शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

भारताला विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: November 16, 2014 17:19 IST

भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाने श्रीलंकेला तारले असून लंकेने भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. १६ - भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाने श्रीलंकेला तारले असून लंकेने भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मॅथ्यूजच्या नाबाद १३९ धावा आणि लाहिरु तिरिमानेच्या ५२ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने ५० षटकात आठ गडी गमावत २८६ धावांची समाधानकारक धावसंख्या गाठली. 
रांचीतील पाचव्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र या सामन्यातही श्रीलंकेचे सलामीवीर अपयशी ठरले. निरोशन डिकोवाला आणि तिलकरत्ने दिलशान हे सलामीवीर अवघ्या ४५ धावांमध्येच तंबूत परतले. त्यापाठोपाठ चांदीमल आणि जयवर्धने हे दोघेही स्वस्तात माघारी परतल्यामुळे श्रीलंकेची अवस्था ४ बाद ८५ अशी झाली होती. मात्र त्यानंतर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि थिरिमाने या जोडीने संयमी खेळी करत लंकेची वाताहत रोखली. या जोडीने १२८ धावांची भागीदारी केली. अखेर ५२ धावांवर असताना थिरिमानेला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. तळाच्या फलंदाजांकडून अपेक्षीत साथ मिळत नसतानाही मॅथ्यूजने जोरदार फटकेबाजी करत शतकही झळकावले व संघालाही सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मॅथ्यूजने ११६ चेंडूमध्ये १३९ धावा केल्या. विशेष म्हणजे १३७ सामन्यानंतर मॅथ्यूजने एकदिवसीय सामन्यात आपले पहिले वहिले शतक ठोकले. अजंता मेंडिस, सीकुगे प्रसन्ना हे फलंदाज भोपळा न फोडताच बाद झाले. भारतातर्फे धवल कुलकर्णीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल आणि आर. अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. स्टुअर्ट बिन्नीला फक्त एकच विकेट घेता आली.  पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत ४- ० ने आघाडीवर असून पाचवा सामना जिंकून लंकेला क्लीन स्वीप देण्यास भारतीय संघ प्रयत्नशील आहे.