शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

भारताची पराभवाची मालिका सुरुच, सराव सामन्यातही पराभूत

By admin | Updated: February 8, 2015 16:51 IST

ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून विश्वचषकापूर्वीच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने दिलेले ३७२ धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला.

 ऑनलाइन लोकमत 

अॅडिलेड, दि. ८ - ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून विश्वचषकापूर्वीच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने दिलेले ३७२ धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.

विश्वचषकापूर्वी रविवारी अॅडिलेडमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सराव सामना रंगला. या सामन्याला अधिकृत दर्जा नसला तरी भारताच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा होता. कसोटी मालिका व त्यानंतरच्या तिरंग मालिकेतील कटू आठवणी विसरुन विश्वचषकापूर्वी विजय मिळवून मनोबल वाढवण्याची संधी भारतीय संघाकडे होती. मात्र या सामन्यात भारताचे गोलंदाज आणि फलंदाज दोघेही सपशेल अपयशी ठरले. गोलंदाजांच्या निष्प्रभ मा-यामुळे ऑस्ट्रेलियाने ४८.२ षटकांत सर्व गडी गमावत ३७१ धावांचा डोंगर उभा केला होता. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेले भारतीय फलंदाजही निराशाजनक कामगिरी करुन माघारी परतले.सलामीवीर रोहित शर्मा आणि तिस-या क्रमांकावर आलेला विराट कोहली अनुक्रमे ८ आणि १८ धावांवर बाद होऊन माघारी परतले. यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने शतकी भागीदारी करत भारताला १५० टप्पा ओलांडून दिला. भारताच्या १५७ धावा झाल्या असताना रहाणे (६६ धावा) बाद झाला. त्यानंतर १७२ धावांवर असताना धवन ५९ धावांवर बाद झाला. यानंतर भारतीय फलंदाजांनी बेजबाबदार फटकेबाजी करत विकेट गमावल्या. रैना ९ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात रनआऊट झाला. तर महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. धोनीला भोपळाही फोडता आला नाही. स्टुअर्ट बिन्नीही ५ धावांवर बाद झाला. अंबाटी रायडू (५३धावा) आणि रविंद्र जडेजा (२० धावा) या जोडीने भारताला २५० धावांचा टप्पा गाठून दिला. अक्षर पटेव व आर. अश्विनही स्वस्तात बाद झाले. 

 

धोनीची डोकेदुखी वाढली

विश्वचषकापूर्वीच्या या सामन्यात भारताला एक चांगली संधी होती. मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाजूंमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी झाली. विराट कोहलीला अद्याप सूर सापडलेला नाही. तर गोलंदाजही सपशेल अपयशी ठरले आहेत. आता भारताचा आगामी सराव सामना अफगाणिस्तानसारख्या लिंबू टिंबू संघासोबत होणार आहे. विश्वचषकात भारताची सलामीची लढत पाकसोबत आहे. यासामन्यापूर्वी सर्वोत्तम ११ जणांचा अंतिम संघ निवडताना धोनीची दमछाक होईल असे दिसते.