शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवले

By admin | Updated: June 13, 2017 04:42 IST

भारताने दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला, या विजयाने भारताने उपांत्य फेरीत जागा नक्की केली. दक्षिण आफ्रिकेने ज्या प्रकारचा खेळ केला, त्यामुळे मी नक्कीच

- अयाझ मेमन भारताने दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला, या विजयाने भारताने उपांत्य फेरीत जागा नक्की केली. दक्षिण आफ्रिकेने ज्या प्रकारचा खेळ केला, त्यामुळे मी नक्कीच हैराण झालो आहे. पूर्ण सामन्यात असे वाटले नाही की, हा एक मजबूत संघ आहे. उलट वाटत होते की, आफ्रिकेचा संघ एक कमकुवत संघ आहे. कोण म्हणेल की, हा संघ जगातील अव्वल क्रमांकावर असलेला संघ आहे? ज्या पद्धतीने ते मैदानावर उतरले; वाटलेच नाही की, हे खेळाडू एक चांगली रणनीती बनवून मैदानावर आले आहेत. ए.बी. डिव्हिलियर्स, डेव्हिड मिलर ज्या पद्धतीने धावबाद झाले, ते पाहून आफ्रिकेचे खेळाडू घाबरून खेळत आहे, असेच वाटत होते. त्याशिवाय असे वाटत होते की, काहीसे दचकून खेळत आहेत. हाशीम आमला आणि क्विंटन डी कॉक हे खूप शानदार फलंदाजी करतात. मोकळेपणाने फटके खेळण्यासाठी ते ओळखले जातात. मात्र, भारताची जलदगती गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षणाने त्यांच्यावर अंकुश लावला होता. तरीही त्यांनी पहिल्या गड्यासाठी चांगली भागिदारी केली. मात्र, त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडच्या वातावरणात १९१ ही धावसंख्या खूप मोठी नक्कीच नाही. गोलंदाजांना स्विंग मिळत नाही, तेव्हा ही धावसंख्या खूपच कमी होते. मला वाटते की, दक्षिण आफ्रिकेने त्यांचा चोकर्सचा शिक्का सिद्ध केला. मला आधी वाटत होते की, ही माध्यमांमध्ये रंगवली जाणारी चर्चा आहे. मात्र, गेल्या २७ वर्षात दक्षिण आफ्रिकेला आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. मात्र, रँकिंग बदलत असते. जर तुम्ही एकही मोठा चषक घेऊन जाऊ शकत नाही, तर या रॅँकिंगचा काहीच फायदा नाही. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देऊ शकत नाही. भारताच्या खेळाचा विचार केला, तर संघाचा खेळ उत्कृष्ट होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले. कुठेही वाटले नाही की, भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. काही निराशा आहे, त्या उलट वाटले की, भारतीय संघात उपांत्य फेरीत पोहोचण्याची आणि विजयाची भूक आहे. भारताने नाणेफेक जिंकले, हा नशिबाचा भाग झाला. फक्त नाणेफेक जिंकल्याने फार काही होत नसते. ज्यापद्धतीने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण झाले, त्यामुळे संघाने हा सामना जिंकला. हार्दिक पांड्याकडून एक झेल सुटला होता. रिटर्न कॅच पकडणे सोपे नसते. त्याशिवाय भारताने जी स्फूर्ती दाखवली, ती विलक्षण होती. दोन धावांएवजी एकच धाव दिली. चौकार अडवले आणि धावबाददेखील उत्तम केले. यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांमध्ये चांगला ताळमेळ होता. गोलंदाजीतही चांगले बदल केले. आर. अश्विनला पुन्हा संघात घेतले. गडी बाद करण्यासाठी गरज असलेले गोलंदाज योग्यपणे वापरले. आफ्रिकेकडे तीन डावखुरे फलंदाज असल्याने चांगल्या फिरकीपटूची गरज असते. रवींद्र जाडेजानेही चांगली गोलंदाजी केली, विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह. त्याला या स्पर्धेत आतापर्यंत एकही गडी बाद करता आला नव्हता. त्याने या सामन्यात दोन गडी बाद केले. त्याला सामनावीराचा बहुमानदेखील मिळाला, त्याचा आत्मविश्वास यामुळे वाढला असेल. शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंह यांची फलंदाजी अप्रतिम होती. १२८ धावांची भागिदारी अशी केली; जसे ते मैदानात सहजतेने फिरण्यासाठी आले होते. हा एक खूप चांगला खेळ होता. आता विराट कोहली आणि कंपनीचे लक्ष्य अंतिम फेरीवर नक्कीच आहे.

(संपादकीय सल्लागार)