शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

भारताची हाराकिरी, इंग्लंडचा २६६ धावांनी विजय

By admin | Updated: July 31, 2014 17:45 IST

कसोटीच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर मिळवलेली पकड अजिबात ढिली न सोडता भारताला तिस-या कसोटीत २६६ धावांनी धूळ चारली.

ऑनलाइन टीम
साऊदम्प्टन, दि. ३१ - कसोटीच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर मिळवलेली पकड अजिबात ढिली न सोडता भारताला तिस-या कसोटीत २६६ धावांनी धूळ चारली. इंग्लंडच्या ४४५ धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव अवघ्या १७८ धावांमध्ये संपुष्टात आला आणि इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १ -१ अशी बरोबरी केली. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावाप्रमाणेच दुस-या डावातही चांगला खेळ करत (५२) भारताचा  डाव सावरायचा प्रयत्न केला मात्र त्याला इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्याने भारताचा डाव गडगडला. इंग्लंडतर्फे मोईन अलीने तब्बल ६ बळी टिपले तर अँडरसनने २ व रूटने १ गडी बाद केला. 
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणा-या इंग्लंडतर्फे कप्तान (९५), बॅलन्स ( १५६) आणि बेल (१६७) यांनी दमदार फलंदाजी करत भारतापुढे ५६९ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रहाणे (५४) व धोनीशिवाय (५०) भारताचा कोणीही फलंदाज जास्त टिकू शकला नाही आणि परिणामी भारताचा डाव ३३० धावांवरच संपुष्टात आला. इंग्लंडने भारताला फॉलोऑन न देता दुस-या डावाचीही चांगली सुरूवात केली. कूकच्या ७० धावांच्या नाबाद खेळीमुळे इंग्लंडने २०५ धावांचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर डाव घोषित करत भारतापुढे जिंकण्यासाठी ४४५ धावांचे आव्हान ठेवले.
मात्र दुस-या डावातही भारतीय फलंदाज खास खेळ करू शकले नाहीत व भारताचा डाव अवघ्या १७८ धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने तब्बल २६६ धावांनी तिसरी कसोटी जिंकली.