शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

भारत-पाक मालिका ‘स्वप्नच’

By admin | Updated: December 31, 2015 01:48 IST

भारत आणि पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करण्यात आले. भारतीय लोकप्रतिनिधी पाकिस्तानचा दौराही करून आले. तसेच, पाकिस्तान

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करण्यात आले. भारतीय लोकप्रतिनिधी पाकिस्तानचा दौराही करून आले. तसेच, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी भारताचा दौराही केला. मात्र, तरीही ही मालिका अजून दृष्टिक्षेपात आलेली नाही.भारत आणि पाकिस्तानदरम्यान डिसेंबरमध्ये मालिका आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने जोर लावला होता. मात्र, भारत सरकारने या मालिकेला परवानगी दिली नाही. ‘पीसीबी’चे अध्यक्ष शहरयार खान यांनी या मालिकेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, यात त्यांना यश आले नाही. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही देश एकाच गटात असणार आहेत, हे विशेष.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या आगामी कार्यक्रमांतर्गत भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक समझोता झाला होता. यानुसार दोन्ही देशांदरम्यान २०१५ ते २०२३ या काळात सहा क्रिकेट मालिकांचे आयोजन करण्यात येणार होते. याची सुरुवात डिसेंबर २०१५ मध्ये होणार होती व पाकिस्तान याचे आयोजन करणार होते. ‘आयसीसी’च्या कार्यक्रमांतर्गत भारत या मालिकेसाठी तयार होईल, असे पीसीबीला वाटत होते. मात्र, दहशतवादी कृत्यांमुळे बीसीसीआयने नकार दिला. दरम्यान, खूप प्रयत्नांनंतर दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांचे अध्यक्ष दुबईमध्ये भेटले. या भेटीत १५ डिसेंबरदरम्यान श्रीलंका किंवा बांगलादेशमध्ये क्रिकेट मालिका खेळण्यावर सहमतीही झाली. या मालिकेचे नियोजन करण्यासाठी शहरयार भारतात आले होते. मात्र, शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे त्यांना परत जावे लागले. यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर या मालिकेला मंजुरी मिळेल, असे त्यांना वाटत होते. मात्र, भारत सरकारने याबाबत मौनच पाळणे पसंत केले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानला भेट दिली, तरीही या मालिकेच्या मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत.या वर्षीच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. मात्र, या दोन देशांदरम्यानची मालिका सध्या तरी ‘स्वप्न’च बनली आहे. (वृत्तसंस्था)भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर व पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंना या दोन देशांदरम्यान मालिका व्हावी, असे वाटते. दोन्ही देशांतील नेते भेटू शकतात, तर क्रिकेट मालिका का होऊ नये, असे सांगण्यात आले.‘बंदुकीच्या गोळीबरोबर चेंडू टाकला जाऊ शकत नाही,’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.