शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

पाकविरुद्ध हिशेब चुकता करण्यास भारत सज्ज

By admin | Updated: June 1, 2017 23:30 IST

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्व क्रिकेट चाहते वाट बघत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघादरम्यान 4 जून रोजी सामना होत आहे.

नामदेव कुंभार, ऑनालाइन लोकमतभारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्व क्रिकेट चाहते वाट बघत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघादरम्यान 4 जून रोजी सामना होत आहे. या "हायव्होल्टेज" सामन्याची तयारी भारतीय चाहते सुद्धा करत आहेत. आयसीसीच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने प्रत्येक वेळी पाकवर मात केली आहे. टी - 20 आणि विश्वचषकात भारताने पाकला 11 सामन्यात मात दिली आहे. मात्र, चॅम्पियन ट्रॉफीचा इतिहास थोडा वेगळा आहे. आतापर्यंत तीन लढती झाल्या असून, त्यापैकी दोन पाकने तर एक भारताने जिंकली आहे. त्यामुळे चार तारखेला बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या हायव्होल्टेज लढतीमध्ये भारत पाकचा पराभव हिशेब चुकता करण्यास सज्ज असेल. सातव्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 15 जून 2013 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला होता. पावसाने व्यत्यय आणलेली ही लढत 40 षटकांची करण्यात आली. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने पाकचा 39.4 षटकांत 165 धावांतच खुर्दा केला. त्यानंतर 22 षटकांत 102 धावांचे सुधारित टार्गेट देण्यात आले. शिखर धवन (48) आणि रोहित शर्मा (18) यांनी 10 षटकांत 58 धावांची सलामी दिल्यानंतर विराट (नाबाद 22) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 11) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. हा सामना भारताने आठ धावांनी जिंकला होता. पाकिस्तानात सप्टेंबर 2008 मध्ये होणारी चँपियन्स ट्रॉफी सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे द. आफ्रिकेला यजमानपद मिळाले. 2009 मध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांच्या चांगल्या उपस्थितीमुळे आणि काही चुरशीच्या लढतींमुळे गाजली. भारताने या स्पर्धेत निराशा केली. साखळीत तीनपैकी एकच लढत त्यांना जिंकता आली.सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात पाकने भारताचा पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करणार्‍या पाकने शोएब मलिकच्या शतकाच्या (128) बळावर 302 धावा केल्या. भारताला 44 षटकांत 248 धावांत सर्वबाद करण्यात पाकला यश आले. राहुल द्रविड (76) आणि गौतम गंभीर (56) यांची अर्धशतके व्यर्थ ठरली. 19 सप्टेंबर 2004 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताने निराशा केली. उपांत्य फेरी गाठणेही शक्य झाले नाही. पाकिस्तानविरुद्धचा पराभव भारताचे आव्हान साखळीत संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरले. पाकविरोधात झालेल्या सामन्यात राहुल द्रविडच्या अर्धशतकामुळे (67) भारताने 200 धावा केल्या. पाकने हे आव्हान 49.2 षटकांत 7 विकेट गमावून पूर्ण केले. कर्णधार सौरव गांगुली आणि युवराजसिंगला या लढतीत भोपळाही फोडता आला नव्हता. पांरपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकचा पराभव करण्यासाठी भारत प्रयत्न करणार यात काही दुमत नाही. यापूर्वी भारताची दुबळी बाजू समजली जाणारी गोलंदाजी या स्पर्धेत भारताला विजय मिळून देण्यास सज्ज आहे. बुमराह, शमी, भुवनेश्वर आणि उमेश यादव या चौकटीला अश्विन, जाडेजा आणि हार्दिकची साथ असेल. चॅम्पियन ट्रॉफीचे इंग्लंडकडे यजमानपद असताना भारत-पाकच्या दोन्ही लढती बर्मिंगहॅम येथे झाल्या आहेत. यामध्ये भारत-पाकने प्रत्येकी एक वेळा विजय मिळवला आहे, यावर्षीही त्याच ठिकाणी लढत रंगणार आहे. माजी कर्णधार एम.एस धोनीने पाकविरुद्ध 58.38 च्या सरासरीने धावा ठोकल्या असून यात दोन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनी आणि विराट कोहलीची वन-डेतील सर्वोच्च 183 धावसंख्या पाकविरुद्धच आहे. फलंदाजीत भारताकडे रोहित शर्मा, धवन, कोहली, युवराज, धोनी सारखे तगडे खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या आणि केदार जाधव भारताकडून छुप्या रुस्तम प्रमाणे चमकू शकतात. त्यांची कामगिरी भारताला हिशेब चुकता करण्यास मोलाची ठरू शकते.