शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भारत विजयी सलामीसाठी सज्ज

By admin | Updated: March 15, 2016 03:29 IST

तीन वेळा टी-२०चे विश्वविजेतेपद मिळविणारा बलाढ्य आॅस्टे्रलियाला व नंतर श्रीलंकेला टी-२० मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक

बंगळुरू : तीन वेळा टी-२०चे विश्वविजेतेपद मिळविणारा बलाढ्य आॅस्टे्रलियाला व नंतर श्रीलंकेला टी-२० मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी आपली दावेदारी स्पष्ट केली. हाच फॉर्म कायम राखून विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झालेला भारतीय महिला संघ मंगळवारी होणाऱ्या बांगलादेशाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.गेल्या काही मालिकांत चमकदार कामगिरी केल्याने यजमान भारताला उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. जानेवारी महिन्यात आॅस्टे्रलियाला त्यांच्याच भूमीत २-१ असे नमवल्यानंतर फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेला ३-० असा व्हाइटवॉश देऊन भारताना प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला. याआधी विश्वचषक टी-२० स्पर्धेत भारताने दोन वेळा उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली. मात्र, गेल्या दोन स्पर्धांत भारताला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.संघातील अनुभवी खेळाडू झूलन गोस्वामी व हरमनप्रीत कौर यांच्याकडे असलेल्या दीर्घ अनुभवामुळे त्यांच्यावर भारताची प्रमुख मदार असेल. याच वेळी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी व टी-२० क्रिकेटमध्ये हजारहून अधिक धावा काढणारी जगातील १३ फलंदाजांमध्ये समावेश असलेली कर्णधार मिताली राज भारताची हुकमी खेळाडू असेल. २०१४मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर मितालीने ३०.५०च्या सरासरीने १८३ धावा कुटल्या आहेत. हरमनप्रीतनेही गत विश्वचषकनंतर २३.४३च्या सरासरीने १६४ धावा काढल्या. दुखापतीतून सावरलेल्या झूलनने टी-२०मध्ये ४४ बळी घेऊन खालच्या क्रमांकावर ९९.६७च्या धावगतीने फटकेबाजीही केली आहे. गोलंदाजीत झूलनसह डावखुरी फिरकीपटू एकता बिष्ट व अनुजा पाटील यांच्याकडून संघाला आशा आहेत. दुसऱ्या बाजूला जहानारा आलमच्या नेतृत्वाखाली बांगलादेश आपली चमक दाखविण्यास मैदानात उतरेल. (वृत्तसंस्था)आम्ही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार : मिताली राजबंगळुरू : आमच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता, यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदाचे आम्हीच प्रबळ दावेदार आहोत, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केले आहे. सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत मिताली म्हणाली, ‘‘आमचा संघ ज्या लयीत आहे. ते पाहता, सेमीफायनलपर्यंतचा प्रवास अवघड नाही. सेमीफायनलनंतर खरा कस लागणार आहे. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ बलाढ्य मानले जात होते; पण त्यांनाही अलीकडे बऱ्याच संघांनी हरवले आहे.’’उभय संघभारत : मिताली राज (कर्णधार), झूलन गोस्वामी, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, तिरुष कामिनी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णस्वामी, स्मृती मंधाना, निरंजना नागराजन, शिखा पांडे, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, वेलास्वामी वनिता, सुषमा वर्मा आणि पूनम यादव.बांगलादेश : जहानार आलम (कर्णधार), सलमा खातून, निगार सुल्तान जोटी, पन्ना घोष, रुमाना अहमद, लता मंडल, रितू मोनी, आयशा रहमान, फाहिमा खातून, शरमीन अख्तर, फरगाना हक, खादिजा तुल कुबरा, नाहिदा अख्तर, शैली शारमीन आणि संदिजा इस्लाम. सामन्याची वेळदुपारी ३.३० पासूनस्थळ : चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू