शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

भारत-पाकिस्तान लढतीची रंगतच न्यारी

By admin | Updated: June 4, 2017 06:01 IST

भारत-पाकिस्तान क्रिकेटची रंगतच न्यारी असते. उभय संघ श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे लढतीत चुरस अनुभवायला मिळते. देशातर्फे खेळताना

- सुनील गावसकर लिहितात...भारत-पाकिस्तान क्रिकेटची रंगतच न्यारी असते. उभय संघ श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे लढतीत चुरस अनुभवायला मिळते. देशातर्फे खेळताना खेळाडंूमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना भिनलेली असते आणि पाकिस्तानविरुद्ध खेळताना ती अधिक जोमाने उफाळून येते. सध्या सीमेवर तणावाची स्थिती बघता पूर्वीच्या तुलनेत यावेळच्या भारत-पाक लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाडू मात्र लढतीच्या हाईपमध्ये वाहवत न जाता दडपण झुगारून खेळण्यास सज्ज असतील, हे मात्र निश्चित. या लढतीमुळे ‘हीरो’ किंवा ‘झिरो’ ठरू शकतो, याची प्रत्येक खेळाडूला कल्पना आहे. पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या अनुभवाचा विचार करता भारतीय संघाचे पारडे थोडे वरचढ भासते. मिसबाह, युनूस आणि आफ्रिदी या खेळाडूंचा समावेश नसल्यामुळे पाक संघाला अनुभवाची उणीव भासत आहे. पाकिस्तानने युवा खेळाडूंना संधी देत त्यांच्या उत्साहाच्या जोरावर ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या लढतीच्या निमित्ताने पाकच्या युवा खेळाडूंना छाप सोडण्याची चांगली संधी लाभली आहे. सराव सामन्यांत पाक संघाची कामगिरी चांगली ठरल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे.दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघ आपल्या प्रशिक्षकांच्या अनावश्यक वादासह स्पर्धेत दाखल झाला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही तर त्यासाठी हा वादच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात येईल. व्यावसायिक खेळाडू असल्यामुळे हा वाद विसरून चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करतील, पण ड्रेसिंग रुममधील अनिश्चितता मैदानावरील चुकीपेक्षा जास्त त्रासदायक असते. यावेळी भारताचा वेगवान मारा चांगला आहे. सर्वंच गोलंदाज अचूक व वेगवान मारा करीत आहेत. ढगाळ वातावरणात गोलंदाजांना चांगला स्विंग मिळेल; पण पाकच्या गोलंदाजांनाही त्याचा लाभ मिळेल. भारतीय फलंदाजांना इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याचा अधिक अनुभव आहे. युवराज फिट असेल तर रहाणेला बाहेर बसावे लागेल. भारतीय संघाची निवड करताना संघव्यवस्थापनाला एक प्रश्न मात्र भेडसावणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या शमीला खेळण्याचा पुरेसा सराव मिळाला आहे का ? या महत्त्वाच्या लढतीत त्याला संधी देण्याची जोखीम पत्करता येईल का? (पीएमजी)