शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

भारताने गमावले.. क्रोएशियाने साधले

By admin | Updated: June 12, 2014 04:48 IST

फुटबॉल विश्वचषकाच्या मेगाइव्हेंटला सुरवात होत असताना यासंदर्भाच्या काही आठवणी भारतीयांच्या डोळ्यासमोरुन तरळून जातात.

विनय नायडू, मुंबईफुटबॉल विश्वचषकाच्या मेगाइव्हेंटला सुरवात होत असताना यासंदर्भाच्या काही आठवणी भारतीयांच्या डोळ्यासमोरुन तरळून जातात. या सोहळ्याचा भाग व्हावा अशी प्रत्येक भारतीयांची गेली अनेक वर्षे अतृप्त असलेली आणि नजीकच्या भविष्यातही अतृप्त राहण्याची शक्यता असली तरीही या खेळाचा आस्वाद मात्र भारतात पुरेपूर लुटला जातो. २0१४ च्या विश्वचषकाला ब्राझीलमध्ये प्रारंभ होत आहे, आणि येत्या महिन्याभरात हा फुटबॉल फिव्हर पुऱ्या भारताला ग्रासून टाकणार आहे. १९८२ ला भारतात दुरदर्शनचे युग सुरु झाले. १९८६ साली दिएगो माराडोनाने आपल्या देशाला वर्ल्डकप मिळवून दिला आणि या त्याच्या देदिप्यमान कामगिरीची भूरळ भारतीयांना पडली. त्यानंतरच्या सात विश्वचषकात या लाईव्ह इव्हेंटने भारतीयांच्या मनाचा ठाव घेणे उत्तरोत्तर वाढतच चालले आहे. १९८६ पासून हा खेळ भारतीयांच्या अधिक जिव्हाळ्याचा बनला आहे. विश्वचषकाचा घटक बनण्याचा योग १९५0 मध्ये भारताच्या नशिबी आला होता. पण काही घटनांमुळे हा सुवर्णयोग भारताला साधता आला नाही. त्यावर्षी पात्रता फेरीत भारताच्या गटातील सर्व संघांनी आपला सहभाग काढून घेतल्याने भारत आपोआप या स्पर्धेसाठी पात्र ठरला. पण भारतात फुटबॉलचे संचालन करणाऱ्या एआयएफएफ संघटनेने या स्पर्धेत भारतीय संघ पाठविला नाही. त्यांना या स्पर्धेचे महत्त्वच कळले नव्हते. संघाच्या प्रवास खर्चासाठी निधी नसल्याचे कारण त्यावेळी एआयएफएफने दिले होते. वास्तविक फिफाने प्रवास खर्चातील काही रक्कम आपण देतो असे सांगितले असतानाही सराव झालेला नाही, संघ निवडीचा घोळ आणि वर्ल्डकपपेक्षा आॅलिम्पिक महत्त्वाचे आहे अशा थातूर-मातूर कारणास्तव एआयएफएफने संघ पाठविण्यास नकारच दिला. १९५४ला भारताला पुन्हा संधी आली होती, पण यावेळी फिफाने भारताला सहभागी होण्यास नकार दिला. आणि त्यानंतर भारतातील फुटबॉलची अधोगती सुरु आहे ती आहेच. असे असले तरी प्रत्येक वर्ल्डकपच्या वेळी भारतातील चाहते आपआपले संघ निवडूण त्यांच्यासाठी जल्लोष करीत असतात. याशिवाय ईपीएल, ला लीगा, चॅम्पियन्स लीग या सारख्या स्पर्धांनाही भारतात मोठा प्रतिसाद लाभतो. रात्रभर जागून क्लब आणि पबमध्ये टिव्हीच्या मोठ्या पडद्यावर फुटबॉल पाहणे आजकाल नित्याचे झाले आहे. आणि आता थ्रीजी क्रांतिमुळे लॅपटॉप, मोबाईल, टॅब, ट्विटर, फेसबुक याद्वारे तर हा खेळ प्रत्येकाचे जीवन व्यापून टाकणार आहे. भारत कधी काळी या स्पर्धेचा घटक होईल या आशेने पाहणारे आपण क्रोएशियाने फुटबॉल जगतात घेतलेली भरारी पाहून थक्क होतो. १९९३ साली युगोस्लोव्हीया या देशाची फाळणी होवून क्रोएशिया वेगळा झाला, आणि १९९८ च्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी पात्रताही मिळविली. ४.५ मिलियन इतकी लोकसंख्या असलेल्या या देशाचं वय अवघं २३, आणि आता तो ब्राझिलशी टक्कर घेण्यास सज्ज झाला आहे. १९९८ साली त्यांना तिसऱ्या स्थानावर घेवून जाणारा स्ट्रायकर डेव्होर सुकेर हा त्यांचा आता मार्गदर्शक आहे. फुटबॉलचा मॅजिक आणि सांबा याचा आनंद लुटण्याची वेळ आता आली आहे.