शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

भारत विजयी सलामीसाठी सज्ज

By admin | Updated: March 15, 2016 03:29 IST

तीन वेळा टी-२०चे विश्वविजेतेपद मिळविणारा बलाढ्य आॅस्टे्रलियाला व नंतर श्रीलंकेला टी-२० मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक

बंगळुरू : तीन वेळा टी-२०चे विश्वविजेतेपद मिळविणारा बलाढ्य आॅस्टे्रलियाला व नंतर श्रीलंकेला टी-२० मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी आपली दावेदारी स्पष्ट केली. हाच फॉर्म कायम राखून विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झालेला भारतीय महिला संघ मंगळवारी होणाऱ्या बांगलादेशाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.गेल्या काही मालिकांत चमकदार कामगिरी केल्याने यजमान भारताला उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. जानेवारी महिन्यात आॅस्टे्रलियाला त्यांच्याच भूमीत २-१ असे नमवल्यानंतर फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेला ३-० असा व्हाइटवॉश देऊन भारताना प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला. याआधी विश्वचषक टी-२० स्पर्धेत भारताने दोन वेळा उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली. मात्र, गेल्या दोन स्पर्धांत भारताला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.संघातील अनुभवी खेळाडू झूलन गोस्वामी व हरमनप्रीत कौर यांच्याकडे असलेल्या दीर्घ अनुभवामुळे त्यांच्यावर भारताची प्रमुख मदार असेल. याच वेळी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी व टी-२० क्रिकेटमध्ये हजारहून अधिक धावा काढणारी जगातील १३ फलंदाजांमध्ये समावेश असलेली कर्णधार मिताली राज भारताची हुकमी खेळाडू असेल. २०१४मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर मितालीने ३०.५०च्या सरासरीने १८३ धावा कुटल्या आहेत. हरमनप्रीतनेही गत विश्वचषकनंतर २३.४३च्या सरासरीने १६४ धावा काढल्या. दुखापतीतून सावरलेल्या झूलनने टी-२०मध्ये ४४ बळी घेऊन खालच्या क्रमांकावर ९९.६७च्या धावगतीने फटकेबाजीही केली आहे. गोलंदाजीत झूलनसह डावखुरी फिरकीपटू एकता बिष्ट व अनुजा पाटील यांच्याकडून संघाला आशा आहेत. दुसऱ्या बाजूला जहानारा आलमच्या नेतृत्वाखाली बांगलादेश आपली चमक दाखविण्यास मैदानात उतरेल. (वृत्तसंस्था)आम्ही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार : मिताली राजबंगळुरू : आमच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता, यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदाचे आम्हीच प्रबळ दावेदार आहोत, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केले आहे. सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत मिताली म्हणाली, ‘‘आमचा संघ ज्या लयीत आहे. ते पाहता, सेमीफायनलपर्यंतचा प्रवास अवघड नाही. सेमीफायनलनंतर खरा कस लागणार आहे. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ बलाढ्य मानले जात होते; पण त्यांनाही अलीकडे बऱ्याच संघांनी हरवले आहे.’’उभय संघभारत : मिताली राज (कर्णधार), झूलन गोस्वामी, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, तिरुष कामिनी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णस्वामी, स्मृती मंधाना, निरंजना नागराजन, शिखा पांडे, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, वेलास्वामी वनिता, सुषमा वर्मा आणि पूनम यादव.बांगलादेश : जहानार आलम (कर्णधार), सलमा खातून, निगार सुल्तान जोटी, पन्ना घोष, रुमाना अहमद, लता मंडल, रितू मोनी, आयशा रहमान, फाहिमा खातून, शरमीन अख्तर, फरगाना हक, खादिजा तुल कुबरा, नाहिदा अख्तर, शैली शारमीन आणि संदिजा इस्लाम. सामन्याची वेळदुपारी ३.३० पासूनस्थळ : चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू