शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पाकविरुद्ध हिशेब चुकता करण्यास भारत सज्ज

By admin | Updated: June 1, 2017 23:30 IST

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्व क्रिकेट चाहते वाट बघत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघादरम्यान 4 जून रोजी सामना होत आहे.

नामदेव कुंभार, ऑनालाइन लोकमतभारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्व क्रिकेट चाहते वाट बघत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघादरम्यान 4 जून रोजी सामना होत आहे. या "हायव्होल्टेज" सामन्याची तयारी भारतीय चाहते सुद्धा करत आहेत. आयसीसीच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने प्रत्येक वेळी पाकवर मात केली आहे. टी - 20 आणि विश्वचषकात भारताने पाकला 11 सामन्यात मात दिली आहे. मात्र, चॅम्पियन ट्रॉफीचा इतिहास थोडा वेगळा आहे. आतापर्यंत तीन लढती झाल्या असून, त्यापैकी दोन पाकने तर एक भारताने जिंकली आहे. त्यामुळे चार तारखेला बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या हायव्होल्टेज लढतीमध्ये भारत पाकचा पराभव हिशेब चुकता करण्यास सज्ज असेल. सातव्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 15 जून 2013 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला होता. पावसाने व्यत्यय आणलेली ही लढत 40 षटकांची करण्यात आली. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने पाकचा 39.4 षटकांत 165 धावांतच खुर्दा केला. त्यानंतर 22 षटकांत 102 धावांचे सुधारित टार्गेट देण्यात आले. शिखर धवन (48) आणि रोहित शर्मा (18) यांनी 10 षटकांत 58 धावांची सलामी दिल्यानंतर विराट (नाबाद 22) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 11) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. हा सामना भारताने आठ धावांनी जिंकला होता. पाकिस्तानात सप्टेंबर 2008 मध्ये होणारी चँपियन्स ट्रॉफी सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे द. आफ्रिकेला यजमानपद मिळाले. 2009 मध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांच्या चांगल्या उपस्थितीमुळे आणि काही चुरशीच्या लढतींमुळे गाजली. भारताने या स्पर्धेत निराशा केली. साखळीत तीनपैकी एकच लढत त्यांना जिंकता आली.सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात पाकने भारताचा पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करणार्‍या पाकने शोएब मलिकच्या शतकाच्या (128) बळावर 302 धावा केल्या. भारताला 44 षटकांत 248 धावांत सर्वबाद करण्यात पाकला यश आले. राहुल द्रविड (76) आणि गौतम गंभीर (56) यांची अर्धशतके व्यर्थ ठरली. 19 सप्टेंबर 2004 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताने निराशा केली. उपांत्य फेरी गाठणेही शक्य झाले नाही. पाकिस्तानविरुद्धचा पराभव भारताचे आव्हान साखळीत संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरले. पाकविरोधात झालेल्या सामन्यात राहुल द्रविडच्या अर्धशतकामुळे (67) भारताने 200 धावा केल्या. पाकने हे आव्हान 49.2 षटकांत 7 विकेट गमावून पूर्ण केले. कर्णधार सौरव गांगुली आणि युवराजसिंगला या लढतीत भोपळाही फोडता आला नव्हता. पांरपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकचा पराभव करण्यासाठी भारत प्रयत्न करणार यात काही दुमत नाही. यापूर्वी भारताची दुबळी बाजू समजली जाणारी गोलंदाजी या स्पर्धेत भारताला विजय मिळून देण्यास सज्ज आहे. बुमराह, शमी, भुवनेश्वर आणि उमेश यादव या चौकटीला अश्विन, जाडेजा आणि हार्दिकची साथ असेल. चॅम्पियन ट्रॉफीचे इंग्लंडकडे यजमानपद असताना भारत-पाकच्या दोन्ही लढती बर्मिंगहॅम येथे झाल्या आहेत. यामध्ये भारत-पाकने प्रत्येकी एक वेळा विजय मिळवला आहे, यावर्षीही त्याच ठिकाणी लढत रंगणार आहे. माजी कर्णधार एम.एस धोनीने पाकविरुद्ध 58.38 च्या सरासरीने धावा ठोकल्या असून यात दोन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनी आणि विराट कोहलीची वन-डेतील सर्वोच्च 183 धावसंख्या पाकविरुद्धच आहे. फलंदाजीत भारताकडे रोहित शर्मा, धवन, कोहली, युवराज, धोनी सारखे तगडे खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या आणि केदार जाधव भारताकडून छुप्या रुस्तम प्रमाणे चमकू शकतात. त्यांची कामगिरी भारताला हिशेब चुकता करण्यास मोलाची ठरू शकते.