शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्याही आव्हानासाठी भारत सज्ज

By admin | Updated: June 8, 2017 04:20 IST

चॅम्पियन्सच्या ब गटात भारत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळेल.

सौरभ गांगुली लिहितात...चॅम्पियन्सच्या ब गटात भारत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळेल. हा सामना जिंकल्यास अखेरच्या चार संघात स्थान मिळविणे सोपे जाणार आहे. सध्याचा श्रीलंका संघ आधीसारखा नाही. जयवर्धने आणि संगकाराच्या निवृत्तीनंतर हा संघ पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. संघाची पुनर्विभागणी सोपी नसते. प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे, संधी देणे आणि खेळाडू परिपक्व होणे ही प्रक्रिया आहे.कागदावर भक्कम असलेल्या भारतीय संघाविरुद्ध लढत देणे लंकेला जड जाणार आहे. तरीही क्रिकेटमध्ये कुठलेही भाकीत करणे योग्य नाही. पहिल्या सामन्यात भारताने पाकला सहज नमविले. पाककडून इतक्या कमकुवत खेळाची अपेक्षा नव्हती. गेल्या १०-१२ वर्षांत भारताने पाकवर वर्चस्व मिळविले आहे. भारत बलाढ्य होत असताना पाक संघ कमकुवत होत गेला. रविवारी सामना सुरू झाल्यापासून पाकला भारताविरुद्ध डावपेचांची अंमलबजावणी करणे कठीण होऊन बसले होते.गोलंदाजी आणि फलंदाजीतही पाकिस्तानचे खेळाडू चाचपडताना दिसले. पाकच्या फलंदाजांनी एकाही भारतीय गोलंदाजाचे आव्हान स्वीकारले नाही. आधीच नांगी टाकली की काय असे चित्र होते. मी याआधी उभय संघात अशी एकाकी लढत कधीही पाहिली नव्हती. पाकविरुद्ध भारताला जी धाकधूक वाटत असावी ती आता निघून गेली. रोहित आणि शिखर धवन यांनी फलंदाजीत लवकर पकड निर्माण केली. दोघे आता चांगले सलामीवीर बनले आहेत. स्पर्धेत ही जोडी महत्त्वाची भूमिका बजावेल. कोहलीदेखील फॉर्ममध्ये आला. पण एक खेळाडू असा होता, ज्याने अंतर निर्माण केले. तो म्हणजे युवराज. युवराजचा धडाका पाहून असे वाटते की भारतीय संघ आता कुठल्याही गोलंदाजाला आव्हान देऊ शकेल. भारताच्या फलंदाजीसाठी हार्दिक पंड्या ‘वरदान’ आहे. विशेष बाब अशी की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात मधल्या षटकांत खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल ठरतात असे दिसत असले तरी भारतीय संघ व्यवस्थापन दोन फिरकीपटूंना खेळविण्याचा विचार करू शकते. (गेमप्लान)