शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

भारत इतिहास घडविण्यास उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 04:47 IST

टीम इंडिया गुरुवारपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनोखा इतिहास नोंदवण्याच्या निर्धाराने उतरणार

नवी दिल्ली : शानदार फॉर्मात असलेल्या विराट कोहलीचे नेतृत्व आणि नवे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या दांडगा अनुभव व मार्गदर्शनाखाली टीम इंडिया गुरुवारपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनोखा इतिहास नोंदवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. भारताची विदेशातील कामगिरी विशेष चांगली नाही; पण या मालिकेच्या निमित्ताने भारताला विंडीजमध्ये मालिका विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्याची संधी आहे. भारताने विंडीजमधील गेल्या २ दौऱ्यांमध्ये मालिका विजय साकारला आहे. १९५३पासून भारताने विंडीजमध्ये आतापर्यंत एकूण ४५ कसोटी सामने खेळले असून, त्यांतील ५ जिंकले, १६ गमावले तर २४ सामने अनिर्णीत राहिले. एकूण विचार करता भारताने विंडीजविरुद्ध १९४८पासून आतापर्यंत ९० कसोटी सामने खेळले. त्यांत १६ सामने जिंकले, तर ३० सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. ४४ सामने अनीर्णीत राहिले. भारत या मालिकेत ४ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे भारताच्या खात्यावर एकूण ४९९ कसोटी सामन्यांची नोंद होईल. भारताने १९५२-५३मध्ये प्रथमच विंडीजचा दौरा केला होता. भारताने विंडीजमध्ये एकूण १० मालिका खेळल्या आहेत. त्यांत ३ मालिका जिंकल्या, तर ७ मालिकांत पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वीच्या दोन्ही मालिकांत भारताने विजय मिळविला असून, या वेळी मालिकेत सरशी साधून विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्याची संधी आहे. भारताने त्यानंतर १९७५-७६मध्ये पोर्ट आॅफ स्पेनमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात ४०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४ गड्यांच्या मोबदल्यात ४०६ धावा फटकावून ऐतिहासिक विजय नोंदविला होता. २००६मध्ये किंग्स्टन येथील सबिना पार्कमध्ये भारताने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवून मालिकेत सरशी साधली होती. २०११मध्ये भारताने सबिना पार्कमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात ६३ धावांनी मिळविलेला विजय मालिकेत निर्णायक ठरला. (वृत्तसंस्था) >२००६ मध्ये टीम इंडियाने विंडीजचा ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने, तर २०११मध्ये ३ सामन्यांच्या मालिकेत १-०ने पराभव केला होता. यापूर्वी १९७१मध्ये अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली ५ सामन्यांच्या ऐतिहासिक मालिकेत भारताने १-०ने विजय मिळविला होता. २००६ च्या मालिकेत राहुल द्रविड भारतीय संघाचा कर्णधार होता, तर २०११मध्ये संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे होते. धोनीने आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, कसोटी संघाचे नेतृत्व कोहली करीत आहे. १९७५-७६ मध्ये भारताने याव्यतिरिक्त ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आणि २००२मध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी १ सामना जिंकला होता. १९७१ मध्ये ६ ते १० मार्च या कालावधीत पोर्ट आॅफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ७ गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदविला होता. या सामन्यात महान फलंदाज सुनील गावसकर यांनी पदार्पण केले होते. आॅफ स्पिनर श्रीनिवास व्यंकटराघवनने दुसऱ्या डावात ९५ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेऊन भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला होता. या मालिकेत ४ कसोटी सामने अनिर्णीत संपले होते.