शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भारत चौथ्या स्थानी

By admin | Updated: December 15, 2014 00:01 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला आज, रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भुवनेश्वर : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला आज, रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताला काल, शनिवारी उपांत्य फेरीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ३-४ ने पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने या धक्क्यातून सावरताना तिसऱ्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या लढतीत चांगली कामगिरी केली; पण ५२ व्या मिनिटाला स्वीकारावा लागलेल्या गोलमुळे त्यांचे तिसरे स्थान पटकाविण्याचे स्वप्न भंगले. भारताला या स्पर्धेत पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय संघ २०१२ मध्ये मेलबोर्नमध्ये खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या स्पर्धेत पाकविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे चौथ्या स्थानावर होता. अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरलेला १३ वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाला यावेळी तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आॅस्ट्रेलियाने यापूर्वी सलग पाचवेळा या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला आहे. आज खेळल्या गेलेल्या लढतीत आॅस्ट्रेलियातर्फे १८ व्या मिनिटाला अ‍ॅडी ओकेनडेनने मैदानी गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर भारताला बरोबरी साधण्यासाठी ४२ व्या मिनिटापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. ललित उपाध्यायने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला मॅट गोड््सने मैदानी गोल नोंदवीत आॅस्ट्रेलियाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारताने त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी जोरकस प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. भारतीय संघ यापूर्वी २०१२, २००४, २००३, २००२, १९९६ व १९८३ मध्ये चौथ्या स्थानावर होता. भारताने १९८२ मध्ये केवळ एकदा तिसरे स्थान पटकाविले होते. (वृत्तसंस्था)