शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

महामुकाबल्यात भारताचा विजय, पाकिस्तानाला 124 धावांनी लोळवलं

By admin | Updated: June 4, 2017 23:32 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला 125 धावांनी लोळवतं आयसीसीच्या या स्पर्धेची सुरुवात झोकात केली.

ऑनालइन लोकमतबर्मिंगहॅम, दि. 4 - चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला 125 धावांनी लोळवतं आयसीसीच्या या स्पर्धेची सुरुवात झोकात केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानाला 320 धावांचे आव्हान दिले होते. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानाला 41 षटकांत 289 धावांचे सुधारीत लक्ष दिले होते. या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 164 धावांत बाद झाला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. भारताकडून यादवने तीन फलंदाज बाद केले तर पंड्या, आणि जाडेजाने प्रत्येकी दोन बळी मिळवले. तर भुवनेश्वर कुमारने एक बळी घेतलाभुवनेश्वर कुमारने सलामीवीर अहमद शहझादला 12 धावांवर पायचीत केल्यावर उमेश यादवने फॉर्मात असलेल्या बाबर आझमला स्वस्तात माघारी धाडले आहे. बाबर आझामला उमेश यादवने ८ धावांवर बाद केले. यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या अझर अलीला जाडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. सलामीवीर अजहर अलीने दमदार अर्धशकत करत संघाची धावसंख्या वाढवली. पण अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. शोयब मलिकने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत संघाची धावसंऱ्या वाढवण्याता प्रयत्न केला. पण जाडेजाच्या एका सुरेख फेकीवर मलिक बाद झाला. मलिक बाद झाल्यानंतर कर्णधार सर्फराज अहमदही तंबूत परताला. सर्फराज अहमदला हार्दिक पंड्याने 15 धावांवर धोनीकरवी झेलबाद केले. अमाद वासिमही हार्दिक पंड्याचा शिकार ठरला.

 

त्यापूर्वी,  एकीकडे एजबेस्टनच्या मैदानात पावसाची रिमझिम सुरू असतानाच भारतीय फलंदाजांनीही धावांची जोरदार बरसात केली.  रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग आणि विराट कोहली यांनी फटकावलेली शानदार अर्धशतके आणि शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने केलेल्या षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर भारताने 3 बाद 319 धावा कुटल्या.  

 पावसाच्या व्यत्ययामुळे वारंवार थांबत असलेल्या लढतीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील साखळी लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारताने सावध सुरुवात केली. दरम्यान,  दहाव्या षटक सुरू असताना पहिल्यांदा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. तोपर्यंत रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारतीय सलामीवीरांनी 9.5 षटकात संघाला बिनबाद 46 धावांपर्यंत मजल मारून दिली होती.  
 
पाऊस थांबल्यावर धवन आणि रोहितने फलंदाजीचा गिअऱ बदलला. दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करत संघाला शंभरीपार नेले. जोरदार फटकेबाजी करणारा शिखर धवन 65 चेंडूत 68 धावा काढून माघारी परतला. शादाब खानने धवनला अझर अलीकडे झेल देण्यास भाग पाडले. शिखर धवनने बाद होण्यापूर्वी रोहित शर्मासोबत दमदार 136 धावांची शतकी सलामी दिली. 
धवन बाद झाल्यावर रोहित आणि विराटची मैदानावर जमली. दरम्यान, पुन्हा पावसाचा व्यत्यय आला.  पाऊस थांबल्यावर दोन षटके कमी करून सामना 48 षटकांचा करण्यात आला. रोहित शर्मा दमदार फलंदाजी करत असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रोहित शर्माचे शतक थोडक्यात हुकले. त्याने 91 धावांची खेळी केली.
 
त्यानंतर युवराज आणि कोहलीने तुफान फटकेबाजीस सुरुवात करत पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे काढली. आज विराट कोहलीपेक्षाही युवराज अधिक आक्रमकपणे खेळत होता. या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण  करत संघाला तीनशे धावांच्या उंबरठ्यावर पोहोचवले. याचदरम्यान युवराज 53 धावा काढून बाद झाला. अखेर शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने तीन षटकार ठोकत भारताला 319 धावांपर्यंत मजल मारून दिली. विराट 81, तर पांड्या 20 धावा काढून नाबाद राहिले. 
 

धावफलक

 

भारत : रोहित शर्मा धावबाद (बाबर आझम/सर्फराज अहमद) ९१, शिखर धवन झे. अझहर अली गो. शादाब खान ६८, विराट कोहली नाबाद ८१, युवराज सिंग पायचीत गो. हसन अली ५३, हार्दिक पंड्या नाबाद २0. एकूण : ४८ षटकांत ३ बाद ३१९.

गडी बाद क्रम : १-१३६ (शिखर धवन, २४.३), २-१९२ (रोहित शर्मा, ३६.४). ३-२८५ (युवराज सिंग, ४६.२).

गोलंदाजी : मोहंमद आामर ८.१-१-३२-0, इमाद वसीम ९.१-0-६६-0, हसन अली १0-0-७0-१, वहाब रियाज ८.४-0-८७-0, शादाब खान १0-0-५२-१, शोएब मलिक २-0-१0-0.