शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

भारत इतिहास घडविण्यास उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 04:47 IST

टीम इंडिया गुरुवारपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनोखा इतिहास नोंदवण्याच्या निर्धाराने उतरणार

नवी दिल्ली : शानदार फॉर्मात असलेल्या विराट कोहलीचे नेतृत्व आणि नवे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या दांडगा अनुभव व मार्गदर्शनाखाली टीम इंडिया गुरुवारपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनोखा इतिहास नोंदवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. भारताची विदेशातील कामगिरी विशेष चांगली नाही; पण या मालिकेच्या निमित्ताने भारताला विंडीजमध्ये मालिका विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्याची संधी आहे. भारताने विंडीजमधील गेल्या २ दौऱ्यांमध्ये मालिका विजय साकारला आहे. १९५३पासून भारताने विंडीजमध्ये आतापर्यंत एकूण ४५ कसोटी सामने खेळले असून, त्यांतील ५ जिंकले, १६ गमावले तर २४ सामने अनिर्णीत राहिले. एकूण विचार करता भारताने विंडीजविरुद्ध १९४८पासून आतापर्यंत ९० कसोटी सामने खेळले. त्यांत १६ सामने जिंकले, तर ३० सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. ४४ सामने अनीर्णीत राहिले. भारत या मालिकेत ४ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे भारताच्या खात्यावर एकूण ४९९ कसोटी सामन्यांची नोंद होईल. भारताने १९५२-५३मध्ये प्रथमच विंडीजचा दौरा केला होता. भारताने विंडीजमध्ये एकूण १० मालिका खेळल्या आहेत. त्यांत ३ मालिका जिंकल्या, तर ७ मालिकांत पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वीच्या दोन्ही मालिकांत भारताने विजय मिळविला असून, या वेळी मालिकेत सरशी साधून विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्याची संधी आहे. भारताने त्यानंतर १९७५-७६मध्ये पोर्ट आॅफ स्पेनमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात ४०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४ गड्यांच्या मोबदल्यात ४०६ धावा फटकावून ऐतिहासिक विजय नोंदविला होता. २००६मध्ये किंग्स्टन येथील सबिना पार्कमध्ये भारताने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवून मालिकेत सरशी साधली होती. २०११मध्ये भारताने सबिना पार्कमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात ६३ धावांनी मिळविलेला विजय मालिकेत निर्णायक ठरला. (वृत्तसंस्था) >२००६ मध्ये टीम इंडियाने विंडीजचा ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने, तर २०११मध्ये ३ सामन्यांच्या मालिकेत १-०ने पराभव केला होता. यापूर्वी १९७१मध्ये अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली ५ सामन्यांच्या ऐतिहासिक मालिकेत भारताने १-०ने विजय मिळविला होता. २००६ च्या मालिकेत राहुल द्रविड भारतीय संघाचा कर्णधार होता, तर २०११मध्ये संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे होते. धोनीने आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, कसोटी संघाचे नेतृत्व कोहली करीत आहे. १९७५-७६ मध्ये भारताने याव्यतिरिक्त ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आणि २००२मध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी १ सामना जिंकला होता. १९७१ मध्ये ६ ते १० मार्च या कालावधीत पोर्ट आॅफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ७ गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदविला होता. या सामन्यात महान फलंदाज सुनील गावसकर यांनी पदार्पण केले होते. आॅफ स्पिनर श्रीनिवास व्यंकटराघवनने दुसऱ्या डावात ९५ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेऊन भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला होता. या मालिकेत ४ कसोटी सामने अनिर्णीत संपले होते.