शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

भारताची पराभवाची मालिका सुरुच, सराव सामन्यातही पराभूत

By admin | Updated: February 8, 2015 16:51 IST

ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून विश्वचषकापूर्वीच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने दिलेले ३७२ धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला.

 ऑनलाइन लोकमत 

अॅडिलेड, दि. ८ - ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून विश्वचषकापूर्वीच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने दिलेले ३७२ धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.

विश्वचषकापूर्वी रविवारी अॅडिलेडमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सराव सामना रंगला. या सामन्याला अधिकृत दर्जा नसला तरी भारताच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा होता. कसोटी मालिका व त्यानंतरच्या तिरंग मालिकेतील कटू आठवणी विसरुन विश्वचषकापूर्वी विजय मिळवून मनोबल वाढवण्याची संधी भारतीय संघाकडे होती. मात्र या सामन्यात भारताचे गोलंदाज आणि फलंदाज दोघेही सपशेल अपयशी ठरले. गोलंदाजांच्या निष्प्रभ मा-यामुळे ऑस्ट्रेलियाने ४८.२ षटकांत सर्व गडी गमावत ३७१ धावांचा डोंगर उभा केला होता. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेले भारतीय फलंदाजही निराशाजनक कामगिरी करुन माघारी परतले.सलामीवीर रोहित शर्मा आणि तिस-या क्रमांकावर आलेला विराट कोहली अनुक्रमे ८ आणि १८ धावांवर बाद होऊन माघारी परतले. यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने शतकी भागीदारी करत भारताला १५० टप्पा ओलांडून दिला. भारताच्या १५७ धावा झाल्या असताना रहाणे (६६ धावा) बाद झाला. त्यानंतर १७२ धावांवर असताना धवन ५९ धावांवर बाद झाला. यानंतर भारतीय फलंदाजांनी बेजबाबदार फटकेबाजी करत विकेट गमावल्या. रैना ९ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात रनआऊट झाला. तर महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. धोनीला भोपळाही फोडता आला नाही. स्टुअर्ट बिन्नीही ५ धावांवर बाद झाला. अंबाटी रायडू (५३धावा) आणि रविंद्र जडेजा (२० धावा) या जोडीने भारताला २५० धावांचा टप्पा गाठून दिला. अक्षर पटेव व आर. अश्विनही स्वस्तात बाद झाले. 

 

धोनीची डोकेदुखी वाढली

विश्वचषकापूर्वीच्या या सामन्यात भारताला एक चांगली संधी होती. मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाजूंमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी झाली. विराट कोहलीला अद्याप सूर सापडलेला नाही. तर गोलंदाजही सपशेल अपयशी ठरले आहेत. आता भारताचा आगामी सराव सामना अफगाणिस्तानसारख्या लिंबू टिंबू संघासोबत होणार आहे. विश्वचषकात भारताची सलामीची लढत पाकसोबत आहे. यासामन्यापूर्वी सर्वोत्तम ११ जणांचा अंतिम संघ निवडताना धोनीची दमछाक होईल असे दिसते.