोडी खबरदारी घेतली तरी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या हाती असेल. बाकी पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी  आपल्याला अधुनमधून मिळत राहील. पण पाकिस्तानला जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीत लोळवण्याचा "मौका" कधीतरीच मिळतो. विराटसेनेने संधीचे सोने करावे हीच भारतीय संघाच्या पाठीराख्यांची अपेक्षा असेल. तेव्हा मिला है मौका मार दो चौका!