शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

भारताकडे 339 धावांची भक्कम आघाडी

By admin | Updated: October 2, 2016 18:05 IST

न्यूझीलंडला गुंडाळल्यानंतर भारताची आघाडीची आणि मधली फळी तंबूत परतली. विराट, रहाणे, धवन पुजारासारके खंदे फलंदाज झटपट बाद झाले

ऑनलाइन लोकमत कोलकाता, दि. २ : कोलकाता कसोटीच्या तिस-या दिवसअखेर भारताकडे 339 धावांची भक्कम आघाडी असून अजूनही भारताचे 2 फलंदाज बाकी आहेत.  पहिल्या डावातील अर्धशतकवीर वृद्दीमान साहा(39) अवघड परिस्थितीतही मैदानावर तग धरून आहे. त्याच्यासोबत भुवनेश्वर कुमार 8 धावांवर नाबाद आहे. भारताच्या 8 बाद 227 धावा झाल्या आहेत. त्यापुर्वी रोहीत शर्माच्या जिगरबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने समाधानकारक धावसंख्या उभारली.  न्यूझीलंडला गुंडाळल्यानंतर भारताची(82) आघाडीची आणि मधली फळी तंबूत परतली. विराट, रहाणे, धवन पुजारासारके खंदे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे सामन्यात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. उपाहारापर्यंत भारताने सांभाळून खेळ केला मात्र उपाहारानंतर किवी गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला आहे. विजयने ७, धवनने १७ तर पुजाराने ४ धावा केल्या. तर रहाणे अवघी १ धाव करुन माघारी परतला. तिसऱ्या दिवशी खेळपट्टीने अचानकच रंग बदलल्याचे पाहायला मिळाले. चेंडू कधी अचानक उसळी घेत आहे तर कधी प्रमाणापेक्षा खाली राहत आहे. त्यामुळे फलंदाजांना खास अडचणी येत आहेत. या बिकट परिस्थितीतही विराट कोहलीने (४६) रोहित शर्माच्या साथीने डाव सावरण्याचा संघर्षपूर्ण प्रयत्न केला. मात्र, खाली राहिलेल्या चेंडूवर विराट बाद झाल्याने ९१ धावांतच भारताचा निम्मा संघ आता तंबूत परतला. न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलरनेही खेळपट्टीचा रंग बघून जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजांकडून गोलंदाजी करवून घेत आहे. किवी संघाकडून मॅट हेन्रीने ३ तर ट्रेंट बोल्ट याने २ गडी बाद केले आहेत.दरम्यान, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली आहे. भुवी आणि महंमद शमीच्याच्या दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. भारताक पहिल्या डावात ११२ धावांची आघाडी घेत दुसऱ्या कसोटी सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ५, महंमद शमीने ३ तर जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला, त्या वेळी बीजे वॉटलिंगला (१२) जीतेन पटेल (०५) साथ खेळत होते. बीजे वॉटलिंगला २५ धावावर शमीने बाद केले तर पटेलचा अडथळा अश्विनने दूर केला. शमीने न्युझीलंडचे शेपूट गुंडाळत भारताला ११२ धावांची आघाडी मिळवून दिली. न्युझीलंडतर्फे हेन्री तीन तर बोल्ट, वॅगनर व पटेलने प्रत्येकी दोन तर सँटनरने एक बळी टिपला.भारताने आपल्या घरच्या 250 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव ३१६ धावांत संपुष्टात आला. पुजारा (८७) आणि रहाने (७७) आणि रिद्धिमान साहा (५४) यांनी अर्धशतकी खेळी केली.