शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

कुठल्याही आव्हानासाठी भारत सज्ज

By admin | Updated: June 8, 2017 04:20 IST

चॅम्पियन्सच्या ब गटात भारत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळेल.

सौरभ गांगुली लिहितात...चॅम्पियन्सच्या ब गटात भारत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळेल. हा सामना जिंकल्यास अखेरच्या चार संघात स्थान मिळविणे सोपे जाणार आहे. सध्याचा श्रीलंका संघ आधीसारखा नाही. जयवर्धने आणि संगकाराच्या निवृत्तीनंतर हा संघ पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. संघाची पुनर्विभागणी सोपी नसते. प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे, संधी देणे आणि खेळाडू परिपक्व होणे ही प्रक्रिया आहे.कागदावर भक्कम असलेल्या भारतीय संघाविरुद्ध लढत देणे लंकेला जड जाणार आहे. तरीही क्रिकेटमध्ये कुठलेही भाकीत करणे योग्य नाही. पहिल्या सामन्यात भारताने पाकला सहज नमविले. पाककडून इतक्या कमकुवत खेळाची अपेक्षा नव्हती. गेल्या १०-१२ वर्षांत भारताने पाकवर वर्चस्व मिळविले आहे. भारत बलाढ्य होत असताना पाक संघ कमकुवत होत गेला. रविवारी सामना सुरू झाल्यापासून पाकला भारताविरुद्ध डावपेचांची अंमलबजावणी करणे कठीण होऊन बसले होते.गोलंदाजी आणि फलंदाजीतही पाकिस्तानचे खेळाडू चाचपडताना दिसले. पाकच्या फलंदाजांनी एकाही भारतीय गोलंदाजाचे आव्हान स्वीकारले नाही. आधीच नांगी टाकली की काय असे चित्र होते. मी याआधी उभय संघात अशी एकाकी लढत कधीही पाहिली नव्हती. पाकविरुद्ध भारताला जी धाकधूक वाटत असावी ती आता निघून गेली. रोहित आणि शिखर धवन यांनी फलंदाजीत लवकर पकड निर्माण केली. दोघे आता चांगले सलामीवीर बनले आहेत. स्पर्धेत ही जोडी महत्त्वाची भूमिका बजावेल. कोहलीदेखील फॉर्ममध्ये आला. पण एक खेळाडू असा होता, ज्याने अंतर निर्माण केले. तो म्हणजे युवराज. युवराजचा धडाका पाहून असे वाटते की भारतीय संघ आता कुठल्याही गोलंदाजाला आव्हान देऊ शकेल. भारताच्या फलंदाजीसाठी हार्दिक पंड्या ‘वरदान’ आहे. विशेष बाब अशी की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात मधल्या षटकांत खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल ठरतात असे दिसत असले तरी भारतीय संघ व्यवस्थापन दोन फिरकीपटूंना खेळविण्याचा विचार करू शकते. (गेमप्लान)