शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भारत इतिहास घडविण्यास उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 04:47 IST

टीम इंडिया गुरुवारपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनोखा इतिहास नोंदवण्याच्या निर्धाराने उतरणार

नवी दिल्ली : शानदार फॉर्मात असलेल्या विराट कोहलीचे नेतृत्व आणि नवे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या दांडगा अनुभव व मार्गदर्शनाखाली टीम इंडिया गुरुवारपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनोखा इतिहास नोंदवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. भारताची विदेशातील कामगिरी विशेष चांगली नाही; पण या मालिकेच्या निमित्ताने भारताला विंडीजमध्ये मालिका विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्याची संधी आहे. भारताने विंडीजमधील गेल्या २ दौऱ्यांमध्ये मालिका विजय साकारला आहे. १९५३पासून भारताने विंडीजमध्ये आतापर्यंत एकूण ४५ कसोटी सामने खेळले असून, त्यांतील ५ जिंकले, १६ गमावले तर २४ सामने अनिर्णीत राहिले. एकूण विचार करता भारताने विंडीजविरुद्ध १९४८पासून आतापर्यंत ९० कसोटी सामने खेळले. त्यांत १६ सामने जिंकले, तर ३० सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. ४४ सामने अनीर्णीत राहिले. भारत या मालिकेत ४ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे भारताच्या खात्यावर एकूण ४९९ कसोटी सामन्यांची नोंद होईल. भारताने १९५२-५३मध्ये प्रथमच विंडीजचा दौरा केला होता. भारताने विंडीजमध्ये एकूण १० मालिका खेळल्या आहेत. त्यांत ३ मालिका जिंकल्या, तर ७ मालिकांत पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वीच्या दोन्ही मालिकांत भारताने विजय मिळविला असून, या वेळी मालिकेत सरशी साधून विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्याची संधी आहे. भारताने त्यानंतर १९७५-७६मध्ये पोर्ट आॅफ स्पेनमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात ४०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४ गड्यांच्या मोबदल्यात ४०६ धावा फटकावून ऐतिहासिक विजय नोंदविला होता. २००६मध्ये किंग्स्टन येथील सबिना पार्कमध्ये भारताने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवून मालिकेत सरशी साधली होती. २०११मध्ये भारताने सबिना पार्कमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात ६३ धावांनी मिळविलेला विजय मालिकेत निर्णायक ठरला. (वृत्तसंस्था) >२००६ मध्ये टीम इंडियाने विंडीजचा ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने, तर २०११मध्ये ३ सामन्यांच्या मालिकेत १-०ने पराभव केला होता. यापूर्वी १९७१मध्ये अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली ५ सामन्यांच्या ऐतिहासिक मालिकेत भारताने १-०ने विजय मिळविला होता. २००६ च्या मालिकेत राहुल द्रविड भारतीय संघाचा कर्णधार होता, तर २०११मध्ये संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे होते. धोनीने आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, कसोटी संघाचे नेतृत्व कोहली करीत आहे. १९७५-७६ मध्ये भारताने याव्यतिरिक्त ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आणि २००२मध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी १ सामना जिंकला होता. १९७१ मध्ये ६ ते १० मार्च या कालावधीत पोर्ट आॅफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ७ गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदविला होता. या सामन्यात महान फलंदाज सुनील गावसकर यांनी पदार्पण केले होते. आॅफ स्पिनर श्रीनिवास व्यंकटराघवनने दुसऱ्या डावात ९५ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेऊन भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला होता. या मालिकेत ४ कसोटी सामने अनिर्णीत संपले होते.