शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाकविरुद्ध हिशेब चुकता करण्यास भारत सज्ज

By admin | Updated: June 1, 2017 23:30 IST

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्व क्रिकेट चाहते वाट बघत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघादरम्यान 4 जून रोजी सामना होत आहे.

नामदेव कुंभार, ऑनालाइन लोकमतभारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्व क्रिकेट चाहते वाट बघत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघादरम्यान 4 जून रोजी सामना होत आहे. या "हायव्होल्टेज" सामन्याची तयारी भारतीय चाहते सुद्धा करत आहेत. आयसीसीच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने प्रत्येक वेळी पाकवर मात केली आहे. टी - 20 आणि विश्वचषकात भारताने पाकला 11 सामन्यात मात दिली आहे. मात्र, चॅम्पियन ट्रॉफीचा इतिहास थोडा वेगळा आहे. आतापर्यंत तीन लढती झाल्या असून, त्यापैकी दोन पाकने तर एक भारताने जिंकली आहे. त्यामुळे चार तारखेला बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या हायव्होल्टेज लढतीमध्ये भारत पाकचा पराभव हिशेब चुकता करण्यास सज्ज असेल. सातव्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 15 जून 2013 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला होता. पावसाने व्यत्यय आणलेली ही लढत 40 षटकांची करण्यात आली. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने पाकचा 39.4 षटकांत 165 धावांतच खुर्दा केला. त्यानंतर 22 षटकांत 102 धावांचे सुधारित टार्गेट देण्यात आले. शिखर धवन (48) आणि रोहित शर्मा (18) यांनी 10 षटकांत 58 धावांची सलामी दिल्यानंतर विराट (नाबाद 22) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 11) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. हा सामना भारताने आठ धावांनी जिंकला होता. पाकिस्तानात सप्टेंबर 2008 मध्ये होणारी चँपियन्स ट्रॉफी सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे द. आफ्रिकेला यजमानपद मिळाले. 2009 मध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांच्या चांगल्या उपस्थितीमुळे आणि काही चुरशीच्या लढतींमुळे गाजली. भारताने या स्पर्धेत निराशा केली. साखळीत तीनपैकी एकच लढत त्यांना जिंकता आली.सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात पाकने भारताचा पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करणार्‍या पाकने शोएब मलिकच्या शतकाच्या (128) बळावर 302 धावा केल्या. भारताला 44 षटकांत 248 धावांत सर्वबाद करण्यात पाकला यश आले. राहुल द्रविड (76) आणि गौतम गंभीर (56) यांची अर्धशतके व्यर्थ ठरली. 19 सप्टेंबर 2004 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताने निराशा केली. उपांत्य फेरी गाठणेही शक्य झाले नाही. पाकिस्तानविरुद्धचा पराभव भारताचे आव्हान साखळीत संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरले. पाकविरोधात झालेल्या सामन्यात राहुल द्रविडच्या अर्धशतकामुळे (67) भारताने 200 धावा केल्या. पाकने हे आव्हान 49.2 षटकांत 7 विकेट गमावून पूर्ण केले. कर्णधार सौरव गांगुली आणि युवराजसिंगला या लढतीत भोपळाही फोडता आला नव्हता. पांरपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकचा पराभव करण्यासाठी भारत प्रयत्न करणार यात काही दुमत नाही. यापूर्वी भारताची दुबळी बाजू समजली जाणारी गोलंदाजी या स्पर्धेत भारताला विजय मिळून देण्यास सज्ज आहे. बुमराह, शमी, भुवनेश्वर आणि उमेश यादव या चौकटीला अश्विन, जाडेजा आणि हार्दिकची साथ असेल. चॅम्पियन ट्रॉफीचे इंग्लंडकडे यजमानपद असताना भारत-पाकच्या दोन्ही लढती बर्मिंगहॅम येथे झाल्या आहेत. यामध्ये भारत-पाकने प्रत्येकी एक वेळा विजय मिळवला आहे, यावर्षीही त्याच ठिकाणी लढत रंगणार आहे. माजी कर्णधार एम.एस धोनीने पाकविरुद्ध 58.38 च्या सरासरीने धावा ठोकल्या असून यात दोन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनी आणि विराट कोहलीची वन-डेतील सर्वोच्च 183 धावसंख्या पाकविरुद्धच आहे. फलंदाजीत भारताकडे रोहित शर्मा, धवन, कोहली, युवराज, धोनी सारखे तगडे खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या आणि केदार जाधव भारताकडून छुप्या रुस्तम प्रमाणे चमकू शकतात. त्यांची कामगिरी भारताला हिशेब चुकता करण्यास मोलाची ठरू शकते.