शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

भारत, इंग्लंड संघांचा सराव

By admin | Updated: January 25, 2017 00:39 IST

भारत आणि इंग्लंड संघांनी ग्रीन पार्कमध्ये २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्याच्या तयारीसाठी मंगळवारी कसून सराव केला.

कानपूर : भारत आणि इंग्लंड संघांनी ग्रीन पार्कमध्ये २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्याच्या तयारीसाठी मंगळवारी कसून सराव केला. सकाळच्या सत्रात इंग्लंड संघाने, तर दुपारच्या सत्रात भारतीय संघाने सराव केला. इंग्लंड संघाने सराव केला त्या वेळी मीडियाला सराव सत्राचे छायचित्र काढण्याची परवानगी देण्यात आली होती; पण भारतीय संघाच्या सरावाच्या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव मीडियाला रोखण्यात आले. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे (यूपीसीए) मीडिया व्यवस्थापक ए. ए. खान तालिब यांनी सांगितले, की इंग्लंड संघ सकाळी ९ वाजता स्टेडियममध्ये दाखल झाला आणि त्यांनी १२.३० पर्यंत सराव केला. भारतीय संघाने दुपारी १ वाजल्यानंतर सरावाला सुरुवात केली. उभय संघातील सर्वच खेळाडू सराव सत्रामध्ये सहभागी झाले. सरावादरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख होती. (वृत्तसंस्था)येथे खेळल्या जाणाऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेकीचा कौल मिळविणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करण्यास पसंती द्यायला हवी. कारण अखेरच्या षटकांमध्ये चेंडू स्विंग होत असल्यामुळे येथे फलंदाजी करणे अडचणीचे जाते, असे मत ग्रीन पार्कचे क्युरेटर यांनी व्यक्त केले. फिरकीला अनुकूल ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर २६ जानेवारी रोजी पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे. या खेळपट्टीवर कसोटीसामन्यादरम्यान चेंडू जेवढा वळतो त्यातुलनेत टी-२० सामन्यादरम्यान चेंडू वळणार नाही, असेही क्युरेटरने म्हटले आहे.प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला लाभ मिळेल : क्युरेटरसामना सायंकाळी ४.३० वाजता सुरू होणार असून ८ वाजेपर्यंत संपेल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६० ते १७० धावांपर्यंत मजल मारायला हवी, अशी शक्यता अस्थायी क्युरेटर शिव कुमार यांनी व्यक्त केली. हिवाळा असल्यामुळे सायंकाळी ५ वाजतानंतर दव पडण्यास सुरुवात होईल. त्याचा गोलंदाजांना लाभ मिळेल. अखेरच्या षटकांमध्ये चेंडू अधिक स्विंग होण्याची शक्यता असल्यामुळे फलंदाजी करणे कठीण होईल. पहिले धोनी; आता विराट बजावतो खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्याची भूमिका : हार्दिक पंड्याइंग्लंडविरुद्ध कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने सरशी साधल्यामुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला आनंद झाला आहे. दोन्ही मालिका जिंकल्यामुळे मनोधैर्य उंचावलेले असून, २६ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० मालिकेतही संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. सुरुवातीला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्याचे कार्य करीत होता, आता तीच भूमिका कर्णधार विराट कोहली बजावत असल्याचे पंड्याने एका उत्तरात स्पष्ट केले. ग्रीन पार्कवर सराव सत्रापूर्वी पत्रकारांसोबत बोलताना पंड्या म्हणाला, ‘‘भारतीय संघ कसोटी व वन-डे मालिकेप्रमाणे टी-२० मालिकेतही कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेल. संघात काही नवे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे संघ मजबूत झाला आहे.’’

भारतीय खेळाडू राष्ट्रध्वजाचा बॅच लावून खेळण्याची शक्यता : शुक्लाभारतीय क्रिकेट संघ २६ जानेवारी रोजी गणराज्य दिनाच्या पर्वावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान राष्ट्रध्वजाचा बॅच लावून खेळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना (यूपीसीए) याबाबत भारतीय संघ व्यवस्थापनासोबत चर्चा करणार आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले, की यूपीसीएतर्फे राष्ट्रध्वजाचे बॅच खेळाडूंसाठी उपलब्ध करून देणार आहे.