शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

भारतीय संघ प्रदीर्घ काळ क्रमवारीत अव्वल स्थानावर राहू शकतो : लक्ष्मण

By admin | Updated: September 20, 2016 05:26 IST

सध्याचा भारतीय संघ प्रदीर्घ काळ क्रमवारीत अव्वल स्थानावर राहू शकतो, असे भाकीत शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने वर्तविले आहे.

नवी दिल्ली : सध्याचा भारतीय संघ प्रदीर्घ काळ क्रमवारीत अव्वल स्थानावर राहू शकतो, असे भाकीत शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने वर्तविले आहे. एके काळी वेस्ट इंडीज व आॅस्ट्रेलिया या संघांनी जसे जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले, तसे वर्चस्व गाजवण्याची क्षमता सध्याच्या भारतीय संघात आहे, असेही लक्ष्मण म्हणाला. न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याने भारतीय संघाच्या यंदाच्या मायदेशातील प्रदीर्घ सत्राची सुरुवात होणार आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्यास उत्सुक आहे. लक्ष्मणच्या मते विराट कोहली ‘ट्रेंडसेटर’ आहे. लक्ष्मण म्हणाला, ‘‘कसोटी खेळणाऱ्या तीन सर्वोत्तम संघांविरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे. भारतीय संघामध्ये अव्वल स्थान पटकावण्याची क्षमता असून संघाला प्रदीर्घ काळ हे स्थान कायम राखता येईल. संघातील प्रत्येक खेळाडू युवा असून विदेशात खेळण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. विदेशात खेळण्याच्या अनुभवामुळे खेळाडू परिपक्व होतोे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो.’’ लक्ष्मण पुढे म्हणाला, ‘‘मायदेशात खेळताना भारतीय खेळाडूंना येथील परिस्थितीची चांगली माहिती असते. त्यामुळे खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे.’’भारताने कानपूर कसोटीत पाच गोलंदाजांसह खेळायला हवे. मुरली विजय व के. एल. राहुल यांनी डावाची सुरुवात करावी, तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या पुजाराने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असेही लक्ष्मण या वेळी म्हणाला. जगातील सर्वोत्तम कसोटी संघ म्हणून स्थान मिळविण्यासाठी सध्या संघाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे लक्ष्मणने सांगितले. याबाबत लक्ष्मण म्हणाला, ‘‘सर्व खेळाडू योग्य वेळी फॉर्मात असून कारकिर्दीच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांत आहेत. भारतीय संघात प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असून फलंदाजी, क्षेत्ररक्षण, फिरकी गोलंदाजी व वेगवान गोलंदाजी या सर्वंच विभागात संघ सरस आहे.’’कोहलीची प्रशंसा करताना लक्ष्मण म्हणाला, ‘‘विराट नशीबवान आहे. त्याच्याकडे परिस्थितीनुसार निवड करण्यासाठी खेळाडूंचा पर्याय उपलब्ध आहे. कोहली प्रेरणादायी व ‘ट्रेंडसेटर’ आहे. कारण, तो सहकाऱ्यांना चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रेरित करतो. तो नेहमी विजयासाठी प्रयत्नशील असतो.’’ (वृत्तसंस्था)