शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारत ‘चॅम्पियन’ बनू शकतो

By admin | Updated: January 15, 2015 04:27 IST

फलंदाजीच्या शानदार क्रमवारीच्या बळावर गतविजेता टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकात चॅम्पियन बनू शकतो,

नवी दिल्ली : फलंदाजीच्या शानदार क्रमवारीच्या बळावर गतविजेता टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकात चॅम्पियन बनू शकतो, असे मत माजी कोच जॉन राईट यांनी व्यक्त केले.६० वर्षांचे जॉन राईट म्हणाले, ‘सध्याच्या संघाचा फलंदाजी क्रम २०११ च्या विश्वविजेत्या संघासारखाच आहे. अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची पुरेपूर साथ लाभल्यास भारत निश्चितपणे जेतेपदाचा हकदार राहील. गतवेळेच्या तुलनेत सध्याच्या संघात युवा जोश आहे. काही नवे चेहरे आहेत. विश्वचषकात निकाल हे लवकर गडी बाद करण्यावर आणि झेल घेण्यावर अवलंबून असतात.’सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद सांभाळणारे राईट पुढे म्हणाले, ‘आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका आणि नंतर तिरंगी मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाला विश्वचषक खेळण्यासाठी भरपूर संधी मिळणार आहे. पण आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकात जेतेपद मिळविण्यासाठी गोलंदाजी तसेच फिल्डिंगमध्ये सुधारणेस वाव असेल.’१४ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या क्रिकेटच्या महाकुंभात विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू महत्त्वपूर्ण भूमिका वठवतील, असे भाकीत करीत राईट म्हणाले, ‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत विराटने नेतृत्वगुणांची चमक दाखविली आहे. कर्णधारपद हे कोचिंगसारखेच असून यात उत्कृष्ट कामगिरी करण्यासोबतच उत्तम नेतृत्व देखील करावे लागते. विराटने दोन्ही आघाड्यांवर यशस्वी काम केले. रोहित हा क्षमतावान आणि मॅचविनर आहे. वीरेंद्र सेहवाग आणि युवराज यांना संधी न मिळाल्याबद्दल राईट यांनी निवडकर्त्यांसाठी हा कठीण निर्णय असल्याचे सांगून भविष्यात भारतीय संघाचे कोच बनणार असल्याची शक्यता फेटाळून लावली.(वृत्तसंस्था)