शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

भारताचा बांगलादेशवर 240 धावांनी दणदणीत विजय

By admin | Updated: May 30, 2017 21:20 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी झालेल्या अखेरच्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 240 धावांनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 30 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी झालेल्या अखेरच्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 240 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन (60), दिनेश कार्तिक(94) आणि हार्दिक पांड्या (80*) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात सात बाद 324 धावांचा डोंगर उभा केला होता. आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा अपयशी ठरला. सलमीला फलंदाजीसाठी आलेल्या शर्मा एका धावेवर बाद झाला. बांगलादेशच्या रुबेल हुसैनने त्याच्या यष्ट्या उडवल्या. पहिल्या सराव सामन्यात अपशी ठरलेल्या रहाणेला दुसऱ्या सामन्यातही फारशी चमक दाखवता आली नाही. वैयक्तिक 11 धावसंखेवर तो बाद झाला. आजच्या भारताच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणाल तर हार्दिक पांड्या आहे. पांड्याने 54 चेंडूचा सामना करताना सहा षटकार लगावत नाबाद 80 धावांची खेळी केली. त्याला जाधव, जाडेजाने उत्तम साथ दिली. 325 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवले. संघाच्या 11 धावा असताना सौम्य सरकार बाद झाला तेथून बांगलादेश संघाला सावरालाय जमले नाही. 11 धावावर एक बाद ते 22 धावांवर सहा बाद अशी दयणीय अवस्था झाली होती. 24 षटकांत 84 धावसंखेवर बांगलादेशचा सर्व संघ बाद झाला. भारताकडून उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करताना प्रत्येकी तीन बळी मिळवले. जसप्रित बुमराह, शमी, पांड्या आणि अश्विन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.