शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेश कसोटी : ही आहेत 10 वैशिष्ट्ये

By admin | Updated: February 8, 2017 16:04 IST

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांशी निगडीत असलेल्या 10 रंजक बाबींचा घेतलेला हा आढावा

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली,  दि. 8 - कसोटी दर्जा मिळाल्यावर तब्बल 16 वर्षांनंतर कसोटी सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ भारतात आला आहे.  भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघांशी निगडीत असलेल्या 10 रंजक बाबींचा घेतलेला हा आढावा... 
 1 - भारत आणि बांगलादेशमध्ये आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळले गेले असून, त्यातील सहा सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, या सहा विजयांपैकी चार वेळा भारताने बांगलादेशला डावाने मात दिली आहे.  तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.  
2 -   हैदराबाद कसोटीला सुरुवात झाल्यावर भारतात कसोटी सामना खेळणारा बांगलादेश हा नववा कसोटी संघ ठरेल. बांगलादेशच्या आधी कसोटी दर्जा प्राप्त असलेले अन्य 8 संघ भारतात कसोटी सामने खेळले आहेत.  
3 - राजीव गांधी स्टेडियम आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारासाठी लकी आहे. अश्विनने येथे खेळलेल्या दोन कसोटीत 18 बळी टिपले आहेत, तर पुजाराने येथे 181.5 च्या सरासरीने 363 धावा कुटल्या आहेत. 
4 -  बांगलादेशचा संघ आतापर्यंत परदेशात 44 कसोटी सामने खेळला असून, त्यातील केवळ तीन सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे. त्या पैकी दोन विजय वेस्ट इंडिज आणि एक विजय  झिम्बाब्वेविरुद्ध मिळवलेला आहे. 
5 -  भारत आणि बांगलादेशमधील कसोटी सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने 136.66च्या सरासरीने 820 धावा कुटल्या आहेत.  त्यात 5 शतकांचाही समावेश आहे. 
 6-   दोन्ही संघांत झालेल्या कसोटी सामन्यांच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम झहीर खानच्या नावे आहे. त्याने सात सामन्यात 31 बळी टिपले आहेत.
 7 - बांगलादेशविरुद्ध होणारा कसोटी सामना  कर्णधार म्हणून विराटचा 23वा कसोटी सामना असेल. त्याबरोबरच तो सर्वाधिक सामन्यात कप्तानी करण्याच्या भारतीय कर्णधारांच्या यादीत कोहली नवव्या स्थानी पोहोचेल. 
  8 - कोहलीचा संघ गेल्या 18 कसोटी सामन्यांपासून भारतीय मैदानात अपराजित आहे. आता अजून दोन सामन्यात अपराजित राहिल्यास सलग 20 सामन्यात अपराजित राहण्याचा 1977 ते 1980 दरम्यानच्या आपल्या जुन्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी भारताकडे असेल. 
9 - भारताने विजय मिळवल्यास तो भारताचा घरच्या मैदानावरील 95वा विजय असेल. घरच्या मैदानावर भारतापेक्षा अधिक विजय केवळ ऑस्ट्रेलिया (234), इंग्लंड (207) आणि दक्षिण आफ्रिका (96) या संघांनीच मिळवले आहेत. 
10 -   बांगलादेशचा शाकिब अल हसन हा एकाच कसोटी सामन्यात शतक आणि 10 बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा जगातील केवळ तिसरा क्रिकेटपटू आहे. शाकिबच्या आधी अशी किमया इयान बॉथम आणि इम्रान खान यांनी केली होती.