शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

भारत-बांगलादेश अंतिम लढत आज

By admin | Updated: November 29, 2015 01:30 IST

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या भारताच्या ज्युनिअर (अंडर-१९) क्रिकेट संघाला आज, रविवारी तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे

कोलकाता : राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या भारताच्या ज्युनिअर (अंडर-१९) क्रिकेट संघाला आज, रविवारी तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारताच्या माजी कर्णधाराच्या नेतृत्वाखालील २० सदस्यीय संघाने डबल राऊंड रॉबिन टप्प्यात अफगाणिस्तान व बांगलादेश संघाचा पराभव केलेला आहे. २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या तयारीसाठी या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. द्रविडने चार सामन्यांमध्ये अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना रोटेशन पद्धतीचा योग्य वापर करीत सर्वांना संधी दिली आहे. भारताने चार सामने जिंकताना दोन बोनस गुणांचीही कमाई केली आहे.आंध्र प्रदेशच्या रिकी भुईने पहिल्या दोन लढतीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली, तर त्यानंतरच्या दोन सामन्यांत झारखंडच्या विराट सिंगने ही भूमिका बजावली. प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना त्यांना कुठली अडचण भासली नाही. भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त दिल्लीचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्याने तीन सामन्यांत ११८, ५१ आणि ८७ धावांची खेळी केली आहे. मधल्या फळीची जबाबदारी वाशिंग्टन सुंदर, विराट आणि भुई हे सांभाळतील. गोलंदाजीमध्ये भारतीय संघात इंदूरचा वेगवान गोलंदाज अवेश खान आहे. (वृत्तसंस्था)