शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भारत-आॅस्ट्रेलिया सामना वॉश आऊट

By admin | Updated: January 28, 2015 02:09 IST

तिरंगी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला सोमवारच्या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे २ गुणांवर समाधान मानावे लागले

सिडनी : तिरंगी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला सोमवारच्या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे २ गुणांवर समाधान मानावे लागले. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात पावसाच्या खेळीने ही लढत १६ षटकांनंतर थांबविण्यात आली आणि दोन्ही संघांनी २-२ गुण बहाल करण्यात आले.नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. काही षटके खेळून काढल्यानंतर पावसाने एंट्री केली. मात्र, थोड्याच वेळात सामना पुन्हा सुरू झाला. ही लढत ४४ षटकांची करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा फलंदाजीला आलेल्या भारताला सातव्याच षटकात झटका बसला. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ८ धावांवर मिचल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु १३व्या षटकात मिचल मार्श याने रायुडूला बाद केले. १६व्या षटकात पुन्हा पावसाने एंट्री घेतली आणि तो थांबलाच नाही. त्यामुळे ही लढत रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला.(वृत्तसंस्था)