शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकला एकाच गटात ठेवणे आवश्यक : आयसीसी

By admin | Updated: June 3, 2016 02:33 IST

पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत कडवे पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे

लंडन : पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत कडवे पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना आयसीसीने उभय संघांमधील सामना मोठ्या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरत असल्यामुळे कधीकधी हेतूपुरस्सरपणे असे करावे लागते, असे म्हटले आहे.आयसीसी ट्रॉफी २०१७ साली इंग्लंडमध्ये १ ते १८ जून या कालावधीत होईल. बुधवारी या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. भारत आणि पाकला ‘ब’ गटात स्थान देण्यात आले असून गत चॅम्पियन भारतीय संघ ४ जून रोजी एजबेस्टन येथे पाकविरुद्ध खेळेल. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात स्थान दिल्याविषयी विचारताच आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन म्हणाले, ‘भारत-पाक सामना आयसीसी स्पर्धेचा गाभा असतो. ही लढत आयोजित करण्यावर आम्ही भर देत असतो. जगभरातील प्रेक्षक या लढतीची प्रतीक्षा करीत असतात. यामुळे आमच्या स्पर्धेची देखील लोकप्रियता आणखी वाढत असल्याने भारत-पाक सामना आमच्यासाठी विशेष असतो. तथापी रिचर्डसन यांनी ड्रॉ काढताना अफरातफर झाल्याच्या आरोपाचा इन्कार केला. ते पुढे म्हणाले, ‘ड्रॉ काढताना कुणावरही अन्याय केला जात नाही. विविध संघांचे रँकिंग लक्षात घेऊन आम्ही त्यांना समान गुण देतो. पूल संतुलित व्हावा, हे आमचे मुख्य उद्दिष्ट असते. योग्य पद्धतीने संघांना स्थान देण्यात येत असल्याने कुठल्याही प्रकारची अफरातफर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ (वृत्तसंस्था)दोन्ही शेजारी देशांना एकाच गटात ठेवण्याची आयसीसी स्पर्धेची ही पाचवी वेळ आहे. भारत आणि पाकमध्ये क्रिकेटप्रेमींची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. टीव्हीवरदेखील अब्जावधी लोक हा सामना पाहतात, हा आमचा अनुभव आहे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारत-पाक संघांना एकाच गटात ठेवण्यात आल्यानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. प्रसारणकर्ते आणि प्रायोजकांना लाभ पोहोचविण्यासाठी आयसीसी असे काम हेतूपुरस्सरपणे करीत असल्याचा आरोप झाला होता. आयसीसीच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी प्रथमच ही कबुली दिली आहे.