शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

भारताचा मालिका विजय

By admin | Updated: June 18, 2014 05:45 IST

स्टुअर्ट बिन्नी आणि मोहित शर्मा यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डेमध्ये यजमान बांगलादेशचा ४७ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळविली.

मीरपूर : स्टुअर्ट बिन्नी आणि मोहित शर्मा यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डेमध्ये यजमान बांगलादेशचा ४७ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळविली. पावसाच्या व्यत्ययामुळे अडीच तासांचा वेळ वाया गेला. त्यामुळे उशिरा प्रारंभ झालेली ही लढत पंचांनी प्रत्येकी ४१ षटकांची खेळविण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांच्या निराशाजक कामगिरीमुळे भारताचा डाव २५.३ षटकांत १०५ धावांत संपुष्टात आला, पण मोहित व बिन्नी यांनी अचूक मारा करीत भारताला विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यजमान बांगलादेशचा डाव १७.४ षटकांत ५८ धावांत संपुष्टात आला. प्रतिस्पर्धी संघाचा भारताविरुद्ध हा धावसंख्येचा निचांक ठरला. कारकीर्दीतील तिसरा सामना खेळणारा कर्नाटकचा गोलंदाज बिन्नीने ४.४ षटकांत ४ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. भारतातर्फे वन-डे क्रिकेटमधील ही गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने त्याला योग्य साथ देताना ८ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. बांगलादेशतर्फे मिथुन अली (२६) आणि मुशफिकर रहिम (११) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात अपयश आले. त्याआधी, पदार्पणाची लढत खेळणारा युवा वेगवान गोलंदाज तास्किन अहमदच्या (५-२८) अचूक माऱ्याच्या जोरावर बांगला देशने दुसऱ्या वन-डे सामन्यात पाहुण्या भारताचा डाव १०५ धावांत गुंडाळला. अहमदच्या अचूक माऱ्यापुढे भारताचा डाव २५.३ षटकांत १०५ धावांत संपुष्टात आला. बांगलादेशविरुद्ध भारताचा हा धावसंख्येचा निचांक ठरला. मशर्रफ मुर्तझाने अहमदला योग्य साथ देताना ३५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. १९ वर्षीय तास्किन पदार्पणाच्या सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी करणारा बांगला देशचा पहिला तर जगातील आठवा गोलंदाज ठरला. कर्णधार सुरेश रैनाने २७ धावा फटकाविल्या तर त्यानंतर ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या उमेश यादवने १३ चेंडूंमध्ये १७ धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजारा व सुरेश रैना यांनी चौथ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. भारताच्या डावातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. नाणेफेक गमाविल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे (०) माघारी परतला. सहाव्या षटकांत पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी भारताची १ बाद १४ अशी स्थिती होती. भारताच्या डावात रैना व यादव वगळता रॉबिन उथप्पा (१४) व चेतेश्वर पुजारा (११) दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात यशस्वी ठरले. (वृत्तसंस्था)