शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

शूटआउटमध्ये रशियाकडून भारताचा पराभव...

By admin | Updated: August 8, 2016 03:41 IST

आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिला तिरंदाजी संघ रिकर्व्ह प्रकारात अटीतटीच्या उपांत्यपूर्व फेरीत रशियाकडून ४-५ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. ८ : आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिला तिरंदाजी संघ रिकर्व्ह प्रकारात अटीतटीच्या उपांत्यपूर्व फेरीत रशियाकडून ४-५ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ४-४ अशी बरोबरी असताना निर्णायक सेटमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आपले कसब पणाला लावले होते. दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी माझी, बोम्बायलादेवी या तिघींकडून यावेळी सरस कामगिरी अपेक्षित होती.

मात्र, निर्णायक क्षणी त्या दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याने भारताला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. अखेरच्या क्षणी रशियन तिरंदाजाने ९ तर भारतीय तिरंदाजाने ८ गुण नोंदवताच या सेटचा निकाल २५-२३ असा रशियाच्या बाजूने गेला आणि भारत पराभूत झाला. ट्युनिया डॉशीजोर्झी, सेनिया पेरोवा आणि इना स्टेपनोवा यांचा समावेश असलेल्या रशियन संघाने ही लढत ५५-४८, ५२-५३, ५०-५३, ५५-५४, २५-२३ अशी जिंकली.

तत्पूर्वी, कोलंबियाला ५-३ असे हरवून भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली. दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी माझी, बोम्बायलादेवी सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यात अपयशी ठरल्या असल्या तरी कोलंबियावर सरशी साधण्यात त्या यशस्वी ठरल्या. पहिल्या तीन सेट नंतर दोन्ही संघ ३-३ असे बरोबरीत होते, शेवटच्या फेरीत भारताच्या ५२ गुणांना मागे टाकण्यासाठी कोलंबियाला २८ गुणांची आवश्यकता होती, परंतु त्यांच्या कॅरोलिन एगुईरे हिने मोठी चूक केली.