शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

परिस्थितीशी जुळवून घेणे महत्त्वाचे : पी. व्ही. सिंधू

By admin | Updated: August 1, 2016 05:42 IST

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रियोमधील परिस्थितीशी जुळवून घेणे आणि त्यानुसार कोर्टवरील रणनीतीत बदल करणे यशाचे सूत्र असल्याचे म्हटले

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन कांस्यपदकांच्या यादीत आॅलिम्पिक पदकाचा समावेश करण्यास सज्ज असलेल्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रियोमधील परिस्थितीशी जुळवून घेणे आणि त्यानुसार कोर्टवरील रणनीतीत बदल करणे यशाचे सूत्र असल्याचे म्हटले आहे.वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २0१३ आणि २0१५ असे सलग दोन वेळा कांस्यपदक जिंकणारी सिंधू म्हणाली, की रियोमध्ये कशी परिस्थिती असेल याची आम्हाला कल्पना नाही, म्हणून आम्ही तेथे लवकर जात आहोत. तेथे आम्ही एक आठवडा सराव करुन कोर्टची सवय करुन घेणार आहोत. त्यामुळे रियोमधील हा आठवडा महत्त्वपूर्ण असेल. महिला एकेरीतील स्पर्धेबद्दल बोलताना २१ वर्षीय सिंधू म्हणाली, की या गटात कोणीही पदकाची दावेदारी करु शकत नाही. सगळेच तुल्यबळ आहेत. कोणीही कोणाला हरवू शकतो.हे सगळं ज्या त्या दिवसाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. माझ्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मी यापूर्वी हरवले असल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. परंतु एकमेकांविरुद्ध सातत्याने खेळल्याने विरोधी खेळाडू आपल्या फटक्यांबद्दल जाणून घेतो, त्यामुळे चुरस आणखीनच तीव्र होते. या सगळ्यावर मात करण्यासाठी कोर्टवर रणनीती बदलणे महत्त्चाचे ठरते. राष्ट्रकुल चॅम्पियन सिंधूला कॅनडाच्या मिशेल ली आणि हंगेरीच्या लौरा सरोई या दोघींसोबत एम गटात स्थान मिळाले आहे. साखळी फेरी तिने यशस्वीपणे पार केली तर सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी चिनी तैपईच्या ताइ जु यिंग आणि चीनच्या यिहान वांग या दोन दिग्गज खेळाडूंशी लढावे लागेल.