शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

महामुकाबल्यात भारताचा विजय, पाकिस्तानाला 124 धावांनी लोळवलं

By admin | Updated: June 4, 2017 23:32 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला 125 धावांनी लोळवतं आयसीसीच्या या स्पर्धेची सुरुवात झोकात केली.

ऑनालइन लोकमतबर्मिंगहॅम, दि. 4 - चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला 125 धावांनी लोळवतं आयसीसीच्या या स्पर्धेची सुरुवात झोकात केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानाला 320 धावांचे आव्हान दिले होते. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानाला 41 षटकांत 289 धावांचे सुधारीत लक्ष दिले होते. या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 164 धावांत बाद झाला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. भारताकडून यादवने तीन फलंदाज बाद केले तर पंड्या, आणि जाडेजाने प्रत्येकी दोन बळी मिळवले. तर भुवनेश्वर कुमारने एक बळी घेतलाभुवनेश्वर कुमारने सलामीवीर अहमद शहझादला 12 धावांवर पायचीत केल्यावर उमेश यादवने फॉर्मात असलेल्या बाबर आझमला स्वस्तात माघारी धाडले आहे. बाबर आझामला उमेश यादवने ८ धावांवर बाद केले. यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या अझर अलीला जाडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. सलामीवीर अजहर अलीने दमदार अर्धशकत करत संघाची धावसंख्या वाढवली. पण अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. शोयब मलिकने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत संघाची धावसंऱ्या वाढवण्याता प्रयत्न केला. पण जाडेजाच्या एका सुरेख फेकीवर मलिक बाद झाला. मलिक बाद झाल्यानंतर कर्णधार सर्फराज अहमदही तंबूत परताला. सर्फराज अहमदला हार्दिक पंड्याने 15 धावांवर धोनीकरवी झेलबाद केले. अमाद वासिमही हार्दिक पंड्याचा शिकार ठरला.

 

त्यापूर्वी,  एकीकडे एजबेस्टनच्या मैदानात पावसाची रिमझिम सुरू असतानाच भारतीय फलंदाजांनीही धावांची जोरदार बरसात केली.  रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग आणि विराट कोहली यांनी फटकावलेली शानदार अर्धशतके आणि शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने केलेल्या षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर भारताने 3 बाद 319 धावा कुटल्या.  

 पावसाच्या व्यत्ययामुळे वारंवार थांबत असलेल्या लढतीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील साखळी लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारताने सावध सुरुवात केली. दरम्यान,  दहाव्या षटक सुरू असताना पहिल्यांदा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. तोपर्यंत रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारतीय सलामीवीरांनी 9.5 षटकात संघाला बिनबाद 46 धावांपर्यंत मजल मारून दिली होती.  
 
पाऊस थांबल्यावर धवन आणि रोहितने फलंदाजीचा गिअऱ बदलला. दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करत संघाला शंभरीपार नेले. जोरदार फटकेबाजी करणारा शिखर धवन 65 चेंडूत 68 धावा काढून माघारी परतला. शादाब खानने धवनला अझर अलीकडे झेल देण्यास भाग पाडले. शिखर धवनने बाद होण्यापूर्वी रोहित शर्मासोबत दमदार 136 धावांची शतकी सलामी दिली. 
धवन बाद झाल्यावर रोहित आणि विराटची मैदानावर जमली. दरम्यान, पुन्हा पावसाचा व्यत्यय आला.  पाऊस थांबल्यावर दोन षटके कमी करून सामना 48 षटकांचा करण्यात आला. रोहित शर्मा दमदार फलंदाजी करत असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रोहित शर्माचे शतक थोडक्यात हुकले. त्याने 91 धावांची खेळी केली.
 
त्यानंतर युवराज आणि कोहलीने तुफान फटकेबाजीस सुरुवात करत पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे काढली. आज विराट कोहलीपेक्षाही युवराज अधिक आक्रमकपणे खेळत होता. या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण  करत संघाला तीनशे धावांच्या उंबरठ्यावर पोहोचवले. याचदरम्यान युवराज 53 धावा काढून बाद झाला. अखेर शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने तीन षटकार ठोकत भारताला 319 धावांपर्यंत मजल मारून दिली. विराट 81, तर पांड्या 20 धावा काढून नाबाद राहिले. 
 

धावफलक

 

भारत : रोहित शर्मा धावबाद (बाबर आझम/सर्फराज अहमद) ९१, शिखर धवन झे. अझहर अली गो. शादाब खान ६८, विराट कोहली नाबाद ८१, युवराज सिंग पायचीत गो. हसन अली ५३, हार्दिक पंड्या नाबाद २0. एकूण : ४८ षटकांत ३ बाद ३१९.

गडी बाद क्रम : १-१३६ (शिखर धवन, २४.३), २-१९२ (रोहित शर्मा, ३६.४). ३-२८५ (युवराज सिंग, ४६.२).

गोलंदाजी : मोहंमद आामर ८.१-१-३२-0, इमाद वसीम ९.१-0-६६-0, हसन अली १0-0-७0-१, वहाब रियाज ८.४-0-८७-0, शादाब खान १0-0-५२-१, शोएब मलिक २-0-१0-0.