शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक मालिका ‘स्वप्नच’

By admin | Updated: December 31, 2015 01:48 IST

भारत आणि पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करण्यात आले. भारतीय लोकप्रतिनिधी पाकिस्तानचा दौराही करून आले. तसेच, पाकिस्तान

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करण्यात आले. भारतीय लोकप्रतिनिधी पाकिस्तानचा दौराही करून आले. तसेच, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी भारताचा दौराही केला. मात्र, तरीही ही मालिका अजून दृष्टिक्षेपात आलेली नाही.भारत आणि पाकिस्तानदरम्यान डिसेंबरमध्ये मालिका आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने जोर लावला होता. मात्र, भारत सरकारने या मालिकेला परवानगी दिली नाही. ‘पीसीबी’चे अध्यक्ष शहरयार खान यांनी या मालिकेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, यात त्यांना यश आले नाही. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही देश एकाच गटात असणार आहेत, हे विशेष.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या आगामी कार्यक्रमांतर्गत भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक समझोता झाला होता. यानुसार दोन्ही देशांदरम्यान २०१५ ते २०२३ या काळात सहा क्रिकेट मालिकांचे आयोजन करण्यात येणार होते. याची सुरुवात डिसेंबर २०१५ मध्ये होणार होती व पाकिस्तान याचे आयोजन करणार होते. ‘आयसीसी’च्या कार्यक्रमांतर्गत भारत या मालिकेसाठी तयार होईल, असे पीसीबीला वाटत होते. मात्र, दहशतवादी कृत्यांमुळे बीसीसीआयने नकार दिला. दरम्यान, खूप प्रयत्नांनंतर दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांचे अध्यक्ष दुबईमध्ये भेटले. या भेटीत १५ डिसेंबरदरम्यान श्रीलंका किंवा बांगलादेशमध्ये क्रिकेट मालिका खेळण्यावर सहमतीही झाली. या मालिकेचे नियोजन करण्यासाठी शहरयार भारतात आले होते. मात्र, शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे त्यांना परत जावे लागले. यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर या मालिकेला मंजुरी मिळेल, असे त्यांना वाटत होते. मात्र, भारत सरकारने याबाबत मौनच पाळणे पसंत केले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानला भेट दिली, तरीही या मालिकेच्या मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत.या वर्षीच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. मात्र, या दोन देशांदरम्यानची मालिका सध्या तरी ‘स्वप्न’च बनली आहे. (वृत्तसंस्था)भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर व पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंना या दोन देशांदरम्यान मालिका व्हावी, असे वाटते. दोन्ही देशांतील नेते भेटू शकतात, तर क्रिकेट मालिका का होऊ नये, असे सांगण्यात आले.‘बंदुकीच्या गोळीबरोबर चेंडू टाकला जाऊ शकत नाही,’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.