शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा मालिका विजय

By admin | Updated: June 18, 2014 05:45 IST

स्टुअर्ट बिन्नी आणि मोहित शर्मा यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डेमध्ये यजमान बांगलादेशचा ४७ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळविली.

मीरपूर : स्टुअर्ट बिन्नी आणि मोहित शर्मा यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डेमध्ये यजमान बांगलादेशचा ४७ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळविली. पावसाच्या व्यत्ययामुळे अडीच तासांचा वेळ वाया गेला. त्यामुळे उशिरा प्रारंभ झालेली ही लढत पंचांनी प्रत्येकी ४१ षटकांची खेळविण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांच्या निराशाजक कामगिरीमुळे भारताचा डाव २५.३ षटकांत १०५ धावांत संपुष्टात आला, पण मोहित व बिन्नी यांनी अचूक मारा करीत भारताला विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यजमान बांगलादेशचा डाव १७.४ षटकांत ५८ धावांत संपुष्टात आला. प्रतिस्पर्धी संघाचा भारताविरुद्ध हा धावसंख्येचा निचांक ठरला. कारकीर्दीतील तिसरा सामना खेळणारा कर्नाटकचा गोलंदाज बिन्नीने ४.४ षटकांत ४ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. भारतातर्फे वन-डे क्रिकेटमधील ही गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने त्याला योग्य साथ देताना ८ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. बांगलादेशतर्फे मिथुन अली (२६) आणि मुशफिकर रहिम (११) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात अपयश आले. त्याआधी, पदार्पणाची लढत खेळणारा युवा वेगवान गोलंदाज तास्किन अहमदच्या (५-२८) अचूक माऱ्याच्या जोरावर बांगला देशने दुसऱ्या वन-डे सामन्यात पाहुण्या भारताचा डाव १०५ धावांत गुंडाळला. अहमदच्या अचूक माऱ्यापुढे भारताचा डाव २५.३ षटकांत १०५ धावांत संपुष्टात आला. बांगलादेशविरुद्ध भारताचा हा धावसंख्येचा निचांक ठरला. मशर्रफ मुर्तझाने अहमदला योग्य साथ देताना ३५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. १९ वर्षीय तास्किन पदार्पणाच्या सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी करणारा बांगला देशचा पहिला तर जगातील आठवा गोलंदाज ठरला. कर्णधार सुरेश रैनाने २७ धावा फटकाविल्या तर त्यानंतर ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या उमेश यादवने १३ चेंडूंमध्ये १७ धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजारा व सुरेश रैना यांनी चौथ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. भारताच्या डावातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. नाणेफेक गमाविल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे (०) माघारी परतला. सहाव्या षटकांत पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी भारताची १ बाद १४ अशी स्थिती होती. भारताच्या डावात रैना व यादव वगळता रॉबिन उथप्पा (१४) व चेतेश्वर पुजारा (११) दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात यशस्वी ठरले. (वृत्तसंस्था)