शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

भारत-पाकिस्तान लढतीची रंगतच न्यारी

By admin | Updated: June 4, 2017 06:01 IST

भारत-पाकिस्तान क्रिकेटची रंगतच न्यारी असते. उभय संघ श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे लढतीत चुरस अनुभवायला मिळते. देशातर्फे खेळताना

- सुनील गावसकर लिहितात...भारत-पाकिस्तान क्रिकेटची रंगतच न्यारी असते. उभय संघ श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे लढतीत चुरस अनुभवायला मिळते. देशातर्फे खेळताना खेळाडंूमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना भिनलेली असते आणि पाकिस्तानविरुद्ध खेळताना ती अधिक जोमाने उफाळून येते. सध्या सीमेवर तणावाची स्थिती बघता पूर्वीच्या तुलनेत यावेळच्या भारत-पाक लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाडू मात्र लढतीच्या हाईपमध्ये वाहवत न जाता दडपण झुगारून खेळण्यास सज्ज असतील, हे मात्र निश्चित. या लढतीमुळे ‘हीरो’ किंवा ‘झिरो’ ठरू शकतो, याची प्रत्येक खेळाडूला कल्पना आहे. पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या अनुभवाचा विचार करता भारतीय संघाचे पारडे थोडे वरचढ भासते. मिसबाह, युनूस आणि आफ्रिदी या खेळाडूंचा समावेश नसल्यामुळे पाक संघाला अनुभवाची उणीव भासत आहे. पाकिस्तानने युवा खेळाडूंना संधी देत त्यांच्या उत्साहाच्या जोरावर ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या लढतीच्या निमित्ताने पाकच्या युवा खेळाडूंना छाप सोडण्याची चांगली संधी लाभली आहे. सराव सामन्यांत पाक संघाची कामगिरी चांगली ठरल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे.दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघ आपल्या प्रशिक्षकांच्या अनावश्यक वादासह स्पर्धेत दाखल झाला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही तर त्यासाठी हा वादच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात येईल. व्यावसायिक खेळाडू असल्यामुळे हा वाद विसरून चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करतील, पण ड्रेसिंग रुममधील अनिश्चितता मैदानावरील चुकीपेक्षा जास्त त्रासदायक असते. यावेळी भारताचा वेगवान मारा चांगला आहे. सर्वंच गोलंदाज अचूक व वेगवान मारा करीत आहेत. ढगाळ वातावरणात गोलंदाजांना चांगला स्विंग मिळेल; पण पाकच्या गोलंदाजांनाही त्याचा लाभ मिळेल. भारतीय फलंदाजांना इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याचा अधिक अनुभव आहे. युवराज फिट असेल तर रहाणेला बाहेर बसावे लागेल. भारतीय संघाची निवड करताना संघव्यवस्थापनाला एक प्रश्न मात्र भेडसावणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या शमीला खेळण्याचा पुरेसा सराव मिळाला आहे का ? या महत्त्वाच्या लढतीत त्याला संधी देण्याची जोखीम पत्करता येईल का? (पीएमजी)