शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

भारत, इंग्लंड संघ नागपुरात

By admin | Updated: January 28, 2017 00:41 IST

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये २९ जानेवारी (रविवारी) रोजी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी यजमान भारत आणि पाहुणा इंग्लंड संघ

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये २९ जानेवारी (रविवारी) रोजी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी यजमान भारत आणि पाहुणा इंग्लंड संघ आज, शुक्रवारी नागपुरात डेरेदाखल झाला. निर्धारित वेळपूर्वीच उभय संघ येथे पोहोचल्यामुळे व्हीसीए पदाधिकारी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धावपळ करावी लागली. कानपूर येथे गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाचे लखनौ येथून विशेष विमानाने नागपुरात आगमन झाले. स्थानिक विदर्भ क्रिकेट असोसिएशनने उभय संघ दुपारी २ वाजता येथे पोहोचणार असल्याचे कळविले होते, पण उभय संघांचे निर्धारित वेळेपूर्वीच १२.४० वाजता येथे आगमन झाले. विमानतळाहून कडक सुरक्षा व्यवस्थेत उभय संघ लक्झरी बसने वर्धा मार्गावरील हॉटले रेडिसन ब्ल्यूकडे रवाना झाले. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत पहिल्या लढतीत विजय मिळवित १-० ने आघाडी घेणारा इंग्लंड संघ शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत सराव करणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्यास उत्सुक असलेला भारतीय संघ सकाळी दहा वाजता आणि इंग्लंडचा संघ दुपारी साडेबारा वाजता सराव करणार आहे. कसोटी मालिका व वन-डे सामन्यांची मालिका जिंकणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी टी-२० सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. चाहत्यांमध्ये या लढतीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. सर्व तिकीट ‘बुक’ झाल्या असून रविवारी स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’ राहणार हे निश्चित आहे. (क्रीडा प्रतिनिधी)भारताला विजयाची प्रतीक्षा!व्हीसीएच्या जामठा मैदानावर याआधी टीम इंडियाने दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागल्याने इंग्लंडविरुद्ध विजयाचे खाते उघडण्याची प्रतीक्षा राहील. ९ डिसेंबर २००९ रोजी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने ५ बाद २१५ धावा उाभरल्या. भारताला ९ बाद १८६ धावांत रोखल्याने भारत २९ धावांनी पराभूत झाला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध १५ मार्च २०१६ रोजी टी-२० विश्वचषकातील सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडने ७ बाद १२६ धावा उभारल्यानंतर भारताला अवघ्या ७९ धावांत गुंडाळले.मोहम्मद शमीला पितृशोकभारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे वडील तौसिफ अली यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळेटी-२० संघासोबत असलेला शमी गुरुवारी रात्रीच अमरोहाकडे रवाना झाला.शमी गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर रिहॅबिलिटेशन म्हणून टी-२० संघासोबत होता. गुरुवारी रात्री ११.३० वा. समीसाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. तो मुरादाबाद मार्ग अमरोहाकडे रवाना झाला.