शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

भारताचा मालिका विजय

By admin | Updated: June 18, 2014 05:45 IST

स्टुअर्ट बिन्नी आणि मोहित शर्मा यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डेमध्ये यजमान बांगलादेशचा ४७ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळविली.

मीरपूर : स्टुअर्ट बिन्नी आणि मोहित शर्मा यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डेमध्ये यजमान बांगलादेशचा ४७ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळविली. पावसाच्या व्यत्ययामुळे अडीच तासांचा वेळ वाया गेला. त्यामुळे उशिरा प्रारंभ झालेली ही लढत पंचांनी प्रत्येकी ४१ षटकांची खेळविण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांच्या निराशाजक कामगिरीमुळे भारताचा डाव २५.३ षटकांत १०५ धावांत संपुष्टात आला, पण मोहित व बिन्नी यांनी अचूक मारा करीत भारताला विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यजमान बांगलादेशचा डाव १७.४ षटकांत ५८ धावांत संपुष्टात आला. प्रतिस्पर्धी संघाचा भारताविरुद्ध हा धावसंख्येचा निचांक ठरला. कारकीर्दीतील तिसरा सामना खेळणारा कर्नाटकचा गोलंदाज बिन्नीने ४.४ षटकांत ४ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. भारतातर्फे वन-डे क्रिकेटमधील ही गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने त्याला योग्य साथ देताना ८ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. बांगलादेशतर्फे मिथुन अली (२६) आणि मुशफिकर रहिम (११) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात अपयश आले. त्याआधी, पदार्पणाची लढत खेळणारा युवा वेगवान गोलंदाज तास्किन अहमदच्या (५-२८) अचूक माऱ्याच्या जोरावर बांगला देशने दुसऱ्या वन-डे सामन्यात पाहुण्या भारताचा डाव १०५ धावांत गुंडाळला. अहमदच्या अचूक माऱ्यापुढे भारताचा डाव २५.३ षटकांत १०५ धावांत संपुष्टात आला. बांगलादेशविरुद्ध भारताचा हा धावसंख्येचा निचांक ठरला. मशर्रफ मुर्तझाने अहमदला योग्य साथ देताना ३५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. १९ वर्षीय तास्किन पदार्पणाच्या सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी करणारा बांगला देशचा पहिला तर जगातील आठवा गोलंदाज ठरला. कर्णधार सुरेश रैनाने २७ धावा फटकाविल्या तर त्यानंतर ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या उमेश यादवने १३ चेंडूंमध्ये १७ धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजारा व सुरेश रैना यांनी चौथ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. भारताच्या डावातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. नाणेफेक गमाविल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे (०) माघारी परतला. सहाव्या षटकांत पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी भारताची १ बाद १४ अशी स्थिती होती. भारताच्या डावात रैना व यादव वगळता रॉबिन उथप्पा (१४) व चेतेश्वर पुजारा (११) दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात यशस्वी ठरले. (वृत्तसंस्था)