शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

भारत-बांगलादेश अंतिम लढत आज

By admin | Updated: November 29, 2015 01:30 IST

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या भारताच्या ज्युनिअर (अंडर-१९) क्रिकेट संघाला आज, रविवारी तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे

कोलकाता : राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या भारताच्या ज्युनिअर (अंडर-१९) क्रिकेट संघाला आज, रविवारी तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारताच्या माजी कर्णधाराच्या नेतृत्वाखालील २० सदस्यीय संघाने डबल राऊंड रॉबिन टप्प्यात अफगाणिस्तान व बांगलादेश संघाचा पराभव केलेला आहे. २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या तयारीसाठी या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. द्रविडने चार सामन्यांमध्ये अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना रोटेशन पद्धतीचा योग्य वापर करीत सर्वांना संधी दिली आहे. भारताने चार सामने जिंकताना दोन बोनस गुणांचीही कमाई केली आहे.आंध्र प्रदेशच्या रिकी भुईने पहिल्या दोन लढतीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली, तर त्यानंतरच्या दोन सामन्यांत झारखंडच्या विराट सिंगने ही भूमिका बजावली. प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना त्यांना कुठली अडचण भासली नाही. भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त दिल्लीचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्याने तीन सामन्यांत ११८, ५१ आणि ८७ धावांची खेळी केली आहे. मधल्या फळीची जबाबदारी वाशिंग्टन सुंदर, विराट आणि भुई हे सांभाळतील. गोलंदाजीमध्ये भारतीय संघात इंदूरचा वेगवान गोलंदाज अवेश खान आहे. (वृत्तसंस्था)