शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारत - पाक मालिका लवकर होणार नाही!

By admin | Updated: October 20, 2015 02:46 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी प्रस्तावित भारत - पाकिस्तान द्विपक्षीय मालिका लवकरात लवकर सुरु होण्याची शक्यता जवळपास

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी प्रस्तावित भारत - पाकिस्तान द्विपक्षीय मालिका लवकरात लवकर सुरु होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात केली. त्याचबरोबर सोमवारी शिवसेनेने मुंबईतील बीसीसीआय कार्यालयावर केलेल्या आक्रमक आंदोलनाचा निषेधही केला.भारत - पाक मालिकेच्या आयोजनाबाबत बीसीसीआयशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान सध्या भारतात आहेत. परंतु, ठाकूर यांनी सर्वप्रथम चर्चेला योग्य असे वातावरण निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतरच प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेबाबत चर्चा होऊ शकते असे सांगत ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.मुंबईत झालेल्या आक्रमक आंदोलनानंतर ठाकूर यांनी सांगितले की, सर्वप्रथम या आक्रमक आंदोलनाचा आम्ही निषेध करतो. कोणीही बीसीसीसी परिसरामध्ये जबरदस्ती प्रवेश करु शकत नाही. तसेच पीसीबी अध्यक्षांसह चर्चा न करण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव आणू शकत नाही. माझ्या मते पीसीबीसह याबाबतीत चर्चा करण्यास बीसीसीआय सक्षम असून अंतिम निर्णय हा केंद्र सरकारशी बातचीत झाल्यानंतरच घेतला जाईल. तसेच लोकशाहीमध्ये तुम्ही विरोध करु शकता. मात्र कोणाच्याही घरी, कार्यालयात किंवा मुख्यालयात जबरदस्ती प्रवेश करु शकत नाही. हे योग्य नाही, असेही ठाकूर म्हणाले. बांगलादेशचा समावेश असलेल्या त्रिकोणीय मालिकेबाबत ठाकूर म्हणाले की, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश असलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या आयोजनाविषयी आम्ही कधीही चर्चा केली नाही. (वृत्तसंस्था)अलीम दार यांना धमकी ..दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येत्या २५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानी पंच अलीम दार यांनी पंचगिरी न करण्याची धमकी शिवसेनेने दिली आहे. जर या सामन्यासाठी दार मुंबईत आल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही त्यांना सुनावण्यात आले आहे. आफ्रिकेविरुद्धचा चौथा सामना चेन्नईत, तर पाचवा सामना मुंबईत होणार आहे. शिवसेनेने १९९९ साली दिल्लीत आयोजित भारत-पाक कसोटी सामन्यावरुन तोडफोड केली होती.त्यामुळे हा सामना चेन्नईला घेण्यात आला होता. तसेच २०१२ साली देखील शिवसेनेने पाकिस्तानी खेळाडूंना भारतात आमंत्रित करण्यास विरोध दर्शविला होता. शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे पाचव्या एकदिवसीय सामना मुंईतून इतरत्र हलविला जाण्याची दाट शक्यता आहे.दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीमध्ये सेठी आणि ठाकूर यांच्यातही या प्रस्तावित मालिकेबाबत चर्चा झालेली. यावेळी ठाकूर यांनीच पीसीबी अध्यक्षांना बीसीसीआय अध्यक्षांच्या वतीने भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले होते. मागील दिड वर्षांपासून दोन्ही देशांतील संबंधामध्ये तणाव वाढल्याने या प्रस्तावित मालिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील कित्येक दिवसांपासून ही प्रस्तावित मालिका व्हावी यासाठी पीसीबी बीसीसीआयचे मन वळवण्याच्या प्रयत्ना आहे. मात्र काही दिवसांपुर्वीच बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आतंकवाद व क्रिकेट एकत्रित होऊ शकत नसल्याचे सांगत मालिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तसेच दुसऱ्यांदा बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशांक मनोहर यांनी पीसीबीला या मालिकेसंदर्भात बैठकीचे आमंत्रण देत आशा जागवली. मात्र शिवसेनेच्या या आक्रमक आंदोलनामुळे पुन्हा एकदा या मालिकेबाबत संभ्रम निर्माण झाले आहे.बीसीसीआय व पीसीबी यांच्यातील चर्चा थांबविण्यात आलेली नाही. मनोहर आणि शहरयार यांच्यात मंगळवारी दिल्ली येथे पुन्हा एकदा दुसरी चर्चा होईल. कोणत्याही परिस्थितीत ही चर्चा थांबणार नाही. बीसीसीआय कधीही राष्ट्रहिताविरोधात तडजोड करणार नाही. परंतु, चर्चा थांबवण्याच्या निर्णयाचे समर्थनही करणार नाही. क्रिकेटसंबधी निर्णय घेण्याचे अधिकार बीसीसीआयकडेच असावे. - राजीव शुक्ला, आयपीएल अध्यक्ष