शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

कुठल्याही आव्हानासाठी भारत सज्ज

By admin | Updated: June 8, 2017 04:20 IST

चॅम्पियन्सच्या ब गटात भारत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळेल.

सौरभ गांगुली लिहितात...चॅम्पियन्सच्या ब गटात भारत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळेल. हा सामना जिंकल्यास अखेरच्या चार संघात स्थान मिळविणे सोपे जाणार आहे. सध्याचा श्रीलंका संघ आधीसारखा नाही. जयवर्धने आणि संगकाराच्या निवृत्तीनंतर हा संघ पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. संघाची पुनर्विभागणी सोपी नसते. प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे, संधी देणे आणि खेळाडू परिपक्व होणे ही प्रक्रिया आहे.कागदावर भक्कम असलेल्या भारतीय संघाविरुद्ध लढत देणे लंकेला जड जाणार आहे. तरीही क्रिकेटमध्ये कुठलेही भाकीत करणे योग्य नाही. पहिल्या सामन्यात भारताने पाकला सहज नमविले. पाककडून इतक्या कमकुवत खेळाची अपेक्षा नव्हती. गेल्या १०-१२ वर्षांत भारताने पाकवर वर्चस्व मिळविले आहे. भारत बलाढ्य होत असताना पाक संघ कमकुवत होत गेला. रविवारी सामना सुरू झाल्यापासून पाकला भारताविरुद्ध डावपेचांची अंमलबजावणी करणे कठीण होऊन बसले होते.गोलंदाजी आणि फलंदाजीतही पाकिस्तानचे खेळाडू चाचपडताना दिसले. पाकच्या फलंदाजांनी एकाही भारतीय गोलंदाजाचे आव्हान स्वीकारले नाही. आधीच नांगी टाकली की काय असे चित्र होते. मी याआधी उभय संघात अशी एकाकी लढत कधीही पाहिली नव्हती. पाकविरुद्ध भारताला जी धाकधूक वाटत असावी ती आता निघून गेली. रोहित आणि शिखर धवन यांनी फलंदाजीत लवकर पकड निर्माण केली. दोघे आता चांगले सलामीवीर बनले आहेत. स्पर्धेत ही जोडी महत्त्वाची भूमिका बजावेल. कोहलीदेखील फॉर्ममध्ये आला. पण एक खेळाडू असा होता, ज्याने अंतर निर्माण केले. तो म्हणजे युवराज. युवराजचा धडाका पाहून असे वाटते की भारतीय संघ आता कुठल्याही गोलंदाजाला आव्हान देऊ शकेल. भारताच्या फलंदाजीसाठी हार्दिक पंड्या ‘वरदान’ आहे. विशेष बाब अशी की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात मधल्या षटकांत खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल ठरतात असे दिसत असले तरी भारतीय संघ व्यवस्थापन दोन फिरकीपटूंना खेळविण्याचा विचार करू शकते. (गेमप्लान)